शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वादळात बंद पडलेले २९९ रस्ते झाले खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 00:21 IST

ग्रामस्थ, प्रशासनाची मदत : आपद्ग्रस्तांपर्यंत मदत पोहोचविण्यातील अडथळा दूर

अलिबाग : रायगड जिल्ह्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने विविध ठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून तब्बल २९९ ठिकाणचे रस्ते मोकळे केले आहेत. त्यामुळे आपद्ग्रस्तांपर्यंत मदत पोहोचविण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे. प्रशासनाप्रमाणे काही ठिकाणी ग्रामस्थांनीही स्वत:च्या हिमतीवर झाडे तोडून रस्ते वाहतुकीला खुले केले आहेत.

निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला सर्वाधिक फटका दिला आहे. लाखो घरांची पडझड झाली तर, हजारो घरांचे छप्पर उडाले. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात वृक्ष कोसळले होते. झाडे रस्त्यांमध्येच पडल्याने रहदारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे आपद्ग्रस्तांना मदत पोहोचविणे कठीण होत होते. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत मदतकार्य पोहोचण्यासाठी, दळणवळणासाठी हे बंद पडलेले रस्ते खुले करणे गरजेचे होते. याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविली.कार्यकारी अभियंता (अलिबाग), कार्यकारी अभियंता (पनवेल), कार्यकारी अभियंता (महाड), सर्व प्रांताधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी महेश चौधरी, तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी यांची टीम तयार केली. त्यामध्ये कर्मचारीही होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या जिल्हा पोलीस प्रशासनाची आणि एनडीआरएफच्या पथकांनी युद्धपातळीवर काम केले. प्रत्येक तालुक्यात साधारणत: १४ ते १५ पथके तर नगरपालिका/ नगरपंचायत क्षेत्रात २ ते ३ पथके तयार करण्यात आली. एका पथकात साधारण ३ ते ४ जणांचा तर नगरपालिका क्षेत्रात ४० ते ४५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे या कामासाठी ग्रामीण भागात जवळपास ६० जेसीबी आणि ४० वूडकटर्स तर नागरी भागात २० ते २२ जेसीबी, ६० वूडकटर्स तसेच ४५ ट्रॅक्टर्स वापरण्यात आले. दरम्यान, वादळाच्या पहिल्या आणि दुसºया दिवशी काही ग्रामीण भागांमध्ये ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. त्यांनी मेहनत घेत रस्त्यांमधील झाडे कापून, तोडून बाजूला केली.वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेल्या रस्त्यांची माहितीकार्यकारी अभियंता (बांधकाम) रायगड जिल्हा परिषद अंतर्गत असलेले बंद पडलेले १९१ रस्ते, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबागच्या अंतर्गत असलेले ३३ बंद पडलेले सर्व रस्ते, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेलच्या अंतर्गत बंद पडलेले २६ रस्ते, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग महाडच्या अंतर्गत बंद पडलेले ४९ रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे चक्रीवादळामुळे झाडे पडून खंडित झालेली वाहतूक पूर्णपणे सुरळीतपणे सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड