शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

‘तळीये’तील १३५ घरे अपूर्ण, तीन वर्षांनंतरही ग्रामस्थांना निवाऱ्याची प्रतीक्षा; आतापर्यंत ९२ घरांचे काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 07:55 IST

२२ जुलै २०२१ रोजी महाड तालुक्यातील तळीये आणि पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, सुतारवाडी गावांवर दरड कोसळली होती. तळीये दुर्घटनेत ८४ जणांना जीव गमवावा लागला होता.

अलिबाग :  महाड तालुक्यातील दरडग्रस्त तळीये गावाचे पुनर्वसन तीन वर्षांपासून रखडले आहे. सध्या येथे ९२ घरे पूर्ण झाली असून, ६६ जणांना हक्काची घरे मिळाली असली तरी १३५ घरांची कामे अपूर्ण आहेत.

२२ जुलै २०२१ रोजी महाड तालुक्यातील तळीये आणि पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, सुतारवाडी गावांवर दरड कोसळली होती. तळीये दुर्घटनेत ८४ जणांना जीव गमवावा लागला होता. तर केवनाळे, सुतारवाडीत ११ जण गाडले होते. या दुर्घटनेनंतर शासनाने तळीयेसह पाच वाड्यांचे म्हाडामार्फत पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी २७१ घरांची पायाभरणी करण्यास सुरुवात झाली. तीन वर्षांत फक्त ९२ घरांची उभारणी झाली.

‘म्हाडा’तर्फे २६३ सदनिकांच्या बांधकामास निविदेद्वारे मंजुरी दिली. त्यानंतर कामे सुरू झाली. २७१ पैकी २२७ घरे सध्या बांधली जाणार आहेत. २२७ सदनिकांच्या भूखंडापैकी २७ सदनिकांच्या जागेवर कंटेनर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या २०० सदनिकांचे काम सुरू आहे. २०० पैकी सद्य:स्थितीत पहिल्या टप्प्यात ६६ तर दुसऱ्या टप्प्यातील २६, असे एकूण ९२ सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यातील ६६ जणांना घराच्या चाव्या देण्यात आलेल्या आहेत.

इर्शाळवाडीचेच पुनर्वसन पूर्ण

खालापूरमधील इर्शाळवाडी या आदिवासी वाडीवर १९ जुलै २०२३च्या रात्री दरड कोसळली. यात २७ जणांचा मृत्यू झाला. तर शोध न लागल्याने ८४ जणांचा शासनाने मृत घोषित केले. त्यानंतर ४४ कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

चौकमधील मानिवली येथे अडीच हेक्टर जागेत ४४ घरे बांधली. आपदग्रस्त कुटुंबांना ३ गुंठे जागेवर सिडकोच्या माध्यमातून ही घरे बांधून दिली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १२ दरड घटना घडल्या. यापैकी इर्शाळवाडी ग्रामस्थांचे पुनर्वसन पूर्ण करण्यात यश आले. तर, तळीये, केवनाळे, साखर सुतारवाडी, जुई, दासगाव आणि इतर ठिकाणचे पुनर्वसन अद्याप  रखडलेले आहे.

भौगोलिक सर्वेक्षण रखडले

तळीये गावातील एका वाडीने पुनर्वसन करू नका, असा ठराव दिलेला आहे. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी भौगोलिक सर्वेक्षण करून निर्णय घेऊ, असे म्हटले होते. मात्र, अजूनही भौगोलिक सर्वेक्षण झालेले नाही.

तळीये ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. २२७ पैकी ९२ सदनिका पूर्ण होऊन ६६ घरांचे वाटप झाले आहे. १३५ सदनिकांचे काम सुरू आहे. ४४ सदनिका या एका गावाने पुनर्वसन करण्यास नकार दिल्याने थांबले आहे. भौगोलिक सर्वेक्षणानंतर निर्णय घेतला जाणार आहे.

महेश शितोळे, तहसीलदार, महाड