शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

रायगडमधील २५१ गावे कोरोनामुक्त, 13 टक्के नागरिकांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 18:17 IST

टप्प्याने अन्य गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

ठळक मुद्देजिल्ह्यातील गावे टप्प्याटप्प्याने कोरोनामुक्त होत आहेत. जिल्ह्यातील १ हजार ९१२ महसूली गावांपैकी २५१ गावे कोरोनामुक्त झाली असून, या गावांमध्ये सद्यस्थितीत एकही कोरोना रुग्ण नाही

रायगड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार, प्रशासनाने राबवलेल्या उपाय योजना आणि नागरिकांनी दिलेला प्रतिसाद कामी आला आहे. रायगड जिल्ह्यातील तब्बल 251 गावे कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आली आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडण्याचा सरासरी प्रमाणात आता घट झाली आहे. सध्या 13 टक्के नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे.

जिल्ह्यातील गावे टप्प्याटप्प्याने कोरोनामुक्त होत आहेत. जिल्ह्यातील १ हजार ९१२ महसूली गावांपैकी २५१ गावे कोरोनामुक्त झाली असून, या गावांमध्ये सद्यस्थितीत एकही कोरोना रुग्ण नाही. जिल्ह्यासाठी ही आशादायक चित्र आहे. रायगड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत आहेत.‌ सुरुवातीला पनवेल महानगर पालिका हद्दीत कोरोना रुग्ण आढळले. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काेराेना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली.  ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे प्रशासनासमोर आव्हान आहे. यासाठी प्रशासनाने चांगलीच कंबर कसली. सरकारने लागू केलेले निर्बंध तसेच उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच विविध उपाययोजना राबविण्यात आलेल्या आहेत.

प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांना ग्रामीण भागातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील गावे टप्प्याटप्प्याने कोरोना मुक्त होत असल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील ८१० ग्रामपंचायतींमध्ये १ हजार ९१२ महसूली गावे आहेत. त्यामधील १६२ ग्रामपंचायतींमधील २५१ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टसिंगचे पालन‌ करावे, वेळोवेळी सॅनिटायजरचा वापर करावा, गरम पाण्याचा वाफारा घ्यावा, गुळण्या कराव्यात, पात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, कोरोनाची लक्षणे असल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडण्याच्या सरासरी प्रमाणात झाली घट

रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रादुर्भाव रुग्ण सापडण्याचे सरासरी प्रमाण कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र दिसून येते. १५ मे रोजी जिल्ह्यात कोरोना चाचणी केलेल्या नगरिकांपैकी १९.५ टक्के नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होत होते. यामध्ये अत्ता घट झाली हाेत आहे. सध्या तपासणी केलेल्या नागरिकांपैकी १३ टक्के नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होत आहे.

ग्रामीण भागात राबविलेल्या उपाययोजना

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुचविलेल्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांवर अॅंटीजन चाचणी करण्यात येत आहे. गावोगावी आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून कोरोना लक्षणे आढळणाऱ्यांची अॅंटीजन चाचणी करण्यात येत आहे. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांची बाजारपेठ तसेच इतर ठिकाणी अॅंटीजन चाचणी करण्यात येते. या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांवर औषोधपाचार करण्यात येतात. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांच्या अखत्यारीत असलेल्या उपकेंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सरकारने केलेल्या सुचांनाची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करण्यात जनतेचा सहभाग महत्वाचा होता. यापुढेही नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करुन आपल्या जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करुया. नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे.

डॉ. किरण पाटील ( मुख्यकार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद)  तालुका :    महसूली गावे : कोरोनामुक्त गावेअलिबाग :        २२२ : ०पेण :             १५६ : ०पनवेल : १४७ : १०उरण : ६३ : ०कर्जत : १७८ : ५खालापूर : १३६ : ४०सुधागड : १०० : २९रोहा : ७३ : २२मुरुड : १७० : ७म्हसळा : १८२ : १९श्रीवर्धन : ५८ : १३माणगांव : ८० : ४९तळा : ७८ : ११महाड : १८३ : २९पोलादपूर : ८६ : १७एकूण : १९१२ : २५१ 

टॅग्स :Raigadरायगडcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस