शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

15 टक्के रुग्ण 18 वर्षांखालील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 23:59 IST

रायगडमधील स्थिती; वारंवार लसीकरण बंद ठेवावे लागत असल्याने नाराजी 

- निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात १५ टक्के रुग्ण १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे असून त्यांना वेळेत लस मिळणार की नाही याविषयी साशंकता आहे. तर ३५ टक्के रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी असून त्यांना लसीकरणासाठी १ मेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे, परंतु तुटवड्यामुळे वारंवार लसीकरण बंद ठेवावे लागत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रायगड जिल्ह्यात आतापर्यंत ९३ हजार ४० नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे सर्वांना लस उपलब्ध करून देण्याची मागणी होऊ लागली आहे. सद्य:स्थितीमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे.मंगळवारपर्यंत १ लाख ९५ हजार ८८३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या पाहता लसीकरणाची गती हीच राहिली तर सर्वांना लस मिळण्यासाठी जवळपास एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. यामुळे सर्वांना गतीने लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

कोरोनाची सर्वाधिक लागण तरुणांना होत आहे. परंतु त्यांना अद्याप लस दिली जात नाही. एकूण रुग्णांपैकी १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेले १५ टक्के रुग्ण आहेत. पण, या वयोगटातील नागरिकांना लस मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.शहरातील तब्बल ३५ टक्के रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. या वयोगटातील नागरिकांना १ मेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यात ४५ वर्षांवरील ५० टक्के रुग्ण असून त्यांच्यासाठी लसीकरण सुरू आहे. परंतु त्या सर्वांनाही वेळेत लस मिळत नाही. पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्यामुळे वारंवार लसीकरण थांबवावे लागत आहे. नियमित व सर्व वयोगटातील नागरिकांना लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

रायगड जिल्ह्यात सर्वाधिक १७ ते ५८ वर्षांमधील तब्बल ७० हजार रुग्ण जिल्ह्यात सर्वाधिक १७ ते ५८ वर्षांमधील रुग्ण आहेत. आतापर्यंत या वयोगटातील तब्बल सत्तर हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या वयोगटातील नागरिक नोकरी, व्यवसायासाठी नेहमी बाहेर असतात. यामुळे त्यांना कोरोनाची लागण होत आहे. सरकारने १८ वर्षांवरील नागरिकांना १ मेपासून लस देण्याचे जाहीर केले आहे. परंतु सद्य:स्थितीमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांना लस पुरवितानाच दमछाक होत असून १८ वर्षांवरील नागरिकांसाठी पुरेसी लस मिळणार का, याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.१८ वर्षांखालील ५ हजार रुग्णरायगड जिल्ह्यामध्ये लहान मुलांमध्येही कोरोनाची लागण वाढत आहे. आतापर्यंत १८ वर्षांच्या आतमधील तब्बल पाच हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्याचा रेषो पाहता मुलांमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही जास्त असले तरी या वयात गंभीर आजार झाल्यामुळे त्याचा परिणाम भविष्यातही त्यांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे. यामुळे लहान मुलांनाही लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

लहान मुलांची काळजी अधिक घ्यावी लागणारnरायगड जिल्ह्यातील १८ वर्षांवरील मुलांना लस देण्यासाठीची कार्यवाही १ मेपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.nमुलांना काम नसेल तर घराबाहेर जाण्यास मंजुरी देऊ नये. त्यांचा आहार व व्यायामावर लक्ष द्यावे. गर्दीच्या ठिकाणी मुले जाणार नाहीत याचीही काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या