शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

येत्या 6 ऑगस्टला सत्यमेव जयते वॉटर कपचा पुरस्कार सोहळा पुण्यात रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 20:31 IST

गेल्या वर्षी तीन तालुक्यांपासून सुरू झालेली  ‘सत्यमेव जयते वॉटरकप’ स्पर्धा यंदा 30 तालुक्यांमध्ये घेऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्तकरण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले.

पुणे, दि. 27 - गेल्या वर्षी तीन तालुक्यांपासून सुरू झालेली  ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा यंदा 30 तालुक्यांमध्ये घेऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या वॉटर हिरोज चे कौतुक करण्याबरोबरच विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीने दि. 6 आॅगस्ट रोजी  ‘सत्यमेव जयते वॉटर कप 2017’ पुरस्कार सोहळा बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे रंगणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाऊंडेशनचे सह-संस्थापक आमीर खान आणि 4000 ग्रामस्थ उपस्थित राहाणार आहेत. स्पर्धेतील तीन गावांना प्रत्येकी अनुक्रमे 50 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार असल्याची माहितीपानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत  दिली. यावेळी किरण राव आणि डॉ. अविनाश पोळ उपस्थित होते. यंदाच्या वर्षी 8 एप्रिल ते 22 मे या कालावधीत 30 तालुक्यांमध्ये सत्यमेव जयते वॉटर कप ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी एक शंभर मार्कांची गुणांकन पत्रिका तयार करण्यात आली आहे. जे ही पत्रिका सोडवतील तेच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. अगदी गावाचा ताळेबंद मांडण्यापासून वॉटर बजेट, हायड्रो मार्कर अशा गोष्टी गावक-यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून अवगत करून देण्यात आल्या आहेत.  ही चळवळ लोकवर्गणीतून उभी राहिली आहे, मग रक्कम स्वरूपात बक्षिसे कशासाठी? याविषयी विचारले असता स्पर्धेच्या 45 दिवसाच्या कालावधीत जलसंधारणाची सर्व कामे होणे शक्य नाही ही रक्कम त्या कामांसाठी वापरली जावी हा त्यामागचा उददेश आहे. ही बक्षिसे 4 कोटी 10लाख रूपयांची आहेत, 10 लाख रूपये हे सातत्याचे बक्षिस आहे. झाडे जगलीआहेत का? शोष खडडे कार्यरत आहेत का? यावर नियंत्रण ठेवले जात आहे, त्यासाठी हे बक्षिस देण्यात येणार असल्याचे भटकळ यांनी सांगितले.

अशी घेतली जाते स्पर्धाएखाद्या तालुक्याची निवड झाल्यानंतर त्यांना आमीर खानच्या सहीचे पत्र दिले जाते. ग्रामसभेत ठराव केल्यानंतर स्पर्धेसाठी गावाने अर्ज करायचा, मग ज्या लोकांना प्रशिक्षण द्यायचे आहे अशा पाच लोकांची नावे कळवायची यात दोन महिला असणे बंधनकारक आहे. यापूर्वी ज्या गावांमध्ये जलसंधारण झाले आहे अशाच गावांची प्रशिक्षण केंद्र म्हणून निवड करण्यात येते. जलसंधारणाची कामे कशी करायची याचे तांत्रिक ज्ञान त्यांना देण्यात येते. पाणी फाऊंडेशनने एक अँप तयार करण्यात आले आहे, त्यात स्पर्धेच्या नियमांची माहिती देण्यात आली आहे. तसेच पाणी फाऊंडेशन आणि वॉटर कपचा प्रवास मांडणा-या  ‘दुष्काळाशी दोन हात’ ही डॉक्युमेंट्ररी तयार करण्यात आली असल्याचे डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितले.