शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढवणार

By admin | Updated: July 12, 2016 01:51 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. कुणी बरोबर आले तर त्यांच्यासह, आले नाहीत तर त्यांच्याशिवाय निवडणुका लढवल्या जातील

इंदापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. कुणी बरोबर आले तर त्यांच्यासह, आले नाहीत तर त्यांच्याशिवाय निवडणुका लढवल्या जातील. त्याची तयारीही जोरदार सुरू झाली आहे, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांनी आज (दि. ११) पत्रकार परिषदेत दिली. बापट म्हणाले की, पुढच्या कालावधीत ७५ जिल्हा परिषद गट व १५० गणांच्या निवडणुका होणार आहेत. १० नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सर्व ठिकाणच्या नगराध्यक्षपदांच्या निवडणुका लढवण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार आहे. या संदर्भात दौंड व इंदापूर भागातील कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आजचा दौरा आयोजित केला होता. कार्यकर्त्यांचा निर्धार पक्का आहे हे या भेटीमध्ये स्पष्टपणे जाणवले, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. राज्य व केंद्र शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले तर त्या योजना यशस्वी होतील. कार्यकर्ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतील. या संदर्भात आवश्यक त्या सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. सर्वसामान्यांना स्वस्त दरात तूरडाळ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्राबरोबर राज्य शासनाने डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. किमतीबाबत व्यापाऱ्यांवर बंधने घालण्यात आली आहेत. आगामी कालावधीत खासगी व्यापाऱ्यांकडे आणि अंत्योदय व बीपीएलचा लाभ घेणाऱ्या ७० ते ७५ लाख शिधापत्रिकाधारकांना तूरडाळ उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती बापट यांनी दिली. या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, अतुल तेरखेडकर, माजी अध्यक्ष माऊली चवरे, सदानंद शिरदाळे, वासुदेव काळे, तानाजी थोरात, माऊली वाघमोडे, मारुतराव वणवे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपाचे काही कार्यकर्ते एकत्र आले होते. भावनेच्या भरात त्यांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला असावा. त्यास राज्यव्यापी स्वरूप असण्याची व देण्याची गरज नाही. मंत्रिमंडळातील बदलांबाबत चर्चा होत असते. ती मुख्यमंत्र्यांनी संबंधितांबरोबर केली होती. माझ्या खात्यासंदर्भात काही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे माझ्याबरोबर चर्चा झाली नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)खडकवासला कालव्यातून दोन टीएमसी सोडणार... पुण्यात व ग्रामीण भागात चांगला पाऊस झाला आहे. साधारणत: दोन टीएमसी पाणी खडकवासला कालव्यातून सोडण्यात येईल. पाटबंधारे विभागाच्या कालव्यांद्वारे पाणी सोडले तर ते विहिरी व शेतापर्यंत पोहोचेल, असे पालकमंत्री बापट यांनी सांगितले.मी सर्वांच्या प्रेमात पडतो...भाजपा सोडून इतर पक्षांच्या प्रेमात आपण आहात, या बद्दल बापट म्हणाले, मी सर्वांच्या प्रेमात पडतो; सर्वजण माझ्या प्रेमात पडतात. प्रेम करणं हा माणसाचा स्थायीभाव आहे, मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात वाद आहे की नाही या प्रश्नााविषयी ‘तुम्ही म्हणाल तर आहेत, म्हणाल तर नाहीत’ असे सांगून संदिग्धता बापट यांनी कायम ठेवली.