शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
7
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
8
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
9
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
10
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
11
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
12
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
13
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
14
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
15
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
16
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
17
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
18
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
19
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
20
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र

जगाला अहिंसा, अनेकांतवादाची आवश्यकता

By admin | Updated: April 21, 2016 00:38 IST

अहिंसा, अपरिग्रह, अनेकांतवाद या तत्त्वाची आज जगाला नितांत आवश्यकता आहे. ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळविला, त्या भगवान महावीरांचे तत्त्वज्ञानच जगामध्ये शांतता प्रस्थापित करेल

पिंपरी : अहिंसा, अपरिग्रह, अनेकांतवाद या तत्त्वाची आज जगाला नितांत आवश्यकता आहे. ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळविला, त्या भगवान महावीरांचे तत्त्वज्ञानच जगामध्ये शांतता प्रस्थापित करेल, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.महावीर जयंतीदिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या वतीने अहिंसा पुरस्काराचे वितरण व विशेष सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी शिवशाहीर पुरंदरे बोलत होते. शिवशाहीर पुरंदरे यांना ‘शिवचरित्र’ या विषयावरील देदीप्यमान कामगिरीबद्दल ‘अहिंसा पुरस्कार’ शहराचे उपमहापौर प्रभाकर वाघिरे यांच्या हस्ते देण्यात आला. निसर्गोपचार व ग्रामीण आरोग्य या क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल डॉ. रवींद्र वसंत निसाळ (उरुळी कांचन) यांना व ‘योगा आणि आयुर्वेद’ या क्षेत्रातील अहिंसा पुरस्कार डॉ. उमेशकुमार डोंगरे (नारायणपूर) यांना उपमहापौर वाघिरे व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते देण्यात आला. मांगीतुंगी येथील मूर्ती तयार करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या सी. आर. पाटील यांचा विशेष सन्मान खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते, तसेच जितो कनेक्ट २०१६ या उपक्रमांचे यशस्वी आयोजन करणारे जितो महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेश सांकला व ‘जितो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष विजय भंडारी व स्वीकृत नगरसदस्य शरद लुणावत यांचा विशेष सन्मान पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आला.खासदार शेट्टी यांचे भाषण झाले. सूत्रसंचालन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. अशोक पगारिया व प्रा. सुरेखा कटारिया यांनी केले. प्रास्ताविक महासंघाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश कटारिया यांनी, स्वागत संजय जैन यांनी, तसेच आभारप्रदर्शन सतीश खाबिया यांनी केले. सदाभाऊ खोत, अण्णा बोदडे, नगरसेविका आशा सूर्यवंशी व संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)