शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

नारळ-सुपारी बागायतदारांना १२ कोटींचे पॅकेज मंजूर; १,५७६ हेक्टरवरील १७ लाख झाडांसाठी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 00:12 IST

१६ लाख ८६ हजार ७६१ झाडांचे झाले नुकसान

- आविष्कार देसाई रायगड : निसर्ग वादळातील बागायतदारांना नुकसान भरपाई देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात एक हजार ५७६.४९ हेक्टर क्षेत्रावरील एकूण १६ लाख ८६ हजार ७६१ नारळ आणि सुपारींच्या झाडांचे नुकसान झाले होते. सरकारच्या निर्णयामुळे नुकसान भरपाईपोटी ११ कोटी ९३ लाख १६ हजार २५० रुपये मिळण्यातील अडचण आता दूर झाली आहे. मात्र, मदत तुटपुंजी असल्याचे बागायतदारांचे म्हणणे असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे.

३ जूनला झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगलाचा हाहाकार उडवला होता. निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा रायगड जिल्ह्याला बसला होता. जिल्ह्यातील घराचे, गोठ्यांचे, विजेचे पोल, विजेच्या तारा, आंबा, काजू, कोकम यांच्यासह नारळ आणि सुपारींच्या बागांचे आतोनात नुकसान झाले होते. पुढील १५ वर्षांचे बागायतदारांचे आर्थिक नुकसान झाल्याने, प्रति झाड नुकसान भरपाई मिळणे गरजेचे होते.

सुरुवातीला नारळ आणि सुपारी हे घटक नुकसान भरपाईच्या कक्षेत येत नसल्याने खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सरकारला नव्याने आदेश पारीत करायला भाग पाडले. नारळ आणि सुपारीला नुकसान भरपाई देण्याला संमती मिळाली. मात्र, नारळासाठी प्रति झाड १२७ रुपये तर सुपारीसाठी ११ रुपये मिळणार होते.

सरकारकडून देण्यात येणारी मदत अतिशय तुटपुंजी असल्याने ती वाढवून घेण्यात पुन्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांना यश आले. आता नवीन नियमानुसार प्रति नारळाच्या झाडाला २५० रुपये, तर प्रत्येक नुकसान झालेल्या सुपारीच्या झाडासाठी ५० रुपये देण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बागायतदारांना आर्थिक मदत मिळण्यातील मोठी अडचण दूर झाली आहे.

नारळ आणि सुपारीसाठी प्रत्येक झाडामागे मदत मिळण्याची आमची मागणी होती. ती सरकारने मान्य केल्याने आता बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. सरकारचा हा निर्णय क्रांतिकारक आहे. प्रशासकीय पातळीवरून लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम वर्ग करण्यात येईल.- आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड

निसर्ग वादळामुळे नारळ आणि सुपारीचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे पूर्ण करण्यात आलेले आहेत. प्रशासनाकडे रक्कमही जमा झालेली आहे. लवकरच लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.- पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

नारळाचे एक झाड वर्षाला सुमारे ७ हजार रुपयांचे उत्पन्न देते. सरकारने दिलेली मदत तुटपुंजी आहे. उद्ध्वस्थ झालेला बागायतदार अशा मदतीने वर येणार नाही. - जीवन लोहार, बागायतदार, चौल

टॅग्स :RaigadरायगडMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार