शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

येत्या 6 ऑगस्टला सत्यमेव जयते वॉटर कपचा पुरस्कार सोहळा पुण्यात रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 20:31 IST

गेल्या वर्षी तीन तालुक्यांपासून सुरू झालेली  ‘सत्यमेव जयते वॉटरकप’ स्पर्धा यंदा 30 तालुक्यांमध्ये घेऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्तकरण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले.

पुणे, दि. 27 - गेल्या वर्षी तीन तालुक्यांपासून सुरू झालेली  ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा यंदा 30 तालुक्यांमध्ये घेऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या वॉटर हिरोज चे कौतुक करण्याबरोबरच विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीने दि. 6 आॅगस्ट रोजी  ‘सत्यमेव जयते वॉटर कप 2017’ पुरस्कार सोहळा बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे रंगणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाऊंडेशनचे सह-संस्थापक आमीर खान आणि 4000 ग्रामस्थ उपस्थित राहाणार आहेत. स्पर्धेतील तीन गावांना प्रत्येकी अनुक्रमे 50 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार असल्याची माहितीपानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत  दिली. यावेळी किरण राव आणि डॉ. अविनाश पोळ उपस्थित होते. यंदाच्या वर्षी 8 एप्रिल ते 22 मे या कालावधीत 30 तालुक्यांमध्ये सत्यमेव जयते वॉटर कप ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी एक शंभर मार्कांची गुणांकन पत्रिका तयार करण्यात आली आहे. जे ही पत्रिका सोडवतील तेच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. अगदी गावाचा ताळेबंद मांडण्यापासून वॉटर बजेट, हायड्रो मार्कर अशा गोष्टी गावक-यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून अवगत करून देण्यात आल्या आहेत.  ही चळवळ लोकवर्गणीतून उभी राहिली आहे, मग रक्कम स्वरूपात बक्षिसे कशासाठी? याविषयी विचारले असता स्पर्धेच्या 45 दिवसाच्या कालावधीत जलसंधारणाची सर्व कामे होणे शक्य नाही ही रक्कम त्या कामांसाठी वापरली जावी हा त्यामागचा उददेश आहे. ही बक्षिसे 4 कोटी 10लाख रूपयांची आहेत, 10 लाख रूपये हे सातत्याचे बक्षिस आहे. झाडे जगलीआहेत का? शोष खडडे कार्यरत आहेत का? यावर नियंत्रण ठेवले जात आहे, त्यासाठी हे बक्षिस देण्यात येणार असल्याचे भटकळ यांनी सांगितले.

अशी घेतली जाते स्पर्धाएखाद्या तालुक्याची निवड झाल्यानंतर त्यांना आमीर खानच्या सहीचे पत्र दिले जाते. ग्रामसभेत ठराव केल्यानंतर स्पर्धेसाठी गावाने अर्ज करायचा, मग ज्या लोकांना प्रशिक्षण द्यायचे आहे अशा पाच लोकांची नावे कळवायची यात दोन महिला असणे बंधनकारक आहे. यापूर्वी ज्या गावांमध्ये जलसंधारण झाले आहे अशाच गावांची प्रशिक्षण केंद्र म्हणून निवड करण्यात येते. जलसंधारणाची कामे कशी करायची याचे तांत्रिक ज्ञान त्यांना देण्यात येते. पाणी फाऊंडेशनने एक अँप तयार करण्यात आले आहे, त्यात स्पर्धेच्या नियमांची माहिती देण्यात आली आहे. तसेच पाणी फाऊंडेशन आणि वॉटर कपचा प्रवास मांडणा-या  ‘दुष्काळाशी दोन हात’ ही डॉक्युमेंट्ररी तयार करण्यात आली असल्याचे डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितले.