शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धनमध्ये पेयजल योजनेसाठी ३ कोटी ६५ लाखांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 04:17 IST

टंचाईग्रस्त गावांचा प्रश्न निकाली; ‘लोकमत’ने मांडली होती व्यथा

श्रीवर्धन : राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील नऊ गावांसाठी तीन कोटी ६५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात संबंधित गावांचा पाणीप्रश्न निकाली निघण्याची चिन्ह आहेत.श्रीवर्धन तालुक्याची लोकसंख्या ८५०४० च्या जवळपास आहे. तालुक्यात एकूण ७८ गावे वसलेले आहेत. वाळवंटी, धनगरमलई, कासारकोंड, वडशेत, वेळास, साखरी, कोंडविल, शेखाडी व वाकळघर या गावांना राष्ट्रीय पेयजल योजनेचा फायदा होणार आहे.श्रीवर्धन तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असले तरी कायमस्वरूपीच्या जलसाठ्यांचा अभाव आहे. तलाव, बंधारे यांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य आहेत. मारळ व वडशेत वावे या ठिकाणचे कोट्यवधी रु पयांचे प्रकल्प प्रलंबित आहेत. त्याचा फटका तालुक्यातील नागरिकांना बसत आहे. शेतीस पूरक वातावरण आहे; परंतु कायमस्वरूपी जलस्रोतांची कमतरता आहे. श्रीवर्धनमध्ये यंदा उन्हाळ्यात जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागली. कासारकोंड, साक्षी भैरी (हरिहरेश्वर), धनगरमलई, नागलोली या गावातील लोकांना पाण्यासाठी गावापासून दोन-दोन किलोमीटर अंतरावर पाण्यासाठी जावे लागत होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर दोन दिवसांत गावांना पाणीपुरवठा करण्यात आला.श्रीवर्धन तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या भीषण आहे. वारंवार मागणी केल्यामुळे तालुक्यातील नऊ गावांना राष्ट्रीय पेयजल अंतर्गत निधी मिळला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांनी पाठपुरवठा करून निधी प्राप्त करून दिला आहे .- दर्शन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष, श्रीवर्धन

टॅग्स :WaterपाणीRaigadरायगड