शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

येळकोट येळकोट जयमल्हार गर्जनेने दुमदुमली जेजुरी नगरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 18:19 IST

‘सदानंदाचा येळकोट’ चा जयघोष करीत भंडारा खोब-याची उधळण करीत दीड लाखांवर आलेल्या भाविकांनी सोमवतीची वारी पूर्ण केली.

ठळक मुद्देमध्यरात्रीपासून जेजुरीत रंगला मर्दानी उत्सव.राज्यभरातून आलेले हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी बंदुकीच्या फैरींनी सोहळ्याला सलामी

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत तीर्थक्षेत्र जेजुरीत मध्यरात्री दीड वाजेपासून सोमवती यात्रा उत्सव सोहळा सुरू झाला. आज सकाळी उगवत्या सूर्याला साक्षी ठेवत ७ वाजता क-हा नदीवर उत्सवमूर्तींना विधिवत स्नान अभिषेक स्नानाने सोमवती यात्रेची सांगता झाली. संपूर्ण पालखी सोहळा रात्रीच्या वेळी पार पडल्याचा अनुभव भाविकांनी प्रथमच अनुभवला.  रविवारी(दि.१५) रोजी सकाळी साडेआठ नंतर चैत्र अमावास्येला प्रारंभ झाला होता. कालपासूनच जेजुरीत भाविकांची गर्दी होती. आज सकाळी सव्वासात वाजेपर्यंतच अमावास्येचा पुण्यकाळ होता. सोमवारी उगवत्या सूर्याला अमावास्येचा स्पर्श होत असल्याने सोमवती यात्रा भरवण्यात आली होती. ‘सदानंदाचा येळकोट’ चा जयघोष करीत भंडारा खोब-याची उधळण करीत दीड लाखांवर आलेल्या भाविकांनी सोमवतीची वारी पूर्ण केली. शालेय सुट्ट्या ,विवाहाचे दिवस आणि गावोगावच्या जत्रे-यात्रेचा हंगाम असल्याने रविवारपासूनच जेजुरीत भाविकांची लक्षणीय गर्दी होती. विशेषत: ठाणे, मुंबई, रायगड कोकणातून मोठ्या संख्येने भाविक यात्रेसाठी जेजुरीत मुक्कामी आले होते.     काल मध्यरात्रीनंतर पेशव्यांच्या इशारतीने मध्यरात्रीनंतर दोन वाजता देवाच्या उत्सव मूर्तींच्या पालखी सोहळ्याने गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून कऱ्हेच्या स्नानासाठी प्रस्थान केले. यावेळी बंदुकीच्या फैरींनी सोहळ्याला सलामी देण्यात आली. सज्जातील भाविकांनी ‘येळ कोट येळकोट जय मल्हार’ तसेच ‘सदानंदाचा येळकोट’ चा जयघोष करीत भंडार खोब-याची मोठ्या प्रमाणावर उधळण करीत देवाला मान दिला. संपूर्ण गडकोट पिवळ्या जर्द भंडा-यात न्हाऊन निघाला होता. पालखी सोहळा गड कोटातून क-हा स्नानासाठी बाहेर पडला. खांदेकरी, मानक-यांनी उत्सव मूर्तींची वजनाने खूप जड असणारी पालखी आपल्या खांद्यावर लीलयापार पेलत गडावरुन शहरातील मुख्य नंदी चौकात आणली. तेथून ऐतिहासिक चिंच बागेतील होळकर मंदिराचा मान घेऊन सोहळा क-हा नदीकडे मार्गस्थ झाला. गडकोटातून सुमारे पाच किमी अंतरावर असणा-या कऱ्हेकाठी उत्सवमूर्तींच्या पालखीचा सोहळा रात्रीच्या वेळी जाणार असल्याने या पालखी मार्गावर देवसंस्थानकडून पुरेशा उजेडाची सोय निर्माण केली होती. राज्यभरातून आलेले हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते. सकाळी साडेसहा वाजता सोहळा कऱ्हेकाठी विसावला. सोहळ्याबरोबर आलेल्या भाविकांनी क-हा स्नान केले. त्याचबरोबर कुलधर्म कुळाचाराचे कार्यक्रमही पूर्ण केले. सकाळी ७ वाजता देवाचे पुजारी, ग्रामस्थ मानकऱ्यांनी उत्सव मूर्तींना विधिवत स्नान घातले. यानंतर सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले. कोथळे, रानमळा, कोरपडवस्ती, दवणे मळा येथील मान स्वीकारत सकाळी ९ वाजता  सोहळा ग्रामदेवता जानुबाई मंदिरासमोर विसावला. येथे ग्रामस्थांनी उत्सव मूर्तींचे दर्शन घेतले. सकाळी साडेदहा वाजता सोहळा गडकोटावर पोहोचला. पेशव्यांनी रोजमारा वाटप करून झाल्यावर सोहळ्याची सांगता झाली.

टॅग्स :Jejuriजेजुरी