शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

उरणमधील २४ गावे तीन दिवसांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:41 IST

शेकडो घरांची पडझड : ग्रामस्थांच्या मदतीने वीज खांबांवर पडलेली झाडे काढण्याचे काम सुरू

उरण : तीन दिवसांपूर्वी आलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात विजेचे पोल, विद्युत तारा, ट्रान्सफार्मर उरण तालुक्यात २४ गावे तीन दिवसांपासून अंधारात बुडाली आहेत. त्याचप्रमाणे, शेकडो घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, विविध ठिकाणी किती झाडे उन्मळून पडली आहेत. या वादळात उरणकरांची लाखो रुपयांची हानी झाली असल्याचा प्राथामिक अंदाज उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी व्यक्त केला आहे.

बुधवारी दुपारी चक्रीवादळाच्या तडाख्यात उरण तालुक्यातील शेकडो घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये पडझड झालेल्या आणि घरांवरील पत्रे, कौले उडालेल्या घरांचाही समावेश आहे. अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले होते. आतापर्यंत तालुक्यातील नुकसान झालेल्या १३९ घरांची तपशील उरण तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. माहिती घेण्याचे काम सुरू असून, यामध्ये नुकसानग्रस्त घरांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता उरण नायब तहसीलदार संदीप खोमणे यांनी व्यक्त केली आहे. रौद्ररूप धारण केलेल्या वादळाने उरण परिसरातील अनेक ठिकाणी असलेली सुमारे हजारो झाडे मुळासकट उखडून टाकली आहेत. काही झाडे आणि फांद्या थेट विद्युत पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यांवर कोसळली आहेत. यामुळे उच्च दाबाच्या आणि गावोगावी वीजपुरवठा करणाºया अनेक विद्युत तारा तुटल्या आहेत.१७ फीडरचे नुकसान : उरण परिसरात झाडे आणि झाडांच्या फांद्या विद्युत पुरवठा करणाºया वीज वाहिन्यांवर कोसळल्याने उच्च दाबाच्या अनेक विद्युत तारा तुटल्या आहेत. १७ फीडरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. १७ पैकी १५ फीडरचे दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. वीज वितरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामात गुंतले आहेत. या कामी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मनुष्यबळाचीही मदत मिळत असल्याची माहिती उरण महावितरण विभागाचे उपअभियंता हरिदास चोंडी यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड