शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

पूरग्रस्त जनावरांसाठी श्रमदानातून १०७ टन चारा; रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 00:00 IST

रायगड जिल्ह्यातून सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्त जनावरांसाठी १०७ टन चारा व पेंढा पाठविण्यात आला आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातून सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्त जनावरांसाठी १०७ टन चारा व पेंढा पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथे शेतात उतरून श्रमदान करून चारा कापण्यासाठी हातभार लावला. पशूसंवर्धन, महसूल अधिकारी, जिल्हा परिषद, सरपंच व ग्रामस्थांनी श्रमदानातून हिरवा चारा कापून भारे ट्रकद्वारे पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी रवाना केले.

सांगली, कोल्हापूर परिसरात आलेल्या पुरामुळे येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. कुटुंब, घरे उद्ध्वस्त झाली आहेत तर हजारो जनावरे मृत झाली आहेत. त्यामुळे तेथील जनतेच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, जिवंत जनावरांनाही काय खायला घालायचे याची चिंता शेतकऱ्यांना पडली होती. सांगली, कोल्हापूरमधील जनावरांना चारा पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत.महसूल, पशू विभागाकडून मदतअलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथील माळरानावरील शेतात असलेला हिरवा चारा कापून ट्रकमध्ये भरण्यात आला. जिल्हाधिकारी सूर्यवंशी स्वत: शेतात उतरून चारा कापण्यास मदत करीत होते. पशू, महसूल विभागाचे कर्मचारी, अधिकारी, जिल्हा परिषद कर्मचाºयांनीही चारा कापून भारा डोक्यावर घेऊन ट्रकमध्ये भरला. तर स्थानिक शेतकºयांनी स्वत:साठी एक भारा व दोन भारे पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी पाठविले आहेत.जिल्ह्यातून माणगाव १२ टन, अलिबाग ६० टन, पेण १५ टन, पोलादपूर आणि मुरुड प्रत्येकी १० टन असा एकूण १०७ टन चारा आणि पेंढा पूरग्रस्त भागात पाठविण्यात आला आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूरमधील जनावरांचा खाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Raigadरायगड