शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी CBI ची कारवाई!
2
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
3
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
4
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
5
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
6
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
7
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
8
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
9
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
10
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
11
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
12
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
13
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
14
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
15
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
16
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
17
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
18
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
19
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
20
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र

३३ लाखांचा खर्च जाणार पाण्यात

By admin | Updated: June 23, 2016 03:28 IST

अलिबाग-वडखळ रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार असल्याचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते

आविष्कार देसाई,  अलिबागअलिबाग-वडखळ रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार असल्याचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. सुमारे ३०० कोटी रुपयांचा खर्च असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले होते. परंतु आरसीएफ कंपनीने याच ठिकाणी सुमारे ३३ लाख रुपये खर्च करून सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. आरसीएफ प्रशासनाची ही भूमिका म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याचे बोलले जाते.अलिबाग शहराचे प्रवेशद्वार म्हणून चेंढरे-पिंपळभाटची ओळख आहे. याच परिसरामध्ये आरसीएफ कंपनीच्या मोठ्या संख्येने वसाहतीच्या इमारती आहेत. आरसीएफ कंपनीच्या वसाहतीलालागूनच सुमारे २०० मीटर लांबीची मोकळी जागा आहे. सध्या ती जागा सार्वजनिक बांधकाम खाते, तर काही नागरिकांच्या मालकीची आहे. चेंढरे ग्रामपंचायतीने त्यांना अ‍ॅसेसमेंटही दिले आहे. ज्यांच्या मालकीची जागा आहे त्यांनाही प्रशासनाने नोटीस पाठविल्या आहेत. त्यामुळे तेथील नागरिक हवालदिल झाले आहेत. काही ठिकाणी अतिक्रमणही झालेले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे.याच जागेवर आरसीएफ कंपनी प्रशासनाने सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेत तेथे कामालाही सुरु वात केली आहे. यासाठी ३३ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामाध्यमातून तेथे गार्डन, वृक्षलागवड, विजेचे दिवे, बसण्यासाठी बाकडे, ड्रेनेज यासह अन्य सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. आरसीएफने घेतलेला निर्णय चांगला असला, तरी हीच जागा अलिबाग-वडखळ मार्गाच्या चौपदरी करणात जाणार आहे. तेथील कामाला लवकरच सुरुवातही होणार असल्याचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. या राष्ट्रीय महामार्गासाठी सुमारे ३०० कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले होते. अलिबाग-वडखळ या महामार्गामुळे यातील अंतर हे केवळ १५ मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. एवढ्या मोठ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला येथे सुरुवात होणार असताना आरसीएफ कंपनी प्रशासन सुशोभीकरणासाठी ३३ लाख रुपये खर्च करणार आहे. च्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला येथे सुरुवात होणार असताना आरसीएफ कंपनी प्रशासन सुशोभीकरणासाठी ३३ लाख रुपये खर्च करणार आहे. सुशोभीकरणासाठी करण्यात येणारा सर्व खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे. असे असताना आरसीएफ कंपनी सुशोभीकरणाचा हट्ट का धरते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवावी, अशी मागणी जोर धरीत आहे.