शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

शिक्षकांना ३८ दिवसांचीच उन्हाळी सुटी; १५ जूनपासून उघडणार शाळा

By निखिल म्हात्रे | Updated: May 1, 2024 10:38 IST

७ मे रोजी निवडणूक कर्तव्यावर,  इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत आता बंद झाली आहे

अलिबाग : आठवडाभरात जिल्हा परिषदेच्या शाळांच्या परीक्षा संपणार आहेत. त्यानंतरही शिक्षकांना शाळेत यावे लागणार आहे. ७ मे रोजी लोकसभा निवडणूक कर्तव्यावर हजर राहावे लागणार असून, ८ मेपासून त्यांना उन्हाळी सुट्या लागणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना ३८ दिवसांची सुटी मिळणार आहे.

इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत आता बंद झाली आहे. त्यामुळे परीक्षा घेतल्यानंतर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा एका महिन्यानंतर परीक्षा घेतली जाणार आहे. त्यातही एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा त्याच वर्गात बसावे लागणार आहे.

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या आहेत, त्यांना उन्हाळी सुटी लागली आहे. ज्या शाळांच्या परीक्षा झालेल्या नाहीत, त्यांना चालू आठवड्यात परीक्षा संपविण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांना सुट्या लागल्या तरी मुख्याध्यापक व शिक्षकांना पुढील शैक्षणिक वर्षीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया अजून सुरू न झाल्याने शाळांना तोवर उर्वरित ७५ टक्के प्रवेश पूर्ण करून घ्यावे लागणार आहेत. शाळांनी आता त्याची तयारी सुरू केली आहे.निवडणुकीमुळे ८ मेपासून उन्हाळी सुटी१ मे रोजी विद्यार्थ्यांना मिळणार निकालपत्र१५ जूनपासून पुन्हा सुरू होतील शाळादोन दिवस तयारीसाठी शाळेत यावे लागणार

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सुट्या शाळांना ६ मेपासून लागणार आहेत, पण लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान असल्याने ८ मेपासून सुट्या लागतील. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा या आठवड्यात संपतील. त्यांची परीक्षा सकाळच्या सत्रात घेतल्या जात आहेत.- पुनिता गुरव, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, रायगड.

टॅग्स :Teacherशिक्षकElectionनिवडणूक