शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
2
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
3
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
4
"माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
5
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
6
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
7
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
8
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
9
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
10
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
11
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
12
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
13
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
15
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
16
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
17
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
18
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
19
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
20
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
Daily Top 2Weekly Top 5

‘तळीये’तील १३५ घरे अपूर्ण, तीन वर्षांनंतरही ग्रामस्थांना निवाऱ्याची प्रतीक्षा; आतापर्यंत ९२ घरांचे काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 07:55 IST

२२ जुलै २०२१ रोजी महाड तालुक्यातील तळीये आणि पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, सुतारवाडी गावांवर दरड कोसळली होती. तळीये दुर्घटनेत ८४ जणांना जीव गमवावा लागला होता.

अलिबाग :  महाड तालुक्यातील दरडग्रस्त तळीये गावाचे पुनर्वसन तीन वर्षांपासून रखडले आहे. सध्या येथे ९२ घरे पूर्ण झाली असून, ६६ जणांना हक्काची घरे मिळाली असली तरी १३५ घरांची कामे अपूर्ण आहेत.

२२ जुलै २०२१ रोजी महाड तालुक्यातील तळीये आणि पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, सुतारवाडी गावांवर दरड कोसळली होती. तळीये दुर्घटनेत ८४ जणांना जीव गमवावा लागला होता. तर केवनाळे, सुतारवाडीत ११ जण गाडले होते. या दुर्घटनेनंतर शासनाने तळीयेसह पाच वाड्यांचे म्हाडामार्फत पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी २७१ घरांची पायाभरणी करण्यास सुरुवात झाली. तीन वर्षांत फक्त ९२ घरांची उभारणी झाली.

‘म्हाडा’तर्फे २६३ सदनिकांच्या बांधकामास निविदेद्वारे मंजुरी दिली. त्यानंतर कामे सुरू झाली. २७१ पैकी २२७ घरे सध्या बांधली जाणार आहेत. २२७ सदनिकांच्या भूखंडापैकी २७ सदनिकांच्या जागेवर कंटेनर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या २०० सदनिकांचे काम सुरू आहे. २०० पैकी सद्य:स्थितीत पहिल्या टप्प्यात ६६ तर दुसऱ्या टप्प्यातील २६, असे एकूण ९२ सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यातील ६६ जणांना घराच्या चाव्या देण्यात आलेल्या आहेत.

इर्शाळवाडीचेच पुनर्वसन पूर्ण

खालापूरमधील इर्शाळवाडी या आदिवासी वाडीवर १९ जुलै २०२३च्या रात्री दरड कोसळली. यात २७ जणांचा मृत्यू झाला. तर शोध न लागल्याने ८४ जणांचा शासनाने मृत घोषित केले. त्यानंतर ४४ कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

चौकमधील मानिवली येथे अडीच हेक्टर जागेत ४४ घरे बांधली. आपदग्रस्त कुटुंबांना ३ गुंठे जागेवर सिडकोच्या माध्यमातून ही घरे बांधून दिली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १२ दरड घटना घडल्या. यापैकी इर्शाळवाडी ग्रामस्थांचे पुनर्वसन पूर्ण करण्यात यश आले. तर, तळीये, केवनाळे, साखर सुतारवाडी, जुई, दासगाव आणि इतर ठिकाणचे पुनर्वसन अद्याप  रखडलेले आहे.

भौगोलिक सर्वेक्षण रखडले

तळीये गावातील एका वाडीने पुनर्वसन करू नका, असा ठराव दिलेला आहे. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी भौगोलिक सर्वेक्षण करून निर्णय घेऊ, असे म्हटले होते. मात्र, अजूनही भौगोलिक सर्वेक्षण झालेले नाही.

तळीये ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. २२७ पैकी ९२ सदनिका पूर्ण होऊन ६६ घरांचे वाटप झाले आहे. १३५ सदनिकांचे काम सुरू आहे. ४४ सदनिका या एका गावाने पुनर्वसन करण्यास नकार दिल्याने थांबले आहे. भौगोलिक सर्वेक्षणानंतर निर्णय घेतला जाणार आहे.

महेश शितोळे, तहसीलदार, महाड