शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

रायगड जिल्ह्यातील एक लाख घरगुती गणरायांना २१ लाख मोदकांचा नैवेद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 22:23 IST

आपल्या घरच्या मुक्कामात बाप्पांची मनोभावे पूजाअर्चा सेवा करुन त्यांना अत्यंत संतूष्ट करण्याकरीता गरिब असो वा श्रीमंत असो प्रत्येक कोकणवासीय सर्वते प्रयत्न करीत असतो. 

- जयंत धुळप

रायगड, दि. 25 - तमाम कोककवासीयांचे गणपती हे आराध्य दैवत. गणेश चतूर्थीच्या दिवशी आगमन होवून, दिड दिवस,पाच दिवस, गौरी विसर्जन, वामनद्वादशी, अनंतचतूर्दशी आणि एकविस दिवसांच्या मुक्कामाअंती बाप्पा आपल्या गावाला परत जातात. या त्यांच्या आपल्या घरच्या मुक्कामात बाप्पांची मनोभावे पूजाअर्चा सेवा करुन त्यांना अत्यंत संतूष्ट करण्याकरीता गरिब असो वा श्रीमंत असो प्रत्येक कोकणवासीय सर्वते प्रयत्न करीत असतो. 

त्याच प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे गणेशआगमनाच्या दिवशी बाप्पाला पहिला नैवेद्य तांदळाच्या उकडीच्या २१ मोदकांचाच असतो. गेल्या कित्येक वर्षांची ही परंपरा आणि प्रथा आहे. याच उकडीच्या २१ मोदकांच्या परंपरेच्या अनुशंगाने आज वेध घेतला असता एक अत्यंत रोचक माहिती उपलब्ध झाली आणि ती म्हणजे रायगड जिल्ह्यात शुक्रवारी गणेशआगमनाच्या दिवशी गणरायांना तब्बल २१ लाख तांदळाच्या उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखविण्यात आला.

वर्षभराच्या तांदळाची सोय बाप्पाच करुन देतारायगड जिल्ह्यात एक लाखा पेक्षा अधिक घरगूती गणपती तर २७५ सार्वजनिक गणपती आहेत. रायगड सह संपूर्ण कोकणात जी भाताची वा तांदळाची शेती होते, ती गणपती बाप्पांच्याच आशिर्वादाने होते आणि आपल्याला वर्षभर तांदूळ कधीही तो कमी पडू देत नाही,अशी श्रद्धा कोकणातील भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची अनेक पिढ्यान पिढ्यांची आहे.  जो बाप्पा आपल्या वर्षभराच्या तांदळाची सोय करुन देतो, त्याला त्याच्या आगमनाच्या पहिल्या दिवशी आपल्या शेतात पिकलेल्या तांदळाच्या पिठाची उकड काढून त्या पासून तयार केलेल्या २१ मोदकांचा नैवेद्य दाखविण्याची ही परंपरा जन्मास आली. या उकडीच्या मोदकात किनाऱ्यावरील नारळाचे खोबरे आणि गूळ यांचे सारण असते. आणि उकडीचा मोदक बाप्पाला खूप आवडतो अशीही मोठी श्रद्धा आहे.