शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढवणार

By admin | Updated: July 12, 2016 01:51 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. कुणी बरोबर आले तर त्यांच्यासह, आले नाहीत तर त्यांच्याशिवाय निवडणुका लढवल्या जातील

इंदापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. कुणी बरोबर आले तर त्यांच्यासह, आले नाहीत तर त्यांच्याशिवाय निवडणुका लढवल्या जातील. त्याची तयारीही जोरदार सुरू झाली आहे, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांनी आज (दि. ११) पत्रकार परिषदेत दिली. बापट म्हणाले की, पुढच्या कालावधीत ७५ जिल्हा परिषद गट व १५० गणांच्या निवडणुका होणार आहेत. १० नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सर्व ठिकाणच्या नगराध्यक्षपदांच्या निवडणुका लढवण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार आहे. या संदर्भात दौंड व इंदापूर भागातील कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आजचा दौरा आयोजित केला होता. कार्यकर्त्यांचा निर्धार पक्का आहे हे या भेटीमध्ये स्पष्टपणे जाणवले, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. राज्य व केंद्र शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले तर त्या योजना यशस्वी होतील. कार्यकर्ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतील. या संदर्भात आवश्यक त्या सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. सर्वसामान्यांना स्वस्त दरात तूरडाळ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्राबरोबर राज्य शासनाने डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. किमतीबाबत व्यापाऱ्यांवर बंधने घालण्यात आली आहेत. आगामी कालावधीत खासगी व्यापाऱ्यांकडे आणि अंत्योदय व बीपीएलचा लाभ घेणाऱ्या ७० ते ७५ लाख शिधापत्रिकाधारकांना तूरडाळ उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती बापट यांनी दिली. या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, अतुल तेरखेडकर, माजी अध्यक्ष माऊली चवरे, सदानंद शिरदाळे, वासुदेव काळे, तानाजी थोरात, माऊली वाघमोडे, मारुतराव वणवे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपाचे काही कार्यकर्ते एकत्र आले होते. भावनेच्या भरात त्यांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला असावा. त्यास राज्यव्यापी स्वरूप असण्याची व देण्याची गरज नाही. मंत्रिमंडळातील बदलांबाबत चर्चा होत असते. ती मुख्यमंत्र्यांनी संबंधितांबरोबर केली होती. माझ्या खात्यासंदर्भात काही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे माझ्याबरोबर चर्चा झाली नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)खडकवासला कालव्यातून दोन टीएमसी सोडणार... पुण्यात व ग्रामीण भागात चांगला पाऊस झाला आहे. साधारणत: दोन टीएमसी पाणी खडकवासला कालव्यातून सोडण्यात येईल. पाटबंधारे विभागाच्या कालव्यांद्वारे पाणी सोडले तर ते विहिरी व शेतापर्यंत पोहोचेल, असे पालकमंत्री बापट यांनी सांगितले.मी सर्वांच्या प्रेमात पडतो...भाजपा सोडून इतर पक्षांच्या प्रेमात आपण आहात, या बद्दल बापट म्हणाले, मी सर्वांच्या प्रेमात पडतो; सर्वजण माझ्या प्रेमात पडतात. प्रेम करणं हा माणसाचा स्थायीभाव आहे, मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात वाद आहे की नाही या प्रश्नााविषयी ‘तुम्ही म्हणाल तर आहेत, म्हणाल तर नाहीत’ असे सांगून संदिग्धता बापट यांनी कायम ठेवली.