शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढवणार

By admin | Updated: July 12, 2016 01:51 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. कुणी बरोबर आले तर त्यांच्यासह, आले नाहीत तर त्यांच्याशिवाय निवडणुका लढवल्या जातील

इंदापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. कुणी बरोबर आले तर त्यांच्यासह, आले नाहीत तर त्यांच्याशिवाय निवडणुका लढवल्या जातील. त्याची तयारीही जोरदार सुरू झाली आहे, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांनी आज (दि. ११) पत्रकार परिषदेत दिली. बापट म्हणाले की, पुढच्या कालावधीत ७५ जिल्हा परिषद गट व १५० गणांच्या निवडणुका होणार आहेत. १० नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सर्व ठिकाणच्या नगराध्यक्षपदांच्या निवडणुका लढवण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार आहे. या संदर्भात दौंड व इंदापूर भागातील कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आजचा दौरा आयोजित केला होता. कार्यकर्त्यांचा निर्धार पक्का आहे हे या भेटीमध्ये स्पष्टपणे जाणवले, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. राज्य व केंद्र शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले तर त्या योजना यशस्वी होतील. कार्यकर्ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतील. या संदर्भात आवश्यक त्या सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. सर्वसामान्यांना स्वस्त दरात तूरडाळ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्राबरोबर राज्य शासनाने डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. किमतीबाबत व्यापाऱ्यांवर बंधने घालण्यात आली आहेत. आगामी कालावधीत खासगी व्यापाऱ्यांकडे आणि अंत्योदय व बीपीएलचा लाभ घेणाऱ्या ७० ते ७५ लाख शिधापत्रिकाधारकांना तूरडाळ उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती बापट यांनी दिली. या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, अतुल तेरखेडकर, माजी अध्यक्ष माऊली चवरे, सदानंद शिरदाळे, वासुदेव काळे, तानाजी थोरात, माऊली वाघमोडे, मारुतराव वणवे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपाचे काही कार्यकर्ते एकत्र आले होते. भावनेच्या भरात त्यांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला असावा. त्यास राज्यव्यापी स्वरूप असण्याची व देण्याची गरज नाही. मंत्रिमंडळातील बदलांबाबत चर्चा होत असते. ती मुख्यमंत्र्यांनी संबंधितांबरोबर केली होती. माझ्या खात्यासंदर्भात काही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे माझ्याबरोबर चर्चा झाली नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)खडकवासला कालव्यातून दोन टीएमसी सोडणार... पुण्यात व ग्रामीण भागात चांगला पाऊस झाला आहे. साधारणत: दोन टीएमसी पाणी खडकवासला कालव्यातून सोडण्यात येईल. पाटबंधारे विभागाच्या कालव्यांद्वारे पाणी सोडले तर ते विहिरी व शेतापर्यंत पोहोचेल, असे पालकमंत्री बापट यांनी सांगितले.मी सर्वांच्या प्रेमात पडतो...भाजपा सोडून इतर पक्षांच्या प्रेमात आपण आहात, या बद्दल बापट म्हणाले, मी सर्वांच्या प्रेमात पडतो; सर्वजण माझ्या प्रेमात पडतात. प्रेम करणं हा माणसाचा स्थायीभाव आहे, मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात वाद आहे की नाही या प्रश्नााविषयी ‘तुम्ही म्हणाल तर आहेत, म्हणाल तर नाहीत’ असे सांगून संदिग्धता बापट यांनी कायम ठेवली.