शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

नदीकाठची गावे तहानलेली; रोह्यातील १० गावे पाणीपुरवठा योजनेपासून वंचित, ग्रामस्थ हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 00:02 IST

आठ दिवसांत पाणी न मिळाल्यास उपोषणाचा इशारा

रोहा : तालुक्यातील पश्चिम खोऱ्यात दहा वर्षांपूर्वी एमआयडीसीच्या माध्यमातून एमजीपीकडून पाणी योजना कार्यान्वित झाली. ही योजना सुरू झाल्यापासून एक वर्ष संबंधित गावांना पाणीपुरवठा सुरळीत झाला. मात्र, गेली नऊ वर्षे भातसई ते धोंडखार गावांत पाणी मिळत नसून ही गावे पाण्यापासून वंचित राहिली आहेत. यासंदर्भात या भागातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन येत्या आठ दिवसांत  पाणी मिळावे, असे आवाहन केले आहे.

गेली नऊ वर्षे भातसई ते धोंडखार विभागात येणाऱ्या गावांना पिण्याचे पाणी मिळत नाही. यासंदर्भात अनेक वेळा प्रशासनाला पत्रव्यवहार करून दाखवून देण्यात आले व संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठका  घेण्यात आल्या; परंतु आजतागायत पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. निवडणुका आल्या की, १५ दिवसांत व महिन्यात पाणी मिळेल, असे तोंडी आश्वासन दिले जाते. त्यामुळे ग्रामस्थांची नेहमीच दिशाभूल होत आहे. कागदोपत्री या गावांना आम्ही लाखो लीटर पाणी पुरवत असल्याचे सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्षात गावांना पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाण्याचा खूप मोठा गंभीर प्रश्न ग्रमास्थांसमोर उभा राहिला आहे. या भागातील महिला, वृद्ध महिला यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. 

पाणीपुरवठा न होणारी गावेभातसई ते धोंडखारदरम्यान असलेली भातसई, लक्ष्मीनगर, झोलांबे, शेणवई, डोंगरी, वावे, वावे पोटगे, सानेगाव, यशवंतखार, धोंडखार ही १० गावे सतत पाण्यापासून वंचित आहेत. येथील ग्रमास्थांनी जिल्हाधिकारी रायगड तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार महेंद्र दळवी, उपविभागीय अधिकारी रोहा, तहसीलदार रोहा, उप अभियंता जीवन प्राधिकरण पेण, उप अभियंता एम.आय.डी.सी. धाटाव यांनाही प्रत्यक्ष भेट घेऊन व पत्र पाठवून निवेदन दिले आहे. या वेळी हेमंत देशमुख, सुधीर म्हात्रे, रामा शेरेकर, राजेश मोरे, आदेश देशमुख, राजन शिंदे, समीर सातपुते, संदीप देशमुख, महेश देशमुख, अरुण शिर्के, संभाजी निंबरे, पांडुरंग सानप आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :Waterपाणी