शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

२५ दुर्मीळ हरणांना मिळाले घर

By admin | Updated: January 11, 2017 06:12 IST

उरण नौदलाच्या अनधिकृत डिअर पार्कमध्ये मृत्यूच्या कचाट्यात सापडलेल्या ६१ चितळ जातीच्या दुर्मीळ हरणांपैकी २५ हरणे आता सुरक्षिततेसाठी

उरण : उरण नौदलाच्या अनधिकृत डिअर पार्कमध्ये मृत्यूच्या कचाट्यात सापडलेल्या ६१ चितळ जातीच्या दुर्मीळ हरणांपैकी २५ हरणे आता सुरक्षिततेसाठी वैतरण परिमंडळ विभागातील कैरीपाडा येथे हलविली आहेत. या हरणांना नैसर्गिक आवासाची सवय व्हावी, यासाठी वनविभागाचे मागील पाच महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. डिअर पार्कमधील उर्वरित ३६ हरणेही संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आणि वनक्षेत्रात मुक्त संचारासाठी लवकरच स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती वाइल्ड लाइफ ठाणे वनविभागाचे उपवन संरक्षक दादासाहेब शेडगे यांनी दिली. उरण येथील नौदल अधिकाऱ्यांनी २४ वर्षांपूर्वी विरंगुळा म्हणून दुर्मीळ चितळ जातीच्या तीन हरणांच्या जोड्या राणीच्या बागेतून येथील नौदलाच्या डिअर पार्कमध्ये पाळण्यासाठी आणल्या होत्या. याठिकाणी हरणांना चारा पाणी देण्यासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी मनुष्यबळाचीही तजवीज नौदल अधिकाऱ्यांनी केली होती. मागील २४ वर्षांत हरणांची संख्या ६१ पर्यंत पोहोचली होती. पाळीव हरणांची संख्या बेसुमार वाढल्याने त्यांना स्वैरविहार करण्यासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. तसेच त्यांच्या चारा पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शिवाय देशाची सुरक्षा हेच महत्त्वाचे ध्येय असलेल्या नौदलाकडे हरणांच्या देखभालीकडे मनुष्यबळ वाढविण्यासाठी आर्थिक तरतूद नाही. त्यामुळे हरणांच्या देखाभालीकडे नौदलाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत स्थानिक वन अधिकाऱ्यांनीही वरिष्ठांकडे विचारणा करीत, दुर्मीळ हरणे सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मागील चार-पाच वर्षांपासून नौदल आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते. यासाठी नॅशनल पार्क, राणीची बाग येथील उद्यानातही हरणे स्थलांतरीत करण्यासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, अपुरी जागा आणि इतर काही तांत्रिक अडचणींमुळे डिअर पार्कमधील ही हरणे नैसर्गिक आवासात स्थलांतरीत करण्यात विलंब होत होता.