आविष्कार देसाई, अलिबागअलिबाग-वडखळ रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार असल्याचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. सुमारे ३०० कोटी रुपयांचा खर्च असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले होते. परंतु आरसीएफ कंपनीने याच ठिकाणी सुमारे ३३ लाख रुपये खर्च करून सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. आरसीएफ प्रशासनाची ही भूमिका म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याचे बोलले जाते.अलिबाग शहराचे प्रवेशद्वार म्हणून चेंढरे-पिंपळभाटची ओळख आहे. याच परिसरामध्ये आरसीएफ कंपनीच्या मोठ्या संख्येने वसाहतीच्या इमारती आहेत. आरसीएफ कंपनीच्या वसाहतीलालागूनच सुमारे २०० मीटर लांबीची मोकळी जागा आहे. सध्या ती जागा सार्वजनिक बांधकाम खाते, तर काही नागरिकांच्या मालकीची आहे. चेंढरे ग्रामपंचायतीने त्यांना अॅसेसमेंटही दिले आहे. ज्यांच्या मालकीची जागा आहे त्यांनाही प्रशासनाने नोटीस पाठविल्या आहेत. त्यामुळे तेथील नागरिक हवालदिल झाले आहेत. काही ठिकाणी अतिक्रमणही झालेले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे.याच जागेवर आरसीएफ कंपनी प्रशासनाने सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेत तेथे कामालाही सुरु वात केली आहे. यासाठी ३३ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामाध्यमातून तेथे गार्डन, वृक्षलागवड, विजेचे दिवे, बसण्यासाठी बाकडे, ड्रेनेज यासह अन्य सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. आरसीएफने घेतलेला निर्णय चांगला असला, तरी हीच जागा अलिबाग-वडखळ मार्गाच्या चौपदरी करणात जाणार आहे. तेथील कामाला लवकरच सुरुवातही होणार असल्याचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. या राष्ट्रीय महामार्गासाठी सुमारे ३०० कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले होते. अलिबाग-वडखळ या महामार्गामुळे यातील अंतर हे केवळ १५ मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. एवढ्या मोठ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला येथे सुरुवात होणार असताना आरसीएफ कंपनी प्रशासन सुशोभीकरणासाठी ३३ लाख रुपये खर्च करणार आहे. च्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला येथे सुरुवात होणार असताना आरसीएफ कंपनी प्रशासन सुशोभीकरणासाठी ३३ लाख रुपये खर्च करणार आहे. सुशोभीकरणासाठी करण्यात येणारा सर्व खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे. असे असताना आरसीएफ कंपनी सुशोभीकरणाचा हट्ट का धरते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवावी, अशी मागणी जोर धरीत आहे.
३३ लाखांचा खर्च जाणार पाण्यात
By admin | Updated: June 23, 2016 03:28 IST