शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

१६ कोटींची थकबाकी, महावितरणची धडक कारवाई; रायगड जिल्ह्यातून १ हजारांहून गावात अंधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 00:39 IST

ग्रामीण भागात झाला काळोख; पथदिवे बंद : कर्जत तालुक्यात महावितरणची १६ कोटींची थकबाकी

कर्जत : ग्रामीण भागातील रस्त्यांवरील रात्रीच्या वेळी अंधार दूर करणारे पथदिवे गेले काही दिवस बंद आहेत. रायगड जिल्हा परिषदेने त्या पथदिव्यांच्या बिलाची थकबाकी रक्कम भरली नाही. त्यामुळे वीज पुरवठा खंडित केल्याने सर्व पथदिवे बंद आहेत. दरम्यान, नेरळसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये पथदिव्यांवरून राजकारण तापले असून कर्जत तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींमधील महावितरण कंपनीची थकबाकीची रक्कम तब्बल १६ कोटींच्या घरात आहे.

ग्रामीण भागातील पथदिव्यांचा पथकर ग्रामपंचायत कराच्या पावतीत समाविष्ट असतो, मात्र त्या पथदिव्यांचे वीज बिल रायगड जिल्हा परिषद भरते. त्या वीज बिलाची कोटींच्या घरातील थकबाकी महावितरण कंपनीकडे रायगड जिल्हा परिषदेने जमा केली नाही. त्यामुळे १५ मार्च रोजी महावितरण कंपनीने रायगड जिल्ह्यातील १ हजार ९० ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्या काळोखाने जिल्ह्यात गावागावात राजकारण तापले असून, नेरळ या सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीमधील पथदिवे राजकारणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. मोठी लोकवस्ती, नागरीकरण आणि मोठी बाजारपेठ यामुळे नेरळ ग्रामपंचायतीला महत्त्व आहे; मात्र त्याच नेरळ ग्रामपंचायतीमधील विजेचे पथदिवे रायगड जिल्हा परिषदेने बंद केल्याने नेरळ ग्रामपंचायत टीकेची धनी झाली आहे.

नेरळ ग्रामपंचायतीने जाहीर फलक लावून पथदिव्यांचे बिल रायगड जिल्हा परिषद भरते. त्यांनी वीज बिल भरले नसल्याने पथदिवे बंद आहेत, असे जाहीर निवेदन दिले आहे. परिणामी येथील सोशल मीडिया ग्रुपवर नेरळमधील राजकारण तापले असून नेरळ ग्रामपंचायत कसा भ्रष्टाचार करीत आहे आणि त्यात रस्त्यावरील  दिव्यांच्या मुद्द्याचा भर पडला आहे. दुसरीकडे कर्जत तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींमधील विजेची थकबाकी तब्बल १६ कोटींपर्यंत गेली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या पथदिव्यांची वीज महावितरणने खंडित केली आहे, मात्र त्या वेळी महावितरणला ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विजेच्या खांबांवर २४ तास विजेचे दिवे सुरू असल्याचे लक्षात आले. त्या दिव्यांवरही महावितरणने कारवाई करीत थकबाकी भरा आणि विजेचा पुरवठा सुरू करा, अशी भूमिका घेतली आहे.

आम्ही आठ महिन्यांपूर्वी रायगड जिल्हा परिषदेशी पथदिव्यांच्या वीज बिलाबाबत चर्चा केली होती. त्यांना मागील थकबाकी तुम्ही भरा, पुढचे चालू बिल आम्ही भरतो, असे सांगितले होते, मात्र आतापर्यंत जिल्हा परिषदने वीज बिल थकबाकी भरली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याच वेळी विरोधक अर्धवट माहितीच्या आधारे पथदिव्यांचे वीज बिल भरले नाही म्हणून आमच्यावर आरोप करीत आहेत.- रावजी शिंगवा, सरपंच, नेरळ

आमच्या मुख्य कार्यालयाकडे ग्रामीण भागातील रस्त्यावर असलेल्या पथदिव्यांच्या विजेच्या बिलापोटी थकबाकीची रक्कम रायगड जिल्हा परिषदेने भरलेली नाही. त्यात सध्याच्या महिन्यापर्यंतची थकबाकी पाहिली असता ती १६ कोटींपेक्षा जास्त आहे. जोपर्यंत शासन स्तरावर निर्णय होऊन जिल्हा परिषदेकडून थकबाकीची रक्कम भरली जात नाही, तोपर्यंत पथदिव्यांची वीज पूर्ववत होणार नाही. - गणेश देवके, उपअभियंता, महावितरण, कर्जत

टॅग्स :mahavitaranमहावितरण