शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून १४८ शेतकरी वंचित; विमा कंपनीचा भोंगळ कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 23:30 IST

शेतकºयांनी सन २०१७/२०१८ यावर्षी प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत आंबा विम्याचे पैसे भरले होते, तरी हे पैसे सप्टेंबर २०१८ पर्यंत शेतकºयांना मिळणे गरजेचे होते

पाली : स्टेट बँक, विमा कंपनीचा भोंगळ कारभार उघडकीस आला असून, प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून १४८ शेतकरी वंचित असल्याचा प्रकार घडल्याने सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

सुधागड-पाली तालुक्यांतील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यास विलंब लागल्याने बळीराजा शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांचे विषय लक्षात घेऊन न्याय मिळविण्यासाठी संबंधित स्टेट बँक आॅफ इंडिया पाली शाखा, कृषी व तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. त्या वेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष विलास उतेकर यांनी संबंधित अधिकाºयांना फसल पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यास विलंब का झाला, त्या वेळी स्टेट बँके च्या व्यवस्थापकांनी विमा कंपनीच्या हलगर्जीमुळे हा प्रकार घडला आहे, असे सांगितले.

त्यावर विमा कंपनीच्या अधिकाºयांचे म्हणणे आले की, कालावधीदरम्यान स्टेट बँकेने कागदपत्र न दिल्याने हा प्रकार घडला आहे. स्टेट बँक व विमा कंपनीचा भोंगळ कारभार लक्षात आल्याने पाली तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पीक विमा योजनेचा शेतकºयांना लाभ मिळण्यास विलंब झाला आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर स्टेट बँक व विमा कंपनी यांना नोटीस काढून बोलाविण्यात आले. त्या वेळी कागदपत्रांची माहिती मागविण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आले की, स्टेट बँकेच्या हलगर्जीमुळेच सुधागड तालुक्यातील १४८ शेतकºयांना फसल पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यास विलंब लागला आहे. त्यावर १४८ शेतकºयांना ५८ लाख ३० हजार ५१८ इतकी रक्कम स्टेट बँकेने द्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निकालाद्वारे म्हटले आहे.

शेतकºयांनी सन २०१७/२०१८ यावर्षी प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत आंबा विम्याचे पैसे भरले होते, तरी हे पैसे सप्टेंबर २०१८ पर्यंत शेतकºयांना मिळणे गरजेचे होते; परंतु २०२० लागला तरी शेतकºयांना या विमा योजनेचा लाभ मिळाला नाही, असे असतानाही स्टेट बँक व विमा कंपनी शेतकºयांची दिशाभूल करत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या आत पैसे स्टेट बँकेने व विमा कंपनीने न दिल्यास शेतकरी पाली येथील स्टेट बँके समोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.मी, पीक विमा सन २०१७ ला भरला, त्यानंतर आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या योजनेचा मला लाभ मिळेल; परंतु दोन वर्षे झाली तरी ८८ हजार ५०० रुपये विम्याची रक्कम मिळाली नाही. - सदानंद कोंडे, शेतकरी.जिल्हाधिकारी यांच्या निकालानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेची रक्कम शेतकºयांना मिळवून देण्यासाठी आमच्या वरिष्ठांकडून प्रक्रिया सुरू आहे. - नितीन म्हात्रे, व्यवस्थापक, स्टेट बँक आॅफ इंडिया, पालीशेतकºयांना फेब्रुवारी अखेरपर्यंत जर पैसे मिळाले नाही तर तालुक्यातील सर्व शेतकरी एकत्र येऊन स्टेट बँकेच्या समोर धरणे आंदोलन करू. - विलास उतेकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष.

टॅग्स :Farmerशेतकरी