शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

१९९ बोटी अद्याप रायगडात परतल्या नाहीत, ‘ओखी’च्या चक्रव्यूहामध्ये अडकण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:53 IST

‘ओखी’ वादळाने केरळ आणि तामिळनाडू राज्यांना चांगलाच तडाखा देत, हाहाकार उडवल्यानंतर आता ते महाराष्ट्राच्या दिशेन घोंघावत निघाले आहे.

आविष्कार देसाईअलिबाग : ‘ओखी’ वादळाने केरळ आणि तामिळनाडू राज्यांना चांगलाच तडाखा देत, हाहाकार उडवल्यानंतर आता ते महाराष्ट्राच्या दिशेन घोंघावत निघाले आहे. सोमवार, मंगळवार असे सलग दोन दिवस हे वादळ तेथे थैमान घालणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचा फटका कोकणसह मुंबईलाही बसणार आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यातील २५० मच्छीमार बोटींपैकी १९९ बोटी खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी गेल्याने त्या अद्याप परतलेल्या नाहीत. त्या बोटी लवकर परत न आल्यास ओखीच्या चक्रव्यूहामध्ये अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.केरळ आणि तामिळनाडू राज्यामध्ये ‘ओखी’ वादळामुळे आतापर्यंत १४ जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्राच्या दिशेने ताशी ६० किलोमीटर वेगाने निघालेले हे वादळ कोकणासह मुंबईत सोमवार आणि मंगळवार या दिवशी घोंघावणार आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन तसेच तटरक्षक दलाने गोव्यापासून डहाणूपर्यंत हाय अलर्ट जारी केला आहे.रायगड जिल्ह्यामध्ये तब्बल एक हजार ९८३ यांत्रिक बोटी आहेत, तर बिगरयांत्रिक बोटींची संख्याही १११ आहे. २५० बोटी या मासेमारी करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच खोल समुद्रामध्ये गेल्या आहेत. त्यापैकी १९९ बोटी समुद्रामध्येच आहेत. त्यांना माघारी बोलावण्यासाठी संदेश पाठवले आहेत. मात्र, ते अद्यापही परतले नाहीत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच गुजरात राज्यापर्यंत मासेमारी करण्यासाठी येथून बोटी जातात. अचानक ओखीने तडाखा दिल्याने समुद्रामध्ये अडकलेल्या बोटींवरील खलाशांसह कर्मचाºयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्यातील सुमारे १३० बोंटीवरच वायरलेस यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. खोल समुद्रात बोटी असल्याने मोबाइलवर संपर्क साधणे कठीण जात आहे. त्यामुळे ज्या बोटींना ओखीच्या तडाख्याचा संदेश प्राप्त झाला आहे. त्यांच्यामार्फत उर्वरित बोटींना संदेश पोहोचण्याची वाट बघण्यावाचून काहीच पर्याय प्रशासनाकडे राहिलेला नाही.सोमवारपासून पुढील ४८ तास जिल्ह्यासाठी हाय अलर्ट देण्यात आला आहे. समुद्रामध्ये जाण्यास तसेच मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे. या कालावधीमध्ये समुद्र खवळलेला राहणार आहे, तसेच पाऊसही पडण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे.- सागर पाठक,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगडताशी ६० किलोमीटर वेगाने निघालेले वादळ कोकणात सोमवार, मंगळवारी घोंघावणारहवामान खात्याने ओखी वादळासंदर्भात दिलेल्या इशाºयानंतर रायगडमधील सर्व मच्छीमार संस्थांना सर्तकतेच्या सूचना दिल्या आहेत. रायगडच्या समुद्रामध्ये २५० बोटी या मासेमारी करण्यासाठी गेल्या आहेत. त्यातील ५१ परत आल्या आहेत, तर १९९ बोटी अद्यापही समुद्रामध्ये आहेत. त्यांच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समुद्रामध्ये मासेमारी करण्यास मज्जाव केला आहे. समुद्रकिनारी राहणाºया नागरिकांनीही सतर्क राहावे.- अविनाश नाखवा, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय‘ओखी’च्या तडाख्यामुळे पुढील तीन दिवस समुद्र खवळलेला असल्याने समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे समुद्रकिनारी असलेली घरे, हॉटेल्स, कॉटेज यांनीही दक्ष राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.१रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे ८० मच्छीमार संस्था आहेत. त्यांच्याकडे छोट्या-मोठ्या अशा एकूण एक हजार ९८३ बोटी आहेत. सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभागाने त्यांचा एक वॉटस् अ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. त्यांच्यामार्फतही त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शक्य होईल तेवढ्या लवकर माघारी येण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. २रायगड जिल्ह्यामध्ये विशेष करून अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. पर्यटकांच्या मनोरंजनासाठी समुद्र सफरीसाठी तैनात केलेल्या स्पीड बोटी, बनना बोट, एटीव्ही असे विविध साहित्य समुद्रकिनाºयावरून हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, असे अलिबाग बीच स्पीड बोटिंग क्लबचे प्रकाश भगत यांनी सांगितले. 

टॅग्स :fishermanमच्छीमार