शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक मच्छिमारांना डावलून मोरा- भाऊचा धक्का; ४०० मच्छीमारांवर उपासमारीचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 19:51 IST

 मोरा - भाऊचा धक्का या कामामुळे ४०० मच्छीमारांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. 

मधुकर ठाकूर 

उरण: मोरा - भाऊचा धक्का दरम्यान ७५ कोटी खर्चाच्या रो-रो सेवेच्या कामाला सुरुवात करताना येथील स्थानिक मच्छीमारांना कोणत्याही प्रकारे विचारात घेतले नाही.या कामामुळे येथील शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त होणार असल्याने  संतप्त झालेल्या स्थानिक मच्छीमारांनी कामाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतानाच विविध मागण्या, समस्यांची सोडवणूक होईपर्यंत रो-रो सेवेचे काम बंद करण्यात यावे असा निर्णय मंगळवारी (२०) झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.मच्छीमारांच्या विरोधामुळे मात्र रोरो सेवेचे काम अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोरा - भाऊचा धक्का दरम्यान ७५ कोटी खर्चाच्या रो-रो सेवेच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

मात्र रो-रो सेवेचे काम सुरू करताना येथील स्थानिक मच्छीमारांना कोणत्याही प्रकारे विचारात घेतलेले नाही.या मोरा बंदरातून स्थानिक मच्छीमारांच्या सुमारे ३०० नौका मासेमारी व्यवसाय करीत आहेत. या मासेमारी व्यवसायावरच ४००० स्थानिक मच्छीमार कुटुंब उदरनिर्वाह करीत आहेत.मात्र रो-रो सेवा उभारण्यात येणाओ जेट्टीमुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिक मच्छीमार बाधीत होणार आहेत. ज्या भागात प्रत्यक्ष मासेमारी होते त्या भागात नौका नांगरणे, शाकारणे, मासे सुकविणे, जाळी सुकविणे, डागडुजी करणे ही कामे चालतात.रो-रो कामामुळे कामावर गदा येण्याची शक्यता आहे.रो -रो सेवा व जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यामुळे काही राहती घरे बाधीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.स्थानिक मच्छीमारांच्या समस्या समजून न घेताच आणि त्यांना अंधारात ठेवून महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने मोरा -भाऊचा धक्का रो-रो सेवेचा घाट घातला आहे.

मोरा बंदर, मोरा कोळीवाडा येथील स्थानिक मच्छिमारांना विचारात न घेता रो-रो जेट्टीचे काम सुरु केल्याने संतप्त झालेल्या स्थानिक मच्छीमारांनी मंगळवारी बैठकीचे आयोजन केले होते.पुनर्वसन, पुर्नस्थापना करण्याच्या अनुषंघाने व कोळी समाजाच्या न्याय हक्क आणि विविध मागण्यासाठी येथील एकवीरा देवीच्या मंदिरात मोरा कोळीवाडा ग्रामविकास समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी ओबीसीचे नेते राजाराम पाटील, मोरा कोळीवाडा ग्रामविकास समितीचे अध्यक्ष प्रशांत कोळी, उपाध्यक्ष हेमंत कोळी, सचिव सुहास कोळी, सहसचिव सुनिल कोळी, खजिनदार शेखर कोळी, सहखजिनदार नंदादीप कोळी, रविंद्र चव्हाण व इतर सदस्य,मच्ऊ उपस्थित होते.

रो-रो जेट्टीच्या कामालाच विरोध दर्शवित २०१३ च्या कायद्यातील तरतुदी धाब्यावर बसवून काम सुरू करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला. न्याय हक्क, शेकडो स्थानिक मच्छीमारांचे धोक्यात येऊ पाहाणारे अस्तित्व टिकविणे, व समुद्र किनारी असलेले राहती घरे वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघर्षाबरोबरच न्यायालयीन लढा देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघटित होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे ठराव व निर्णय घेण्यात आले.

 

 

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरण