शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आता हायड्रोजन बॉम्ब येणार; नरेंद्र मोदी देशाला तोंड दाखवू शकणार नाहीत', राहुल गांधींचा हल्ला
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
3
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
4
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
5
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
6
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
7
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
8
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
9
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
10
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
11
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
12
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
13
मराठा आंदोलन: शिंदे गटाचे अर्जुन खोतकर आझाद मैदानात, घेतली मनोज जरांगेंची भेट; म्हणाले... 
14
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
15
"राष्ट्रीय पुरस्कार, आपली अपूर्ण इच्छा पूर्ण झाली...", किंग खानने राणीसोबत केलं रील, चाहते खूश
16
मराठा आंदोलन: सुट्टी असूनही मुंबई हायकोर्ट उघडले; जरांगेंविरोधातील याचिकेवर तातडीची सुनावणी
17
चीनमध्ये भारताचा पाकिस्तानला धक्का! SCO च्या जाहीरनाम्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एकमताने निषेध
18
येत्या रविवारी खग्रास चंद्रग्रहण; 'या' वेळेत दिसणार अद्भुत लाल चंद्र! भारतातूनही पाहता येणार
19
पितृपक्षापूर्वीच करा लिंबाची खरेदी; नाही तर जास्त पैसे मोजा!
20
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण सुरुच राहणार; इथेनॉलमुक्त पेट्रोलची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

‘तळीये’तील १३५ घरे अपूर्ण, तीन वर्षांनंतरही ग्रामस्थांना निवाऱ्याची प्रतीक्षा; आतापर्यंत ९२ घरांचे काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 07:55 IST

२२ जुलै २०२१ रोजी महाड तालुक्यातील तळीये आणि पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, सुतारवाडी गावांवर दरड कोसळली होती. तळीये दुर्घटनेत ८४ जणांना जीव गमवावा लागला होता.

अलिबाग :  महाड तालुक्यातील दरडग्रस्त तळीये गावाचे पुनर्वसन तीन वर्षांपासून रखडले आहे. सध्या येथे ९२ घरे पूर्ण झाली असून, ६६ जणांना हक्काची घरे मिळाली असली तरी १३५ घरांची कामे अपूर्ण आहेत.

२२ जुलै २०२१ रोजी महाड तालुक्यातील तळीये आणि पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, सुतारवाडी गावांवर दरड कोसळली होती. तळीये दुर्घटनेत ८४ जणांना जीव गमवावा लागला होता. तर केवनाळे, सुतारवाडीत ११ जण गाडले होते. या दुर्घटनेनंतर शासनाने तळीयेसह पाच वाड्यांचे म्हाडामार्फत पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी २७१ घरांची पायाभरणी करण्यास सुरुवात झाली. तीन वर्षांत फक्त ९२ घरांची उभारणी झाली.

‘म्हाडा’तर्फे २६३ सदनिकांच्या बांधकामास निविदेद्वारे मंजुरी दिली. त्यानंतर कामे सुरू झाली. २७१ पैकी २२७ घरे सध्या बांधली जाणार आहेत. २२७ सदनिकांच्या भूखंडापैकी २७ सदनिकांच्या जागेवर कंटेनर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या २०० सदनिकांचे काम सुरू आहे. २०० पैकी सद्य:स्थितीत पहिल्या टप्प्यात ६६ तर दुसऱ्या टप्प्यातील २६, असे एकूण ९२ सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यातील ६६ जणांना घराच्या चाव्या देण्यात आलेल्या आहेत.

इर्शाळवाडीचेच पुनर्वसन पूर्ण

खालापूरमधील इर्शाळवाडी या आदिवासी वाडीवर १९ जुलै २०२३च्या रात्री दरड कोसळली. यात २७ जणांचा मृत्यू झाला. तर शोध न लागल्याने ८४ जणांचा शासनाने मृत घोषित केले. त्यानंतर ४४ कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

चौकमधील मानिवली येथे अडीच हेक्टर जागेत ४४ घरे बांधली. आपदग्रस्त कुटुंबांना ३ गुंठे जागेवर सिडकोच्या माध्यमातून ही घरे बांधून दिली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १२ दरड घटना घडल्या. यापैकी इर्शाळवाडी ग्रामस्थांचे पुनर्वसन पूर्ण करण्यात यश आले. तर, तळीये, केवनाळे, साखर सुतारवाडी, जुई, दासगाव आणि इतर ठिकाणचे पुनर्वसन अद्याप  रखडलेले आहे.

भौगोलिक सर्वेक्षण रखडले

तळीये गावातील एका वाडीने पुनर्वसन करू नका, असा ठराव दिलेला आहे. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी भौगोलिक सर्वेक्षण करून निर्णय घेऊ, असे म्हटले होते. मात्र, अजूनही भौगोलिक सर्वेक्षण झालेले नाही.

तळीये ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. २२७ पैकी ९२ सदनिका पूर्ण होऊन ६६ घरांचे वाटप झाले आहे. १३५ सदनिकांचे काम सुरू आहे. ४४ सदनिका या एका गावाने पुनर्वसन करण्यास नकार दिल्याने थांबले आहे. भौगोलिक सर्वेक्षणानंतर निर्णय घेतला जाणार आहे.

महेश शितोळे, तहसीलदार, महाड