शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

२८ प्रकल्पातील पाणीसाठा घटला

By admin | Updated: February 29, 2016 01:57 IST

नेहमीच येतो उन्हाळा आणि पाण्यासाठी दूरदूर पळा, या नात्याने मार्च महिन्यात अचानक पारा वरती चढल्याने पाणीटंचाईच्या झळा यंदा दाहक होणार आहेत

पेण : नेहमीच येतो उन्हाळा आणि पाण्यासाठी दूरदूर पळा, या नात्याने मार्च महिन्यात अचानक पारा वरती चढल्याने पाणीटंचाईच्या झळा यंदा दाहक होणार आहेत. गतवर्षी ७० टक्केच सरासरी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शासनाला ३० टक्क्याची पाण्याची तूट भरून काढण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. प्रशासकीय अधिकारी व पाणीपुरवठा विभाग आताच चिंतेत आहेत. पाण्याच्या या संघर्षाला कारण आहे ते रायगड जिल्ह्याच्या कोलाड पाटबंधारेविभागाच्या २८ प्रकल्पांमध्ये शेष ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास पाण्यासाठी आणीबाणीचा प्रसंग उद्भवू नये याची प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे. रायगडातील पाणीटंचाईचे दाहक चित्र या वर्षात पहावयास मिळणार आहे.गतवर्षी मान्सून हंगाम सरासरी गाठण्याइतपत होता. नेहमीच भरपूर पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील अनेक गावे पुराखाली जातात. मात्र आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. जंगल, डोंगर नष्ट होत असल्याने त्याचा परिणाम पर्जन्यमानावरही होत आहे. डोंगरच्या डोंगर फोडून, वनराई जाळून नष्ट करून रॉयल्टीच्या नावाखाली चालणाऱ्या या गोरखधंद्याकडे महसूलच्या कर्मचाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे. पाटबंधारे विभागाच्या २८ प्रकल्पाची संचय क्षमता ६८ हजार २८६ दशलक्ष घनमीटर एवढी असताना आजमितीस ३६ हजार ३८२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शेष आहे. ५३ टक्के सरासरी पाणी साठा शिल्लक आहे. २८ पैकी सहा प्रकल्पामध्ये ७० पेक्षा अधिक पाणीसाठा ११ प्रकल्पामध्ये ५० टक्के पाणीसाठा तर उर्वरित ११ प्रकल्पामध्ये ५० टक्क्याहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. मार्च उजाडताच उन्हाच्या झळांना प्रारंभ झाला आहे. गतवर्षी जिल्ह्यात २४१ गावे ३८४ वाड्या मिळून ६३३ ठिकाणी पाणीटंचाईची आकडेवारी होती. या कामी शासकीय ३६ तर खाजगी ३८ असे ७४ टँकर वापरण्यात आले. तरीही दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा यावर्षीच्या पावसाच्या तुटीने वाढणार आहे. याचे योग्य नियोजन न झाल्यास हंडे मोर्चांनी शासकीय कार्यालये दणाणणार आहेत. (वार्ताहर)