शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

गणवेशाच्या मनसुब्यावर यंदाही पाणीच

By admin | Updated: June 29, 2017 03:49 IST

शाळा सुरू झाल्यानंतर किमान काही आठवड्यांत गणवेश मिळावा, या महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या इच्छेवर यंदाही पाणीच पडण्याची चिन्हे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शाळा सुरू झाल्यानंतर किमान काही आठवड्यांत गणवेश मिळावा, या महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या इच्छेवर यंदाही पाणीच पडण्याची चिन्हे आहेत. गुणवत्ता नियंत्रण मंडळाने रिजेक्टचा शिक्का मारलेले जुने गणवेश विद्यार्थ्यांना देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, तर तसे होऊ नये यासाठी गणवेशाचा रंग बदलण्याचा पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. स्थायी समितीच्या सभेत बुधवारी तसा ठरावच करण्यात आला.सुमारे १ लाख विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने दर वर्षी गणवेशवाटप करण्यात येत असते. दर वर्षी कापडाची खरेदी निविदेच्या, नंतर गुणवत्तेच्या कसोटीत सापडते व विद्यार्थ्यांना अनेक महिने विलंबाने गणवेश मिळतात. मागील वर्षी त्यांनी शिवलेले गणवेश वादात सापडले होते. निविदेत नमुना म्हणून दिलेले कापड व प्रत्यक्षात वाटप करण्यासाठी आणलेले गणवेश यांच्यात दर्जाचा फरक होता. त्यामुळे गणवेश गुणवत्ता नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात आले. त्यात ते कसोटी पार करू शकले नाहीत. त्यामुळे रिजेक्ट करण्यात आले. त्यामुळे यंदा गणवेशवाटपाचा विषय स्थायी समितीमध्ये आल्यानंतर दिलीप बराटे, मंजूषा नागपुरे आदी सदस्यांनी जुन्या गणवेशाचा व दुकानांच्या यादीत संबंधित ठेकेदार असल्याचा मुद्दा उपस्थित केला. अध्यक्षांसह सर्व समिती सदस्यांनीही शंका उपस्थित केली.आयुक्त कुणाल कुमार यांनी तसे होणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र तरीही, गणवेशाचा रंगच बदलावा, अशी मागणी करण्यात आली. तसा ठरावच करण्यात आला. त्याचप्रमाणे थेट लाभ योजनेअंतगर्त गणवेश दुकानांमधून खरेदी केले जाणार असले, तरी त्याची गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे. काम एकाच ठेकेदार कंपनीला मिळेल. तो ठेकेदार अन्य दुकानांना पुरवठा करेल. यासाठी किमान महिना तरी लागेल. त्यामुळे रंग बदलूनच गणवेश द्यावेत, असे ठरावात नमूद करण्यात आले. त्याप्रमाणे अंमलबजावणी झाली तर गणवेश मिळण्यास यंदाही विद्यार्थ्यांना १५ आॅगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.