शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

त्या कामगाराचे ३७ दिवस उपोषण; तरीही न्याय मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 02:56 IST

कंपनी व्यवस्थापनातील अधिकाºयांनी खोटे आरोप करून बदनामीसह गेल्या ११ महिन्यांपूर्वी कामावरून तडकाफडकी निलंबित केल्याप्रकरणी महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावच्या हद्दीतील इंडूरन्स टेक्नोलॉजी लिमिटेड कंपनीच्या विरुद्ध कंपनीचे कामगार संजय चिंधू सावळे यांनी न्याय मिळण्यासाठी तब्बल एक महिन्यापासून सुरू केलेले

महाळुंगे -  कंपनी व्यवस्थापनातील अधिकाºयांनी खोटे आरोप करून बदनामीसह गेल्या ११ महिन्यांपूर्वी कामावरून तडकाफडकी निलंबित केल्याप्रकरणी महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावच्या हद्दीतील इंडूरन्स टेक्नोलॉजी लिमिटेड कंपनीच्या विरुद्ध कंपनीचे कामगार संजय चिंधू सावळे यांनी न्याय मिळण्यासाठी तब्बल एक महिन्यापासून सुरू केलेले आमरण उपोषण आज बुधवार ( दि.७ मार्च) ३७ व्या दिवशीही सुरूच आहे. न्याय मिळत नसल्याने सावळे हे आपल्या आमरण उपोषणावर ठाम राहिले असून, एक ना एक दिवस आपल्याला न्याय मिळेल, या प्रतीक्षेत आहेत.उपोषणस्थळी कंपनीचा कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी अद्याप फिरकला नसून, सावळे हे दिवसभर उपोषणस्थळी नेमके काय करतात, त्यांना भेट देण्यासाठी कोण कोण येतात, यासाठी कंपनी व्यवस्थापनाने त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी उपोषणस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.सावळे यांनी हरियाना राज्यातील माने सर या गावात इंडूरन्स कंपनीत सलग दोन वर्षे काम केले आहे. त्यानंतर सावळे यांना चाकण येथील याच कंपनीत कामाला जाण्याचा आदेश देण्यात आला होता. कंपनी व्यवस्थापनाचा आदेश ते चाकण येथे स्थायिक झाले.या कंपनीत नोकरीवर असताना कंपनी व्यवस्थापनाने सावळे यांना त्रास देण्यास सुरुवात केली. हरियाना येथील कारखान्याबाबत सावळे यांच्यावर अफरातफर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.कंपनीचे आरोप फेटाळून लावत ते सिद्ध करून दाखवावेत, असे आवाहन सावळे यांनी केले आहे.खातेनिहाय चौकशीचे कारण पुढे करत कंपनी व्यवस्थानाने सावळे यांना कामावरून निलंबित केले. कंपनीने ६ मे, २०१७ पासून सेवा कथीत बेकायदेशीरपणे कमी केल्याने सावळे यांच्यावर आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. त्यांनीसोमवारपासून (दि. २९ जानेवारी) सुरू केलेले आमरण उपोषण आज बुधवारीही (दि.७ मार्च) म्हणजेच ३७ व्या दिवशीही सुरूच आहे.कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकरयांचे स्वीय सहायकाने संपर्क यंत्रणेच्या माध्यमातून सावळे यांच्या प्रकृतीची विचारणा केली. सावळे यांनी उपोषण सोडून कामगार आयुक्तांशी चर्चा करावी. यातून मार्ग निघण्यास विलंब होत असेल तर कामगार मंत्र्यासमोर या उपोषणाची दखल घेतली जाईल. चाकण भागात पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आले असता या कंपनीच्या काही पदाधिकाºयांनी सावळे यांचे उपोषण बेकादेशीर असून, त्यांना हटविण्यात यावे. असे सांगितले. मात्र, सावळे यांनी सांगितले की, कंपनीच्या लोकांनी नांगरे पाटील यांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केली आहे.उपोषण स्थळावर सीसीटीव्हीआमरण उपोषणावर ठाम असलेल्या सावळे यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात असून, उपोषण कालावधीत उपोषण स्थळावरील त्यांचा काही समाजकंटकांनी मंडपही गायब केला. तर काहींनी फ्लेक्सची फाडतोड केली.रात्रंदिवस सावळे उपोषणस्थळी नेमके काय करतात, याकरिता या कंपनीने सीसीटीव्ही कॅमेरे उपोषण स्थळावर लावले आहेत. तरीही सावळे एक महिन्यासह आठ दिवस उलटून देखील उपोषण स्थळावरून हटले नाहीत.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या