शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

२४० मत्स्य तलावांमध्ये प्रदूषण

By admin | Updated: October 22, 2015 00:10 IST

‘मत्स्य तळ््यांची गावे’ अलिबाग तालुक्यातील शहापूर, धेरंड, शहाबाज आणि पोयनाड या गावांतील सर्व २४० मत्स्यतळ््यांत गेल्या महिनाभरापासून अचानक मोठी रासायनिक

- जयंत धुळप, अलिबाग‘मत्स्य तळ््यांची गावे’ अलिबाग तालुक्यातील शहापूर, धेरंड, शहाबाज आणि पोयनाड या गावांतील सर्व २४० मत्स्यतळ््यांत गेल्या महिनाभरापासून अचानक मोठी रासायनिक प्रदूषणाची समस्या उद्भवल्याने या सर्व तळ््यांतील जिताडा माशांसह रोहू, कटला, मृगल, तिलापिया, खाऊल, कोळंबी या नकदी माशांची मोठ्या प्रमाणात मर्तुक सुरू झाली आहे. या सर्व गावांतील मत्स्योत्पादक शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.गेल्या महिनाभरात २४० मत्स्यतळी संवर्धक शेतकऱ्यांच्या तळ््यातील सद्य:स्थितीत ६०० रुपये विक्री भाव असलेल्या जिताडा या माशाचे प्रत्येक तळ््यात २०० किलो याप्रमाणे एकूण ४८ हजार किलो जिताडा माशांची मर्तुक झाल्याने गेल्या महिनाभरात प्राथमिक अंदाजानुसार एकूण २ कोटी ८८ लाख रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले असल्याची माहिती धामणपाडा शहाबाज येथील मत्स्य तलावधारक व मत्स्यसंवर्धक डॉ. विष्णू पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.शहापूर, शहाबाज व पोयनाड ग्रामपंचायत हद्दीतील बहुतांश शेतकरी शेततलावांत आणि भातखाचरांमध्ये माशांचे संवर्धन व विक्री व्यवसाय गेल्या कित्येक वर्षांपासून पिढ्यान्पिढ्या करीत आहेत. स्थानिक बाजारपेठेसह या माशांना पुण्या-मुंबईतही मागणी असल्याने आता पुण्या-मुंबईतही हे मासे पोहोचू लागले व स्थानिक पातळीवर रोजगाराचे मोठे साधन उपलब्ध झाले आहे. मात्र या प्रदूषण समस्येमुळे स्थानिक पातळीवर उपलब्ध रोजगार साधनालाच घरघर लागली आहे.खारभूमी विभागाच्या बेफिकिरी व दुर्लक्षामुळे समुद्राचे खारेपाणी शेतात, तलावात शिरते. पीएनपी जेट्टी, जेएसडब्लू स्टील व अन्य कंपन्यांच्या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम माशांवर होत आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांस नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी डॉ. विष्णू पाटील, प्रवीण म्हात्रे, संदेश शेळके, अरुण धुमाळ, सदानंद पाटील यांनी साहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयासह जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अलिबाग तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.प्रदूषणामुळेच मत्स्य मर्तुकशेतकऱ्यांच्या तक्रारी पोहोचल्यावर मत्स्य व्यवसाय आयुक्तालयाच्या तज्ज्ञांनी या २४० बाधित मत्स्यतळ््यांपैकी केवळ १० तळ््यांची पाहणी केली. माशांची मर्तुक तळ््यात आलेल्या तेलकट तवंगामुळे झाली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष मत्स्यव्यवसाय आयुक्तालयाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.गेल्या सप्टेंबर महिन्यापासून या माशांची प्रदूषणामुळे मर्तुक सुरू झाली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मत्सोत्पादक शेतकऱ्यांनी २८ सप्टेंबरला तोंडी व १८ आॅक्टोबरला साहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयास लेखी तक्रार देऊन नुकसान भरपाईची मागणी केली.-------------------------------वडाळे तलावात आढळले मृत मासेपनवेल : येथील वडाळे तलावात पालिकेच्या दुर्लक्षामुळे शेकडो मासे मृत्युमुखी पडले आहेत. मंगळवारी (२० आॅक्टोबर) तलावात शेकडो मासे मृत झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. पाणी दूषित होऊन या ठिकाणचे मासे मृत्युमुखी पडत आहेत.2पालिका तलावाकडे लक्ष देत नसल्याची तक्र ार येथील नागरिक करत आहेत. दूषित पाण्यामुळे मासे मृत झाले नसून, वाढत्या तापमानामुळे या माशांचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य निरीक्षक दिलीप कदम यांनी सांगितले.