शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

योगसाधनेकडे वाढतोय तरुणाईचा कल

By admin | Updated: June 21, 2017 06:21 IST

शरीर, मन व बुद्धीची एकात्मता साधण्यासाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी योगसाधना अतिशय महत्त्वाची आहे. योगसाधनेमुळे शारीरिक व मानसिक

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शरीर, मन व बुद्धीची एकात्मता साधण्यासाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी योगसाधना अतिशय महत्त्वाची आहे. योगसाधनेमुळे शारीरिक व मानसिक आजार दूर ठेवणे शक्य होते. तसेच सकारात्मक विचार करण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांमध्ये नियमित योगसाधनेचे महत्त्व वाढीस लागले आहे. एकीकडे जिम संस्कृती फोफावत असताना दुसरीकडे योगसाधनेकडील कलही वाढू लागला आहे. योगाकडे कारकिर्दीचे एक नवे दालन म्हणूनही पाहण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. गेल्या वर्षीपासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जात आहे. योगसाधनेला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सेवाभावी संस्था आदी ठिकाणी योगा दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजिले जात आहेत. योगसाधनेला आंतरराष्ट्रीय स्तरावरही महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्याचे ताणतणावाचे जीवन, अनियमित जीवनशैली, स्पर्धेचे युग यातून शारीरिक आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी योगासने, प्राणायाम यांचा उपयोग होत असल्याचे मत तरुणांनी आणि योगशिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. योगासने, प्राणायाम आदींचे महत्त्व दिवसेंदिवस अधोरेखित होत आहे. त्यामुळे जिमऐवजी योगासनांच्या क्लासला जाणाऱ्या महिला, तरुण, बालकांची संख्या वाढू लागली आहे, असे मत योगशिक्षकांनी नोंदवले. आजकाल प्रत्येक व्यक्ती फिट राहण्यासाठी नवनवीन पर्याय शोधत आहे. शरीर रोगमुक्त ठेवण्यासाठी योग फायदेशीर आहे. दररोज योग केल्याने तणाव कमी होण्यासोबत एकाग्रता वाढते आणि जागरूकता येते. योगाभ्यास करताना श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित केल्याने शरीराला फायदा होतो, असेही मत या वेळी नोंदवण्यात आले.भारत देशाची मोठी परंपरा म्हणजे योग आहे. आरोग्य समस्यांवर योगा हे रामबाण उपाय आहे. योग शब्दाचा शाब्दिक अर्थ संस्कृतमध्ये योक असा आहे. योग व व्यायामाचे मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. परदेशातही आजमितीस योगाचे महत्त्व पटले असून परदेशी नागरिक सद्य:स्थितीत योगाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. परदेशी नागरिकांचा योगबद्दलचा ओढा केनिया, शेअल्स, श्रीलंका या देशांमध्ये वाढला आहे. भारतीय संस्कृतीचा हा अनमोल वारसा सातासमुद्रापार पोहोचविण्याचे कार्य भारतातील अनेक योग संस्थांनी केले आहे. तशी योग्याची वृत्ती प्राणायाम नि आसनातून स्थिरावते. आता योगाचा अर्थ सकाळी कुठेतरी जाऊन आसने नि प्राणायाम करण्यापुरता मर्यादित राहणार नाही. तो संपूर्ण जीवनाशी निगडित झालेला आहे.-किर्ती काळकुंदळीकर, योगाशिक्षक