शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून १४८ शेतकरी वंचित; विमा कंपनीचा भोंगळ कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 23:30 IST

शेतकºयांनी सन २०१७/२०१८ यावर्षी प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत आंबा विम्याचे पैसे भरले होते, तरी हे पैसे सप्टेंबर २०१८ पर्यंत शेतकºयांना मिळणे गरजेचे होते

पाली : स्टेट बँक, विमा कंपनीचा भोंगळ कारभार उघडकीस आला असून, प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून १४८ शेतकरी वंचित असल्याचा प्रकार घडल्याने सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

सुधागड-पाली तालुक्यांतील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यास विलंब लागल्याने बळीराजा शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांचे विषय लक्षात घेऊन न्याय मिळविण्यासाठी संबंधित स्टेट बँक आॅफ इंडिया पाली शाखा, कृषी व तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. त्या वेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष विलास उतेकर यांनी संबंधित अधिकाºयांना फसल पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यास विलंब का झाला, त्या वेळी स्टेट बँके च्या व्यवस्थापकांनी विमा कंपनीच्या हलगर्जीमुळे हा प्रकार घडला आहे, असे सांगितले.

त्यावर विमा कंपनीच्या अधिकाºयांचे म्हणणे आले की, कालावधीदरम्यान स्टेट बँकेने कागदपत्र न दिल्याने हा प्रकार घडला आहे. स्टेट बँक व विमा कंपनीचा भोंगळ कारभार लक्षात आल्याने पाली तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पीक विमा योजनेचा शेतकºयांना लाभ मिळण्यास विलंब झाला आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर स्टेट बँक व विमा कंपनी यांना नोटीस काढून बोलाविण्यात आले. त्या वेळी कागदपत्रांची माहिती मागविण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आले की, स्टेट बँकेच्या हलगर्जीमुळेच सुधागड तालुक्यातील १४८ शेतकºयांना फसल पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यास विलंब लागला आहे. त्यावर १४८ शेतकºयांना ५८ लाख ३० हजार ५१८ इतकी रक्कम स्टेट बँकेने द्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निकालाद्वारे म्हटले आहे.

शेतकºयांनी सन २०१७/२०१८ यावर्षी प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत आंबा विम्याचे पैसे भरले होते, तरी हे पैसे सप्टेंबर २०१८ पर्यंत शेतकºयांना मिळणे गरजेचे होते; परंतु २०२० लागला तरी शेतकºयांना या विमा योजनेचा लाभ मिळाला नाही, असे असतानाही स्टेट बँक व विमा कंपनी शेतकºयांची दिशाभूल करत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या आत पैसे स्टेट बँकेने व विमा कंपनीने न दिल्यास शेतकरी पाली येथील स्टेट बँके समोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.मी, पीक विमा सन २०१७ ला भरला, त्यानंतर आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या योजनेचा मला लाभ मिळेल; परंतु दोन वर्षे झाली तरी ८८ हजार ५०० रुपये विम्याची रक्कम मिळाली नाही. - सदानंद कोंडे, शेतकरी.जिल्हाधिकारी यांच्या निकालानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेची रक्कम शेतकºयांना मिळवून देण्यासाठी आमच्या वरिष्ठांकडून प्रक्रिया सुरू आहे. - नितीन म्हात्रे, व्यवस्थापक, स्टेट बँक आॅफ इंडिया, पालीशेतकºयांना फेब्रुवारी अखेरपर्यंत जर पैसे मिळाले नाही तर तालुक्यातील सर्व शेतकरी एकत्र येऊन स्टेट बँकेच्या समोर धरणे आंदोलन करू. - विलास उतेकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष.

टॅग्स :Farmerशेतकरी