शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

स्थानिक मच्छिमारांना डावलून मोरा- भाऊचा धक्का; ४०० मच्छीमारांवर उपासमारीचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 19:51 IST

 मोरा - भाऊचा धक्का या कामामुळे ४०० मच्छीमारांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. 

मधुकर ठाकूर 

उरण: मोरा - भाऊचा धक्का दरम्यान ७५ कोटी खर्चाच्या रो-रो सेवेच्या कामाला सुरुवात करताना येथील स्थानिक मच्छीमारांना कोणत्याही प्रकारे विचारात घेतले नाही.या कामामुळे येथील शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त होणार असल्याने  संतप्त झालेल्या स्थानिक मच्छीमारांनी कामाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतानाच विविध मागण्या, समस्यांची सोडवणूक होईपर्यंत रो-रो सेवेचे काम बंद करण्यात यावे असा निर्णय मंगळवारी (२०) झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.मच्छीमारांच्या विरोधामुळे मात्र रोरो सेवेचे काम अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोरा - भाऊचा धक्का दरम्यान ७५ कोटी खर्चाच्या रो-रो सेवेच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

मात्र रो-रो सेवेचे काम सुरू करताना येथील स्थानिक मच्छीमारांना कोणत्याही प्रकारे विचारात घेतलेले नाही.या मोरा बंदरातून स्थानिक मच्छीमारांच्या सुमारे ३०० नौका मासेमारी व्यवसाय करीत आहेत. या मासेमारी व्यवसायावरच ४००० स्थानिक मच्छीमार कुटुंब उदरनिर्वाह करीत आहेत.मात्र रो-रो सेवा उभारण्यात येणाओ जेट्टीमुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिक मच्छीमार बाधीत होणार आहेत. ज्या भागात प्रत्यक्ष मासेमारी होते त्या भागात नौका नांगरणे, शाकारणे, मासे सुकविणे, जाळी सुकविणे, डागडुजी करणे ही कामे चालतात.रो-रो कामामुळे कामावर गदा येण्याची शक्यता आहे.रो -रो सेवा व जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यामुळे काही राहती घरे बाधीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.स्थानिक मच्छीमारांच्या समस्या समजून न घेताच आणि त्यांना अंधारात ठेवून महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने मोरा -भाऊचा धक्का रो-रो सेवेचा घाट घातला आहे.

मोरा बंदर, मोरा कोळीवाडा येथील स्थानिक मच्छिमारांना विचारात न घेता रो-रो जेट्टीचे काम सुरु केल्याने संतप्त झालेल्या स्थानिक मच्छीमारांनी मंगळवारी बैठकीचे आयोजन केले होते.पुनर्वसन, पुर्नस्थापना करण्याच्या अनुषंघाने व कोळी समाजाच्या न्याय हक्क आणि विविध मागण्यासाठी येथील एकवीरा देवीच्या मंदिरात मोरा कोळीवाडा ग्रामविकास समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी ओबीसीचे नेते राजाराम पाटील, मोरा कोळीवाडा ग्रामविकास समितीचे अध्यक्ष प्रशांत कोळी, उपाध्यक्ष हेमंत कोळी, सचिव सुहास कोळी, सहसचिव सुनिल कोळी, खजिनदार शेखर कोळी, सहखजिनदार नंदादीप कोळी, रविंद्र चव्हाण व इतर सदस्य,मच्ऊ उपस्थित होते.

रो-रो जेट्टीच्या कामालाच विरोध दर्शवित २०१३ च्या कायद्यातील तरतुदी धाब्यावर बसवून काम सुरू करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला. न्याय हक्क, शेकडो स्थानिक मच्छीमारांचे धोक्यात येऊ पाहाणारे अस्तित्व टिकविणे, व समुद्र किनारी असलेले राहती घरे वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघर्षाबरोबरच न्यायालयीन लढा देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघटित होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे ठराव व निर्णय घेण्यात आले.

 

 

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरण