शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

इंदापूरकरांसाठी योग भवन उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:09 IST

इंदापूर: शहरातील प्रत्येक नागरिक व प्रत्येक कुटुंब हे माझे कुटुंब आहे. त्यांचे आरोग्य कायम सदृढ राहण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून अद्यावत ...

इंदापूर: शहरातील प्रत्येक नागरिक व प्रत्येक कुटुंब हे माझे कुटुंब आहे. त्यांचे आरोग्य कायम सदृढ राहण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून अद्यावत योग भवन उभारण्यात येईल अशी ग्वाही इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी दिली.

इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी रामराजे कापरे, तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा यांचे हस्ते भारत स्वाभिमान ट्रस्ट संजीवन योग सेवा संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय अनपट, मदन चव्हाण, माया विंचू व राजश्री शिंदे या योगगुरूंचा विशेष सन्मान सोहळा इंदापूर शहरातील बायोडायव्हर्सिटी येथे पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

नगराध्यक्षा शहा म्हणाल्या की, प्रत्येकाने दररोज न चुकता कमीत कमी अर्धा तास तरी प्राणायाम, योगासने करणे अत्यंत जरुरीचे आहे. ही काळाची गरज आहे. यामुळे आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल. आपण जर सुदृढ राहिलो तर आपल्या घरातील सर्व कुटुंब सुदृढ राहतील. निरोगी राहतील त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन संपूर्ण कुटुंब आनंदी राहील.

योग सेवा संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय अनपट म्हणाले की, माणसाने जर रोज योगासने केली. तर त्यामुळे आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. त्यामुळे आपण सुदृढ राहतो, त्यामुळे माणूस हा आजारी पडत नाही. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मनोधैर्य सुद्धा उंचावते. म्हणून रोज योगासने करणे शहरी व ग्रामीण जीवन जगत असताना, अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी योग करण्यावर भर द्यावा.