शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जकात विभागाची यंदा विक्रमी वसुली

By admin | Updated: April 8, 2017 02:07 IST

भरारी पथकाचा अभाव, अन्य सोई- सुविधांची वानवा, अशा प्रतिकूल परिस्थितीतही उच्चांकी उत्पन्न मिळविले आहे.

देहूरोड : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जकात विभागाने जकात निरीक्षक, वरिष्ठ लिपिक व कर्मचाऱ्यांची कमतरता, जकात चुकवून जाणाऱ्या वाहनांना पकडणाऱ्या भरारी पथकाचा अभाव, अन्य सोई- सुविधांची वानवा, अशा प्रतिकूल परिस्थितीतही उच्चांकी उत्पन्न मिळविले आहे.नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात जकात, पारगमन शुल्क व वाहन प्रवेश शुल्क कराची विक्रमी वसुली जकात विभागाने केली आहे. २० कोटी ४२ लाख २ हजार २०३ रुपयांचे उत्पन्न मिळवून आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या (२०१५-१६) तुलनेत जकात विभागाचे ९७ लाख ३६ हजार २०३ रुपयांनी उत्पन्न वाढले आहे. आर्थिक वर्षाअखेरीला दंडाची वसुली रक्कमही २६ लाखांवर गेली आहे. नोटाबंदीमुळे नोव्हेंबर २०१६ मध्ये वसुली सर्वांत कमी झाली होती. कॅन्टोन्मेंटच्या जकात विभागात आर्थिक वर्षात पहिले पाच महिने मुख्य जकात अधीक्षकपद रिक्त होते. त्या वेळी जकात विभागाचा कार्यभार राहुल साळुंके यांनी सांभाळला होता. त्यानंतर सहा सप्टेंबरला भाग्यश्री शिंदे यांची जकात अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. विभागात जकात निरीक्षक, वरिष्ठ लिपिक यांच्यासह २४ कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही शिंदे यांच्यासह चंद्रकांत कुऱ्हाडे यांनी उपलब्ध कर्मचाऱ्यांना सहकार्य केल्याने त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. खासगीकरणविरोधी निर्णय योग्यच दोन वर्षांपूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक झाल्यांनतर पहिल्याच बैठकीत तत्कालीन सीईओ अभिषेक त्रिपाठी यांनी जकात विभागाचे जकात वगळून खासगीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्या वेळी तत्कालीन अर्थ समिती अध्यक्षा अरुणा पिंजण यांनी जकात विभागातील अपुरी कर्मचारी संख्या असताना वसुली केली़ पुरेसे मनुष्यबळ दिले असते तर आणखी वसुली करणे शक्य झाले असते, असे विविध मुद्दे विस्तृत माहितीसह मांडून ठेक्याची राखीव किंमत पंधरा कोटींहून अधिक सुचविली होती. ही किंमत तत्कालीन मुख्याधिकारी त्रिपाठी यांनी प्रस्तावित राखीव किमतीपेक्षा अधिक असल्याने खासगीकरण प्रस्ताव बारगळला होता. त्यांनतर जकात विभागाचे सतत उत्पन्न वाढत आहे. उपाध्यक्षा अ‍ॅड. पिंजण, अर्थ समिती अध्यक्ष विशाल खंडेलवाल, रघुवीर शेलार, हाजीमलंग मारीमुत्तू यांच्यासह सर्वच सदस्यांनी जकात विभागाच्या खासगीकरणास विरोध केला होता. (वार्ताहर)>उत्पन्न : तीन वर्षे चढता आलेख जकात विभागाने २०१४-१५ या आर्थिक वर्षात १६ कोटी ९ लाख ६ हजार ७०६ रुपयांची वसुली केली. २०१५-१६ मध्ये वसुली १९ कोटी ४४ लाख ६५ हजार ५२१ रुपयांवर पोहोचली होती. गेल्या आर्थिक वर्षात २० कोटी ४२ लाख २ हजार २०३ रुपयांची वसुली केली आहे. यात जकातपोटी ५ कोटी १ लाख ३ हजार ४८० रुपये, पारगमन शुल्कापोटी १३ कोटी ५२ लाख ३७ हजार ३०० रुपये, वाहन प्रवेश शुल्कापोटी १ कोटी ८१ हजार ३५० रुपये, दंडापोटी २६ लाख ७ हजार ३३४ रुपयांचा समावेश आहे. मात्र, नोटाबंदीमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जकात विभागाची वसुली १ कोटी ३६ लाख १३ हजार ५०८ रुपयांपर्यंत खाली आली होती.