शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

29 हजार शिक्षकांच्या पोटावर येणार पाय; कंत्राटी शिक्षक पद्धतीला विरोध, २५ सप्टेंबरला आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 07:37 IST

या दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी रद्द करण्यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. २५ सप्टेंबरला सामूहिक रजा आंदोलन करीत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

अलिबाग : राज्यातील शिक्षण क्षेत्रात कंत्राटी पद्धत आणण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू झाला आहे. याचा फटका ग्रामीण भागातील २९ हजारांहून अधिक शिक्षक तसेच १ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांना बसणार आहे. राज्यात सुधारित शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली. या दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी रद्द करण्यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. २५ सप्टेंबरला सामूहिक रजा आंदोलन करीत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा एकशिक्षकी होणार आहेत. त्या शिक्षकांसोबत एक निवृत्त कंत्राटी अतिरिक्त शिक्षक नेमला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील १५ हजार शाळांमधील सध्या कार्यरत असलेल्या २९ हजार ७०७ शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार आहे. केंद्राच्या बालकांचा शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार लहान मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. मात्र या कायद्याचीही पायमल्ली होणार असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.

हे धोरण राबवून ग्रामीण दुर्गम भागातील शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव आहे. भविष्यात समूहशाळा सुरू करण्याची ही सुरुवात आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळण्याचा घाट सरकारने घातला आहे. 

- राजेश सुर्वे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद

शाळांचा दर्जा घसरणार

 शासनाच्या या धोरणाचा शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. सर्व संघटनांच्या समन्वय समितीची बैठक शनिवारी पुणे येथील शिक्षक भवन येथे पार पडली. बैठकीत शासनाच्या भूमिकेवर विचारविनिमय केला.

 या धोरणाचा विरोध करण्याचा एकमुखी निर्धार बैठकीत घेतला. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही फटका बसणार आहे. त्यामुळे शासकीय शाळांचा दर्जा घसरण्याची भीतीही आहे.

 या धोरणाला शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवून २५ सप्टेंबर रोजी आंदोलनाचा इशारा सरकारला दिला आहे.