शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

योगसाधनेकडे वाढतोय तरुणाईचा कल

By admin | Updated: June 21, 2017 06:21 IST

शरीर, मन व बुद्धीची एकात्मता साधण्यासाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी योगसाधना अतिशय महत्त्वाची आहे. योगसाधनेमुळे शारीरिक व मानसिक

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शरीर, मन व बुद्धीची एकात्मता साधण्यासाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी योगसाधना अतिशय महत्त्वाची आहे. योगसाधनेमुळे शारीरिक व मानसिक आजार दूर ठेवणे शक्य होते. तसेच सकारात्मक विचार करण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांमध्ये नियमित योगसाधनेचे महत्त्व वाढीस लागले आहे. एकीकडे जिम संस्कृती फोफावत असताना दुसरीकडे योगसाधनेकडील कलही वाढू लागला आहे. योगाकडे कारकिर्दीचे एक नवे दालन म्हणूनही पाहण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. गेल्या वर्षीपासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जात आहे. योगसाधनेला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सेवाभावी संस्था आदी ठिकाणी योगा दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजिले जात आहेत. योगसाधनेला आंतरराष्ट्रीय स्तरावरही महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्याचे ताणतणावाचे जीवन, अनियमित जीवनशैली, स्पर्धेचे युग यातून शारीरिक आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी योगासने, प्राणायाम यांचा उपयोग होत असल्याचे मत तरुणांनी आणि योगशिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. योगासने, प्राणायाम आदींचे महत्त्व दिवसेंदिवस अधोरेखित होत आहे. त्यामुळे जिमऐवजी योगासनांच्या क्लासला जाणाऱ्या महिला, तरुण, बालकांची संख्या वाढू लागली आहे, असे मत योगशिक्षकांनी नोंदवले. आजकाल प्रत्येक व्यक्ती फिट राहण्यासाठी नवनवीन पर्याय शोधत आहे. शरीर रोगमुक्त ठेवण्यासाठी योग फायदेशीर आहे. दररोज योग केल्याने तणाव कमी होण्यासोबत एकाग्रता वाढते आणि जागरूकता येते. योगाभ्यास करताना श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित केल्याने शरीराला फायदा होतो, असेही मत या वेळी नोंदवण्यात आले.भारत देशाची मोठी परंपरा म्हणजे योग आहे. आरोग्य समस्यांवर योगा हे रामबाण उपाय आहे. योग शब्दाचा शाब्दिक अर्थ संस्कृतमध्ये योक असा आहे. योग व व्यायामाचे मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. परदेशातही आजमितीस योगाचे महत्त्व पटले असून परदेशी नागरिक सद्य:स्थितीत योगाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. परदेशी नागरिकांचा योगबद्दलचा ओढा केनिया, शेअल्स, श्रीलंका या देशांमध्ये वाढला आहे. भारतीय संस्कृतीचा हा अनमोल वारसा सातासमुद्रापार पोहोचविण्याचे कार्य भारतातील अनेक योग संस्थांनी केले आहे. तशी योग्याची वृत्ती प्राणायाम नि आसनातून स्थिरावते. आता योगाचा अर्थ सकाळी कुठेतरी जाऊन आसने नि प्राणायाम करण्यापुरता मर्यादित राहणार नाही. तो संपूर्ण जीवनाशी निगडित झालेला आहे.-किर्ती काळकुंदळीकर, योगाशिक्षक