शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

29 हजार शिक्षकांच्या पोटावर येणार पाय; कंत्राटी शिक्षक पद्धतीला विरोध, २५ सप्टेंबरला आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 07:37 IST

या दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी रद्द करण्यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. २५ सप्टेंबरला सामूहिक रजा आंदोलन करीत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

अलिबाग : राज्यातील शिक्षण क्षेत्रात कंत्राटी पद्धत आणण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू झाला आहे. याचा फटका ग्रामीण भागातील २९ हजारांहून अधिक शिक्षक तसेच १ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांना बसणार आहे. राज्यात सुधारित शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली. या दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी रद्द करण्यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. २५ सप्टेंबरला सामूहिक रजा आंदोलन करीत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा एकशिक्षकी होणार आहेत. त्या शिक्षकांसोबत एक निवृत्त कंत्राटी अतिरिक्त शिक्षक नेमला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील १५ हजार शाळांमधील सध्या कार्यरत असलेल्या २९ हजार ७०७ शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार आहे. केंद्राच्या बालकांचा शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार लहान मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. मात्र या कायद्याचीही पायमल्ली होणार असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.

हे धोरण राबवून ग्रामीण दुर्गम भागातील शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव आहे. भविष्यात समूहशाळा सुरू करण्याची ही सुरुवात आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळण्याचा घाट सरकारने घातला आहे. 

- राजेश सुर्वे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद

शाळांचा दर्जा घसरणार

 शासनाच्या या धोरणाचा शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. सर्व संघटनांच्या समन्वय समितीची बैठक शनिवारी पुणे येथील शिक्षक भवन येथे पार पडली. बैठकीत शासनाच्या भूमिकेवर विचारविनिमय केला.

 या धोरणाचा विरोध करण्याचा एकमुखी निर्धार बैठकीत घेतला. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही फटका बसणार आहे. त्यामुळे शासकीय शाळांचा दर्जा घसरण्याची भीतीही आहे.

 या धोरणाला शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवून २५ सप्टेंबर रोजी आंदोलनाचा इशारा सरकारला दिला आहे.