शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

योगसाधनेकडे वाढतोय तरुणाईचा कल

By admin | Updated: June 21, 2017 06:21 IST

शरीर, मन व बुद्धीची एकात्मता साधण्यासाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी योगसाधना अतिशय महत्त्वाची आहे. योगसाधनेमुळे शारीरिक व मानसिक

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शरीर, मन व बुद्धीची एकात्मता साधण्यासाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी योगसाधना अतिशय महत्त्वाची आहे. योगसाधनेमुळे शारीरिक व मानसिक आजार दूर ठेवणे शक्य होते. तसेच सकारात्मक विचार करण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांमध्ये नियमित योगसाधनेचे महत्त्व वाढीस लागले आहे. एकीकडे जिम संस्कृती फोफावत असताना दुसरीकडे योगसाधनेकडील कलही वाढू लागला आहे. योगाकडे कारकिर्दीचे एक नवे दालन म्हणूनही पाहण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. गेल्या वर्षीपासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जात आहे. योगसाधनेला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सेवाभावी संस्था आदी ठिकाणी योगा दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजिले जात आहेत. योगसाधनेला आंतरराष्ट्रीय स्तरावरही महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्याचे ताणतणावाचे जीवन, अनियमित जीवनशैली, स्पर्धेचे युग यातून शारीरिक आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी योगासने, प्राणायाम यांचा उपयोग होत असल्याचे मत तरुणांनी आणि योगशिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. योगासने, प्राणायाम आदींचे महत्त्व दिवसेंदिवस अधोरेखित होत आहे. त्यामुळे जिमऐवजी योगासनांच्या क्लासला जाणाऱ्या महिला, तरुण, बालकांची संख्या वाढू लागली आहे, असे मत योगशिक्षकांनी नोंदवले. आजकाल प्रत्येक व्यक्ती फिट राहण्यासाठी नवनवीन पर्याय शोधत आहे. शरीर रोगमुक्त ठेवण्यासाठी योग फायदेशीर आहे. दररोज योग केल्याने तणाव कमी होण्यासोबत एकाग्रता वाढते आणि जागरूकता येते. योगाभ्यास करताना श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित केल्याने शरीराला फायदा होतो, असेही मत या वेळी नोंदवण्यात आले.भारत देशाची मोठी परंपरा म्हणजे योग आहे. आरोग्य समस्यांवर योगा हे रामबाण उपाय आहे. योग शब्दाचा शाब्दिक अर्थ संस्कृतमध्ये योक असा आहे. योग व व्यायामाचे मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. परदेशातही आजमितीस योगाचे महत्त्व पटले असून परदेशी नागरिक सद्य:स्थितीत योगाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. परदेशी नागरिकांचा योगबद्दलचा ओढा केनिया, शेअल्स, श्रीलंका या देशांमध्ये वाढला आहे. भारतीय संस्कृतीचा हा अनमोल वारसा सातासमुद्रापार पोहोचविण्याचे कार्य भारतातील अनेक योग संस्थांनी केले आहे. तशी योग्याची वृत्ती प्राणायाम नि आसनातून स्थिरावते. आता योगाचा अर्थ सकाळी कुठेतरी जाऊन आसने नि प्राणायाम करण्यापुरता मर्यादित राहणार नाही. तो संपूर्ण जीवनाशी निगडित झालेला आहे.-किर्ती काळकुंदळीकर, योगाशिक्षक