शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

२८ प्रकल्पातील पाणीसाठा घटला

By admin | Updated: February 29, 2016 01:57 IST

नेहमीच येतो उन्हाळा आणि पाण्यासाठी दूरदूर पळा, या नात्याने मार्च महिन्यात अचानक पारा वरती चढल्याने पाणीटंचाईच्या झळा यंदा दाहक होणार आहेत

पेण : नेहमीच येतो उन्हाळा आणि पाण्यासाठी दूरदूर पळा, या नात्याने मार्च महिन्यात अचानक पारा वरती चढल्याने पाणीटंचाईच्या झळा यंदा दाहक होणार आहेत. गतवर्षी ७० टक्केच सरासरी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शासनाला ३० टक्क्याची पाण्याची तूट भरून काढण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. प्रशासकीय अधिकारी व पाणीपुरवठा विभाग आताच चिंतेत आहेत. पाण्याच्या या संघर्षाला कारण आहे ते रायगड जिल्ह्याच्या कोलाड पाटबंधारेविभागाच्या २८ प्रकल्पांमध्ये शेष ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास पाण्यासाठी आणीबाणीचा प्रसंग उद्भवू नये याची प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे. रायगडातील पाणीटंचाईचे दाहक चित्र या वर्षात पहावयास मिळणार आहे.गतवर्षी मान्सून हंगाम सरासरी गाठण्याइतपत होता. नेहमीच भरपूर पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील अनेक गावे पुराखाली जातात. मात्र आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. जंगल, डोंगर नष्ट होत असल्याने त्याचा परिणाम पर्जन्यमानावरही होत आहे. डोंगरच्या डोंगर फोडून, वनराई जाळून नष्ट करून रॉयल्टीच्या नावाखाली चालणाऱ्या या गोरखधंद्याकडे महसूलच्या कर्मचाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे. पाटबंधारे विभागाच्या २८ प्रकल्पाची संचय क्षमता ६८ हजार २८६ दशलक्ष घनमीटर एवढी असताना आजमितीस ३६ हजार ३८२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शेष आहे. ५३ टक्के सरासरी पाणी साठा शिल्लक आहे. २८ पैकी सहा प्रकल्पामध्ये ७० पेक्षा अधिक पाणीसाठा ११ प्रकल्पामध्ये ५० टक्के पाणीसाठा तर उर्वरित ११ प्रकल्पामध्ये ५० टक्क्याहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. मार्च उजाडताच उन्हाच्या झळांना प्रारंभ झाला आहे. गतवर्षी जिल्ह्यात २४१ गावे ३८४ वाड्या मिळून ६३३ ठिकाणी पाणीटंचाईची आकडेवारी होती. या कामी शासकीय ३६ तर खाजगी ३८ असे ७४ टँकर वापरण्यात आले. तरीही दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा यावर्षीच्या पावसाच्या तुटीने वाढणार आहे. याचे योग्य नियोजन न झाल्यास हंडे मोर्चांनी शासकीय कार्यालये दणाणणार आहेत. (वार्ताहर)