शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

जिल्ह्यात १ हजार ९८३ नौका किनाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 02:55 IST

राज्याच्या सागरी किनारपट्टीतील खोल समुद्रातील सक्तीची मासेमारी बंदी शुक्र वारपासून ते मंगळवार ३१ जुलै २०१८ अशा ६१ दिवसांकरिता (दोन महिने) लागू राहणार आहे

अलिबाग : राज्याच्या सागरी किनारपट्टीतील खोल समुद्रातील सक्तीची मासेमारी बंदी शुक्र वारपासून ते मंगळवार ३१ जुलै २०१८ अशा ६१ दिवसांकरिता (दोन महिने) लागू राहणार आहे. रायगडच्या किनारपट्टीतील मत्स्यव्यवसाय विभागाकडे नोंदणीकृत एकूण १ हजार ९८३ मच्छीमारी नौका किनाºयावर लावण्यात आल्या आहेत.पावसाच्या पाण्यापासून नौकांचे रक्षण व्हावे याकरिता नारळाचे झाप आणि प्लॅस्टिक कापडाने त्या शाकारून (झाकून) ठेवण्यात येत आहेत. आगामी दोन महिने सागरी मासेमारी बंद राहणार असल्याने या नौकांवरील खलाशी व कामगार सुटीवर गेले आहेत.मत्स्य प्रजननाचा कालावधी मान्सून प्रारंभानंतर सुमारे दोन महिन्यांचा असतो. या कालावधीत मासेमारी सुरू राहिल्यास मत्स्य प्रजोत्पादनावर परिणाम होवून मत्स्य दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. यास आळा घालण्याकरिता दरवर्षी सक्तीची मासेमारी बंदी लागू केली जाते. यावर्षीच्या मासेमारी बंदीसंदर्भातील शासकीय सूचना मत्स्यव्यवसाय विभागाने जिल्ह्यातील सर्व मच्छीमार संस्थांना दिल्या आहेत.मासेमारी बंदीचे उल्लंघन करणाºया मच्छीमारांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्याबाबतच्या सूचना देखील मत्स्यव्यवसाय विभागाने दिल्या आहेत. या कालावधीत १२ सागरी मैलापर्यंत यांत्रिकी पद्धतीने मासेमारी करणाºया मच्छीमारांना कोणत्याही संबंधित योजनांचा लाभ अधिनियमानुसार राज्य शासनाकडून मिळणार नाही. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी मासेमारी बंदीचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात होणारी मासेमारी बंदी ही फक्त यांत्रिकी मासेमारी करणाºया नौकांना लागू करण्यात आली आहे. पारंपरिक पध्दतीने मासेमारी करणाºया बिगर यांत्रिकी नौकांना मात्र ही बंदी लागू राहणार नाही.दोन महिन्यांच्या मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी नौकांची दुरुस्ती आणि देखभालीची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात त्याच बरोबर मासेमारी जाळ्यांची दुरु स्ती देखील या कालावधीत केली जातात अशी कामे केली जातात. काही दिवसातच ही कामे सुरू होतील.जंजिºयावरील बोट सेवाही बंदमुरु ड जंजिरा : ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावरील बोटिंग सेवा पूर्णत: बंद करण्यात आली आहे. पावसाळा जवळ आल्याने समुद्रातील लाटांचा वेग वाढला आहे. त्यामुळे किल्ल्यात जाणाºया बोटी लाटांच्या वेगामुळे जोरदार हलतात. अशा परिस्थितीत प्रवासी व पर्यटकांना कोणताही धोका पोहचू नये यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून ही वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसे पत्र सर्व जलवाहतूक सोसायट्यांना मुरु डचे बंदर निरीक्षक अतुल धोत्रे यांनी बजावले आहे. २६ मे ते ३१ आॅगस्ट २०१८ पर्यंत ही जलवाहतूक बंद राहणार आहे. तसेच या कालावधीत वॉटर स्पोर्ट्स, प्रवासी लॉन्च, साहसी वॉटर स्पोर्ट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. राजपुरी, दिघी व काशिद येथील या सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता पर्यटकांना काही दिवस जंजिरा किल्ला पहाता येणार नाही.काशिद येथे असंख्य पर्यटक येत असून येथे वॉटर स्पोर्ट्स करणाºया बोटी अद्याप सुरू आहेत. त्यामुळेच मागच्या आठवड्यात बोटीवरील मुलगा पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. तरी येथील बंदर निरीक्षक यांनी शनिवार व रविवार रोजी काशिद समुद्र किनारी उपस्थित राहून ज्या बोटी सुरु आहेत त्या बंद करण्यास सांगितल्या.