शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

गणवेशाच्या मनसुब्यावर यंदाही पाणीच

By admin | Updated: June 29, 2017 03:49 IST

शाळा सुरू झाल्यानंतर किमान काही आठवड्यांत गणवेश मिळावा, या महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या इच्छेवर यंदाही पाणीच पडण्याची चिन्हे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शाळा सुरू झाल्यानंतर किमान काही आठवड्यांत गणवेश मिळावा, या महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या इच्छेवर यंदाही पाणीच पडण्याची चिन्हे आहेत. गुणवत्ता नियंत्रण मंडळाने रिजेक्टचा शिक्का मारलेले जुने गणवेश विद्यार्थ्यांना देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, तर तसे होऊ नये यासाठी गणवेशाचा रंग बदलण्याचा पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. स्थायी समितीच्या सभेत बुधवारी तसा ठरावच करण्यात आला.सुमारे १ लाख विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने दर वर्षी गणवेशवाटप करण्यात येत असते. दर वर्षी कापडाची खरेदी निविदेच्या, नंतर गुणवत्तेच्या कसोटीत सापडते व विद्यार्थ्यांना अनेक महिने विलंबाने गणवेश मिळतात. मागील वर्षी त्यांनी शिवलेले गणवेश वादात सापडले होते. निविदेत नमुना म्हणून दिलेले कापड व प्रत्यक्षात वाटप करण्यासाठी आणलेले गणवेश यांच्यात दर्जाचा फरक होता. त्यामुळे गणवेश गुणवत्ता नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात आले. त्यात ते कसोटी पार करू शकले नाहीत. त्यामुळे रिजेक्ट करण्यात आले. त्यामुळे यंदा गणवेशवाटपाचा विषय स्थायी समितीमध्ये आल्यानंतर दिलीप बराटे, मंजूषा नागपुरे आदी सदस्यांनी जुन्या गणवेशाचा व दुकानांच्या यादीत संबंधित ठेकेदार असल्याचा मुद्दा उपस्थित केला. अध्यक्षांसह सर्व समिती सदस्यांनीही शंका उपस्थित केली.आयुक्त कुणाल कुमार यांनी तसे होणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र तरीही, गणवेशाचा रंगच बदलावा, अशी मागणी करण्यात आली. तसा ठरावच करण्यात आला. त्याचप्रमाणे थेट लाभ योजनेअंतगर्त गणवेश दुकानांमधून खरेदी केले जाणार असले, तरी त्याची गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे. काम एकाच ठेकेदार कंपनीला मिळेल. तो ठेकेदार अन्य दुकानांना पुरवठा करेल. यासाठी किमान महिना तरी लागेल. त्यामुळे रंग बदलूनच गणवेश द्यावेत, असे ठरावात नमूद करण्यात आले. त्याप्रमाणे अंमलबजावणी झाली तर गणवेश मिळण्यास यंदाही विद्यार्थ्यांना १५ आॅगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.