शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
5
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
6
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
7
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
8
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
9
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
10
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
11
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
12
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
13
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
14
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
15
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
16
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
17
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
18
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
19
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
20
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले

२८ प्रकल्पातील पाणीसाठा घटला

By admin | Updated: February 29, 2016 01:57 IST

नेहमीच येतो उन्हाळा आणि पाण्यासाठी दूरदूर पळा, या नात्याने मार्च महिन्यात अचानक पारा वरती चढल्याने पाणीटंचाईच्या झळा यंदा दाहक होणार आहेत

पेण : नेहमीच येतो उन्हाळा आणि पाण्यासाठी दूरदूर पळा, या नात्याने मार्च महिन्यात अचानक पारा वरती चढल्याने पाणीटंचाईच्या झळा यंदा दाहक होणार आहेत. गतवर्षी ७० टक्केच सरासरी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शासनाला ३० टक्क्याची पाण्याची तूट भरून काढण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. प्रशासकीय अधिकारी व पाणीपुरवठा विभाग आताच चिंतेत आहेत. पाण्याच्या या संघर्षाला कारण आहे ते रायगड जिल्ह्याच्या कोलाड पाटबंधारेविभागाच्या २८ प्रकल्पांमध्ये शेष ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास पाण्यासाठी आणीबाणीचा प्रसंग उद्भवू नये याची प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे. रायगडातील पाणीटंचाईचे दाहक चित्र या वर्षात पहावयास मिळणार आहे.गतवर्षी मान्सून हंगाम सरासरी गाठण्याइतपत होता. नेहमीच भरपूर पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील अनेक गावे पुराखाली जातात. मात्र आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. जंगल, डोंगर नष्ट होत असल्याने त्याचा परिणाम पर्जन्यमानावरही होत आहे. डोंगरच्या डोंगर फोडून, वनराई जाळून नष्ट करून रॉयल्टीच्या नावाखाली चालणाऱ्या या गोरखधंद्याकडे महसूलच्या कर्मचाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे. पाटबंधारे विभागाच्या २८ प्रकल्पाची संचय क्षमता ६८ हजार २८६ दशलक्ष घनमीटर एवढी असताना आजमितीस ३६ हजार ३८२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शेष आहे. ५३ टक्के सरासरी पाणी साठा शिल्लक आहे. २८ पैकी सहा प्रकल्पामध्ये ७० पेक्षा अधिक पाणीसाठा ११ प्रकल्पामध्ये ५० टक्के पाणीसाठा तर उर्वरित ११ प्रकल्पामध्ये ५० टक्क्याहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. मार्च उजाडताच उन्हाच्या झळांना प्रारंभ झाला आहे. गतवर्षी जिल्ह्यात २४१ गावे ३८४ वाड्या मिळून ६३३ ठिकाणी पाणीटंचाईची आकडेवारी होती. या कामी शासकीय ३६ तर खाजगी ३८ असे ७४ टँकर वापरण्यात आले. तरीही दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा यावर्षीच्या पावसाच्या तुटीने वाढणार आहे. याचे योग्य नियोजन न झाल्यास हंडे मोर्चांनी शासकीय कार्यालये दणाणणार आहेत. (वार्ताहर)