शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

भाजपाची जाणीवपूर्वक बदनामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 04:53 IST

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया हा तळागाळातल्या लोकांचा पक्ष असून तो कार्यकर्त्यांच्या फळीमुळे उभा आहे. मी केवळ भाषण करून इथपर्यंत आलो नाही, तर कार्यकर्त्यांच्या जोरावर आलो आहे.

पुणे - भारतीय जनता पार्टीमुळे राज्य घटना, दलितांच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. मात्र, भाजपाला जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे. आंबेडकरांच्या संविधानाला धक्का लागलाच तर वाटेल ते बलिदान देण्याची माझी तयारी असून मंत्रिपदही सोडेन, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी येथे सांगितले.रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे (आठवले गट) राज्यस्तरीय अधिवेशन झाले.आरपीआय पक्ष हा केवळ दलित वस्तीचा नाही तर गावाचा पक्ष झाला पाहिजे, असे आठवले म्हणाले. शिवसेनेने भाजपाबरोबर युती करावी, अशी पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.बापट म्हणाले, आरक्षणाला धक्का लावण्याचा भाजपाचा कुठलाही विचार नाही. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातही बदल केला जाणार नाही.

  रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया हा तळागाळातल्या लोकांचा पक्ष असून तो कार्यकर्त्यांच्या फळीमुळे उभा आहे. मी केवळ भाषण करून इथपर्यंत आलो नाही, तर कार्यकर्त्यांच्या जोरावर आलो आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पक्ष विस्तारला असून पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारातला भारत उभा करायचा आहे. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी व्यक्त केले.आरपीआयच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या अधिवेशनात आठवले बोलत होते. ते म्हणाले, दलितांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी शासनाची चर्चा सुरू आहेत. तसेच शासनाने २०१४ पर्यंतच्या झोपडपट्ट्यांना मान्यता द्यावी, गरिबांना ४५० स्क्वेअर फुटाचे घर द्यावे, दलितांचे कर्ज माफ करावे, गायरान पडीक जमिनींचा मुद्दा मार्गी लावावा, या अनेक मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. काँग्रेसवर टीका करताना आठवले म्हणाले, की राहुल गांधी यांनी संविधानाची चिंता करू नये. संविधान बचाव मोर्चा काढण्याऐवजी त्यांनी काँग्रेस बचाव असा मोर्चा काढावा. कारण येत्या काळात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील काँग्रेस हद्दपार होणार आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारणnewsबातम्या