शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

जकात विभागाची यंदा विक्रमी वसुली

By admin | Updated: April 8, 2017 02:07 IST

भरारी पथकाचा अभाव, अन्य सोई- सुविधांची वानवा, अशा प्रतिकूल परिस्थितीतही उच्चांकी उत्पन्न मिळविले आहे.

देहूरोड : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जकात विभागाने जकात निरीक्षक, वरिष्ठ लिपिक व कर्मचाऱ्यांची कमतरता, जकात चुकवून जाणाऱ्या वाहनांना पकडणाऱ्या भरारी पथकाचा अभाव, अन्य सोई- सुविधांची वानवा, अशा प्रतिकूल परिस्थितीतही उच्चांकी उत्पन्न मिळविले आहे.नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात जकात, पारगमन शुल्क व वाहन प्रवेश शुल्क कराची विक्रमी वसुली जकात विभागाने केली आहे. २० कोटी ४२ लाख २ हजार २०३ रुपयांचे उत्पन्न मिळवून आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या (२०१५-१६) तुलनेत जकात विभागाचे ९७ लाख ३६ हजार २०३ रुपयांनी उत्पन्न वाढले आहे. आर्थिक वर्षाअखेरीला दंडाची वसुली रक्कमही २६ लाखांवर गेली आहे. नोटाबंदीमुळे नोव्हेंबर २०१६ मध्ये वसुली सर्वांत कमी झाली होती. कॅन्टोन्मेंटच्या जकात विभागात आर्थिक वर्षात पहिले पाच महिने मुख्य जकात अधीक्षकपद रिक्त होते. त्या वेळी जकात विभागाचा कार्यभार राहुल साळुंके यांनी सांभाळला होता. त्यानंतर सहा सप्टेंबरला भाग्यश्री शिंदे यांची जकात अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. विभागात जकात निरीक्षक, वरिष्ठ लिपिक यांच्यासह २४ कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही शिंदे यांच्यासह चंद्रकांत कुऱ्हाडे यांनी उपलब्ध कर्मचाऱ्यांना सहकार्य केल्याने त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. खासगीकरणविरोधी निर्णय योग्यच दोन वर्षांपूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक झाल्यांनतर पहिल्याच बैठकीत तत्कालीन सीईओ अभिषेक त्रिपाठी यांनी जकात विभागाचे जकात वगळून खासगीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्या वेळी तत्कालीन अर्थ समिती अध्यक्षा अरुणा पिंजण यांनी जकात विभागातील अपुरी कर्मचारी संख्या असताना वसुली केली़ पुरेसे मनुष्यबळ दिले असते तर आणखी वसुली करणे शक्य झाले असते, असे विविध मुद्दे विस्तृत माहितीसह मांडून ठेक्याची राखीव किंमत पंधरा कोटींहून अधिक सुचविली होती. ही किंमत तत्कालीन मुख्याधिकारी त्रिपाठी यांनी प्रस्तावित राखीव किमतीपेक्षा अधिक असल्याने खासगीकरण प्रस्ताव बारगळला होता. त्यांनतर जकात विभागाचे सतत उत्पन्न वाढत आहे. उपाध्यक्षा अ‍ॅड. पिंजण, अर्थ समिती अध्यक्ष विशाल खंडेलवाल, रघुवीर शेलार, हाजीमलंग मारीमुत्तू यांच्यासह सर्वच सदस्यांनी जकात विभागाच्या खासगीकरणास विरोध केला होता. (वार्ताहर)>उत्पन्न : तीन वर्षे चढता आलेख जकात विभागाने २०१४-१५ या आर्थिक वर्षात १६ कोटी ९ लाख ६ हजार ७०६ रुपयांची वसुली केली. २०१५-१६ मध्ये वसुली १९ कोटी ४४ लाख ६५ हजार ५२१ रुपयांवर पोहोचली होती. गेल्या आर्थिक वर्षात २० कोटी ४२ लाख २ हजार २०३ रुपयांची वसुली केली आहे. यात जकातपोटी ५ कोटी १ लाख ३ हजार ४८० रुपये, पारगमन शुल्कापोटी १३ कोटी ५२ लाख ३७ हजार ३०० रुपये, वाहन प्रवेश शुल्कापोटी १ कोटी ८१ हजार ३५० रुपये, दंडापोटी २६ लाख ७ हजार ३३४ रुपयांचा समावेश आहे. मात्र, नोटाबंदीमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जकात विभागाची वसुली १ कोटी ३६ लाख १३ हजार ५०८ रुपयांपर्यंत खाली आली होती.