शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

अकरावीच्या ३० हजार जागा रिक्त, ३२ महाविद्यालयांत शून्य प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 03:03 IST

अकरावीसाठी ३२ महाविद्यालयांमध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेश न घेतल्याने तिथल्या सर्व जागा रिक्त राहिल्या आहेत.

पुणे  - अकरावीसाठी ३२ महाविद्यालयांमध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेश न घेतल्याने तिथल्या सर्व जागा रिक्त राहिल्या आहेत. सर्व महाविद्यालयांमधील एकूण ३० हजार ७४३ जागा रिक्त राहिल्या असून विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १५ हजार ७२१ जागांचा समावेश आहे.शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून आकडेवारी जाहीर करण्यात आली. एकूण ६६ हजार ६९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. ८१८ महाविद्यालयांमधील ९७ हजार ४३५ जागा उपलब्ध होत्या. ५२ हजार ५८० विद्यार्थ्यांचे प्रवेश आॅनलाइन प्रवेश फेरीतून (कॅप) झाले, तर १४ हजार ११२ कोट्यांतर्गत प्रवेश झाले.शहरातील ३२ अनुदानित महाविद्यालयांमध्ये एकही प्रवेश झाला नाही. तिथे २ हजार १५० जागा होत्या. ८१८ महाविद्यालयांपैकी १६० महाविद्यालयांमधील २० हजार ११५ जागा भरल्या गेल्या आहेत. १६५ महाविद्यालयांमध्ये २० पेक्षाही कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १५ हजार ७२१ जागा रिक्त राहिल्या. कला शाखेच्या ६ हजार ०५३, वाणिज्य शाखेच्या ७ हजार ३७६, तर एमसीव्हीसीच्या १५९३ जागा रिक्त राहिल्या आहेत. कला शाखेच्या मराठी माध्यमाच्या २ हजार १४, तर इंग्रजी माध्यमाच्या ४ हजार ०३९ जागा शिल्लक राहिल्या आहेत.कला शाखेतसर्वात कमी प्रवेशपारंपरिक शिक्षणामध्ये कला शाखेत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधून कला शाखेमध्ये केवळ ७ हजार ९०७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. सर्वाधिक ३१ हजार ५६९ प्रवेश वाणिज्य शाखेमध्ये झाले आहेत. त्यापाठोपाठ विज्ञान शाखेत २४ हजार ०८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.कोट्यातून १४ हजार ११२ प्रवेशअल्पसंख्याक महाविद्यालयांतील जागा त्यांच्या स्तरावर भरण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते. त्यानुसार कोट्यांतर्गत १४ हजार ११२ प्रवेश देण्यात आले आहेत. कॅप फेरीअंतर्गत ५२ हजार ५८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. एकूण ६६ हजार ६९२ विद्यार्थ्यांनी अकरावीसाठी प्रवेश घेतला.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्र