शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

नदीकाठची गावे तहानलेली; रोह्यातील १० गावे पाणीपुरवठा योजनेपासून वंचित, ग्रामस्थ हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 00:02 IST

आठ दिवसांत पाणी न मिळाल्यास उपोषणाचा इशारा

रोहा : तालुक्यातील पश्चिम खोऱ्यात दहा वर्षांपूर्वी एमआयडीसीच्या माध्यमातून एमजीपीकडून पाणी योजना कार्यान्वित झाली. ही योजना सुरू झाल्यापासून एक वर्ष संबंधित गावांना पाणीपुरवठा सुरळीत झाला. मात्र, गेली नऊ वर्षे भातसई ते धोंडखार गावांत पाणी मिळत नसून ही गावे पाण्यापासून वंचित राहिली आहेत. यासंदर्भात या भागातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन येत्या आठ दिवसांत  पाणी मिळावे, असे आवाहन केले आहे.

गेली नऊ वर्षे भातसई ते धोंडखार विभागात येणाऱ्या गावांना पिण्याचे पाणी मिळत नाही. यासंदर्भात अनेक वेळा प्रशासनाला पत्रव्यवहार करून दाखवून देण्यात आले व संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठका  घेण्यात आल्या; परंतु आजतागायत पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. निवडणुका आल्या की, १५ दिवसांत व महिन्यात पाणी मिळेल, असे तोंडी आश्वासन दिले जाते. त्यामुळे ग्रामस्थांची नेहमीच दिशाभूल होत आहे. कागदोपत्री या गावांना आम्ही लाखो लीटर पाणी पुरवत असल्याचे सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्षात गावांना पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाण्याचा खूप मोठा गंभीर प्रश्न ग्रमास्थांसमोर उभा राहिला आहे. या भागातील महिला, वृद्ध महिला यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. 

पाणीपुरवठा न होणारी गावेभातसई ते धोंडखारदरम्यान असलेली भातसई, लक्ष्मीनगर, झोलांबे, शेणवई, डोंगरी, वावे, वावे पोटगे, सानेगाव, यशवंतखार, धोंडखार ही १० गावे सतत पाण्यापासून वंचित आहेत. येथील ग्रमास्थांनी जिल्हाधिकारी रायगड तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार महेंद्र दळवी, उपविभागीय अधिकारी रोहा, तहसीलदार रोहा, उप अभियंता जीवन प्राधिकरण पेण, उप अभियंता एम.आय.डी.सी. धाटाव यांनाही प्रत्यक्ष भेट घेऊन व पत्र पाठवून निवेदन दिले आहे. या वेळी हेमंत देशमुख, सुधीर म्हात्रे, रामा शेरेकर, राजेश मोरे, आदेश देशमुख, राजन शिंदे, समीर सातपुते, संदीप देशमुख, महेश देशमुख, अरुण शिर्के, संभाजी निंबरे, पांडुरंग सानप आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :Waterपाणी