शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

१२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका २६ सप्टेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 01:52 IST

गणेशोत्सवावर निवडणुकांचे सावट; जिल्ह्यात राजकीय पक्षांना प्रचार यंत्रणा राबवणे ठरणार सोपे

- आविष्कार देसाई अलिबाग : लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असतानाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. रायगड जिल्ह्यातील तब्बल १२२ ग्रामपंचायतींचा त्यामध्ये समावेश आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत २६ सप्टेंबर रोजी निवडणुका पार पडणार असल्याने निवडणुकांचे सावट गणेशोत्सवावर राहणार आहे, त्यामुळे उमेदवारांना प्रचार यंत्रणा राबवणे सोपे जाणार आहे.आॅक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. रायगड जिल्ह्यातील १२२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तर सरपंचपद रिक्त असलेल्या मुरु ड-चोरढे, सुधागड-पाली, पोलादपूर-चरई या तीन ग्रामपंचायतींमध्ये पोट निवडणूक २६ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. याच कालावधीत गणेशोत्सवाची धामधूम राहणार असल्याने गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात राजकीय धुळवड पाहावयास मिळणार आहे.रायगड जिल्ह्यात होणाºया या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची नोटीस २७ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ५ ते ११ सप्टेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र मागविणे आणि सादर करणे, १२ सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिनांक जाहीर करण्यात आला आहे. त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात येणार आहे. २६ सप्टेंबर रोजी निवडणूक आणि २७ सप्टेंबर रोजी मतदान मोजणी करण्यात येणार आहे.रायगड जिल्ह्यातील १२२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर झाला आहे. यामध्ये अलिबाग तालुक्यातील मापगाव, कुरुळ, झिराड, रांजणखार-डावली, सातिर्जे, रेवस, परहूर या सात ग्रामपंचायतींचा समावेश आहे.मुरुड तालुक्यातील सावली या एकाच ग्रामपंचायतीचा समावेश आहे. पेण तालुक्यातील जावळी, वरेडी, कासू, बेणसे, झोतीरपाडा, निधवली, अंतोरे, करंबेळी-छत्तीशी, पाबळ गागोदे खु., कुहिरे या ११ गावांत निवडणुका होणार आहेत.पनवेल तालुक्यातील विचुंबे, देवद, वहाळ, गव्हाण, पोयंजे, आदई, वांगणी तर्फे वाजे, नांदगाव, पारगाव, पळस्पे या दहा ग्रामपंचायती, उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा, कोप्रोली, जुई, विंधणे या चार, कर्जत तालुक्यातील आसल, माणगाव-वरेडी, शेलू, पाषाणे, पिंपळोली, मानिवली, वारे, बोरीवली, कशेळे, बीड बु. टेंभरे, मोग्रज, सावळा/हेदवली या १२ तर खालापूर तालुक्यातील नावंढे, कलोते-मोकाशी, वडगाव या तीन ग्रामपंचायतींत निवडणूक होणार आहे.रोेहे तालुक्यातील खारगाव, आरे बु., भालगाव, धोंडखार, देवकान्हे, मढाली खुर्द, ऐनवहाळ, कोलाड, पिंगळसई, कुडली, जामगाव, आंबेवाडी, वाली, पिंगोडा, वणी, वांगणी, कडसुरे, चिंचवली-अतोणे, नेहरूनगर, वरसगाव, भिसे, मेढा या ग्रामपंचायतींत सुधागड तालुक्यातील चिखलगाव, कुंभारशेत, उद्धर, नागशेत, नेणवली, वाघोशी या सहा ग्रामपंचायतींमध्ये माणगाव तालुक्यातील पोटणेर, वावेदिवाळी, विळे, वरचीवाडी, पाणसई, कोस्ते खु., दाखणे, मढेगाव, तळेगाव-गोरेगाव, सुरव-तळे या दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.तळा तालुक्यातील पिटसई, मजगाव, रोवळा, बोरघर हवेली, मालुक, पन्हेळी, महागाव, सोनसडे, पढवण, काकडशेत, वरळ, वानस्ते, मेढे या १३ ग्रामपंचायतींत, महाड तालुक्यातील मांघरूण, सव, कसबेशिवथर, आंबेशिवथर, कुंभेशिवथर, जिते, दाभोळ, खर्डी, पांगारी, रेवतळे, वाकी बु., आमशेत, शिंगरकोंड या १३ ग्रामपंचायतींत, पोलादपूर तालुक्यातील सवाद, माटवण, देवळे, बोरावळे या चार ग्रामपंचायतीत तर म्हसळा तालुक्यातील मांदाटणे, खारगाव खुर्द, मेंदडी, कोळे, आंबेत या पाच ग्रामपंचायतीत निवडणुका होत आहेत.कोकणात गणेशोत्सव हा सण धूमधडाक्यात साजरा केला जातो. घरोघरी बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येते. दीड दिवसांपासून ते २१ दिवसांपर्यंत बाप्पाची सेवा केली जाते. प्रत्येकाच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेण्याची जुनी परंपरा आहे. त्याचाच फायदा राजकीय पक्षांना होणार असल्याचे दिसून येते. घरोघरी गणेशाचे दर्शन घेताना त्या-त्या उमेदवारांना प्रचार यंत्रणा राबवणे सोपे जाणार आहे.रायगड जिल्ह्यामध्ये शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा हे प्रमुख पक्ष आहेत. जास्तीत जास्त ग्रामपंचायती जिंकून त्यावर आपलेच वर्चस्व राहावे, यासाठी विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरु वात केली आहे, त्यामुळे राजकीय वातावरणात चांगलीच रंगत येऊ लागली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतalibaugअलिबागRaigadरायगड