शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

श्रीवर्धनमध्ये पेयजल योजनेसाठी ३ कोटी ६५ लाखांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 04:17 IST

टंचाईग्रस्त गावांचा प्रश्न निकाली; ‘लोकमत’ने मांडली होती व्यथा

श्रीवर्धन : राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील नऊ गावांसाठी तीन कोटी ६५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात संबंधित गावांचा पाणीप्रश्न निकाली निघण्याची चिन्ह आहेत.श्रीवर्धन तालुक्याची लोकसंख्या ८५०४० च्या जवळपास आहे. तालुक्यात एकूण ७८ गावे वसलेले आहेत. वाळवंटी, धनगरमलई, कासारकोंड, वडशेत, वेळास, साखरी, कोंडविल, शेखाडी व वाकळघर या गावांना राष्ट्रीय पेयजल योजनेचा फायदा होणार आहे.श्रीवर्धन तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असले तरी कायमस्वरूपीच्या जलसाठ्यांचा अभाव आहे. तलाव, बंधारे यांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य आहेत. मारळ व वडशेत वावे या ठिकाणचे कोट्यवधी रु पयांचे प्रकल्प प्रलंबित आहेत. त्याचा फटका तालुक्यातील नागरिकांना बसत आहे. शेतीस पूरक वातावरण आहे; परंतु कायमस्वरूपी जलस्रोतांची कमतरता आहे. श्रीवर्धनमध्ये यंदा उन्हाळ्यात जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागली. कासारकोंड, साक्षी भैरी (हरिहरेश्वर), धनगरमलई, नागलोली या गावातील लोकांना पाण्यासाठी गावापासून दोन-दोन किलोमीटर अंतरावर पाण्यासाठी जावे लागत होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर दोन दिवसांत गावांना पाणीपुरवठा करण्यात आला.श्रीवर्धन तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या भीषण आहे. वारंवार मागणी केल्यामुळे तालुक्यातील नऊ गावांना राष्ट्रीय पेयजल अंतर्गत निधी मिळला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांनी पाठपुरवठा करून निधी प्राप्त करून दिला आहे .- दर्शन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष, श्रीवर्धन

टॅग्स :WaterपाणीRaigadरायगड