शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

यंदा रब्बी सरासरी ओलांडणार

By admin | Updated: September 28, 2016 04:37 IST

खरीप हंगाम वाया गेल्यानंतर बारामती तालुक्यातील शेतकरीवर्ग चिंतेत होता. मात्र, परतीच्या पावसाने रब्बी हंगाम सरासरी ओलंडणार, अशी शक्यता आहे. आतापर्यंत तालुक्यात

बारामती : खरीप हंगाम वाया गेल्यानंतर बारामती तालुक्यातील शेतकरीवर्ग चिंतेत होता. मात्र, परतीच्या पावसाने रब्बी हंगाम सरासरी ओलंडणार, अशी शक्यता आहे. आतापर्यंत तालुक्यात ११२ टक्के व सरासरी ३७७.१० मिलिमीटर पाऊस झाल्याचे तालुका कृषी विभागाने सांगितले. बारामती तालुक्यात सरासरी ३५२ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. सलग चार वर्षे दुष्काळामुळे बारामतीच्या जिरायती पट्ट्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. पाणीटंचाईची समस्या कायमच या परिसरात गंभीर होती. टंचाईच्या काळात तब्बल ३४ टँकरने या भागात पाणीपुरवठा सुरू होता. यंदाही पावसाळ्यातील पहिले तीन महिने कोरडे गेल्याने सलग पाचव्या वर्षीदेखील दुष्काळाचे अरिष्ट्य ओढवणार का, या भीतीने शेतकरी हवालदिल झाला होता. दुष्काळाच्या शक्यतेने बाजारपेठेतदेखील मंदीचे वातावरण होते. मात्र, परतीच्या पावसाने यंदा बारामती तालुक्यावर चांगलीच कृपा केली. मागील आठवड्यापासून पडत असलेल्या पावसामुळे ओढे-नाले खळाळू लागले आहेत. बारामती तालुक्यात जलयुक्त शिवारची ६९२ कामे झाली आहेत. खोलीकरण झालेल्या कामांमधून तालुक्यात ७, ४४९ टीसीएम पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढेल.बारामती हा रब्बीचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात रब्बी हंगामामध्ये ज्वारीच्या पेरणीखाली मोठे क्षेत्र असते. रब्बी हंगामात बारामती तालुक्यात सरासरी ३७ ते ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे पीक घेतले जाते. यंदा पाऊसमान चांगला असल्याने याच लागवड क्षेत्रात २ ते ३ हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रब्बीमध्ये उशिरा गहू आणि हरभऱ्याच्यादेखील पोरण्या होतील असा अंदाज तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी) उंडवडीमध्ये सरासरीच्या ५० टक्केच पाऊस...कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे, उंडवडी कडेपठार परिसरात सरासरीच्या ५० टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे या परिसराला अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. असे असले, तरी खडकवासला कालव्यातून आवर्तन मिळाल्यास या परिसरातदेखील रब्बी हंगाम जोर धरेल. शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला गती येणार...सलग चार वर्षांच्या दुष्काळामुळे बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले होते. यंदा पावसाने सरासरी ओलंडल्यानंतर जिरायती पट्ट्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारण्याची आशा आहे. पाऊस लांबल्याने यंदादेखील चिंतेचे सावट होते. शेवटच्या टप्प्यातदेखील पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्याने आशा सोडली होती. मात्र, वरुणराजाने कृपा केली. जिरायती पट्ट्यात दुग्धव्यावसाय मोठ्याप्रमाणात केला जातो. टंचाईच्या काळात चाऱ्याचे भाव गगनाला भिडले होते. पाऊस झाल्याने आता चारा पिकांच्या लागवडीही मोठ्याप्रमाणात होतील. त्यामुळे पुन्हा एकदा दुग्धव्यवसायाला गती मिळेल.