शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘झीरो पेंडन्सी’अंमलबजावणी अक्षय तृतीयेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 20:55 IST

सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर ‘झिरो पेंडन्सी’या कार्यपध्दतीची अंमलबजावणी सुरू करणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्दे१५ फेब्रुवारी २०१८ रोजी झिरो पेंडन्सीचा अध्यादेश प्रसिध्दराज्यातील सर्व कर्मचारी व अधिका-यांना झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल बाबत सविस्तर प्रशिक्षण

पुणे: राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कामकाज अधिक पारदर्शक ,लोकाभिमुख व गतीमान करण्यासाठी झिरो पेंडन्सी या पद्धतीचा अवलंब केला जाणार असून येत्या १८ एप्रिल पासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे. नागरिकांची प्रशासकीय कामे तत्परतेने व्हावीत या उद्देशाने या कार्यपध्दतीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.सरकारी काम म्हटले की विलंब असे समीकरण झाले आहे. मात्र, त्यावर उपाय म्हणून प्रशासकीय कामकाजात ‘झिरो पेंडन्सी’चा अवलंब केला जात आहे. पुणे जिल्ह्यातील विविध कार्यालयात या कार्यपध्दतीबाबत चांगलीच जागृती झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रशासकीय कामकाजातील होणारा विलंब टाळण्यासाठी सध्या सर्व थकित प्रकरणांचा निकाली काढण्यातस येत आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ फेब्रुवारी २०१८ रोजी झिरो पेंडन्सीचा अध्यादेश प्रसिध्द केला. त्यामुळे सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर ‘झिरो पेंडन्सी’या कार्यपध्दतीची अंमलबजावणी सुरू करणे बंधनकारक आहे.पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले, राज्य शासनाने फेब्रुवारी महिन्यात ‘झिरो पेंडन्सी’राबविण्याबाबतचा अध्यादेश फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द केला आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत कार्यालयांमधील सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जातील. येत्या १८ एप्रिल पासून अध्यादेशाप्रमाणे कार्यपध्दतीस सुरूवात केली जाईल. कार्यालयालयात कार्यरत असलेल्या कर्मचा-यांच्या मदतीने किंवा रिक्त असलेली सर्व पदे भरले तरीही या कार्यपध्दतीनुसार काम सुरू करता येईल.दरम्यान, राज्यातील सर्व कर्मचारी व अधिका-यांना झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल बाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात येईल. प्रत्येक अधिकारी व कर्मचा-याच्या वार्षिक गोपनिय अहवालात कामगिरीची नोंद घेण्यात येणार आहे. त्यामुळे ३१ मार्च रोजी किती प्रकरणे प्रलंबित राहिली हे या अहवालात सादर करावे लागेल.

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारChandrakant Dalviचंद्रकांत दळवी