शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जलवाहिनीचे काम बंद म्हणजे बंदच

By admin | Updated: June 25, 2017 04:40 IST

आमच्या घरचे लोक नोकऱ्या नसल्याने दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करतात, शेतीला पाणी घेण्यासाठी पाणी परवाने नाहीत, लाभक्षेत्राचे शिक्के काढले नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कआंबेठाण : आमच्या घरचे लोक नोकऱ्या नसल्याने दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करतात, शेतीला पाणी घेण्यासाठी पाणी परवाने नाहीत, लाभक्षेत्राचे शिक्के काढले नाहीत असा समस्यांचा पाढा वाचीत आमचे आंदोलन आता आम्हीच करणार आहोत, तालुक्याच्या लोकप्रतिनिधीची शेतकऱ्यांपुढे एक भूमिका आणि अधिकाऱ्यांपुढे वेगळी भूमिका असे सूत्र आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही नेत्याची गरज नाही. हे आंदोलन आता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे, असे स्पष्ट मत भामा-आसखेडच्या जलवाहिनीविरोधातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी खेड तालुक्यातील भामा- आसखेड धरणावरून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतरदेखील या मागण्या मान्य न झाल्याने शेतकऱ्यांनी जलवाहिनी आणि जॅकवेलचे काम अडविले होते त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि प्रशासन यांच्यात सामंजस्य राहावे म्हणून चाकण पोलिसांनी आयोजित केलेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी वरील भूमिका स्पष्ट केली.या वेळी सत्यवान नवले, बाळासाहेब लिंभोरे पाटील, पाटील लिंभोरे पाटील, ग्रामपंचायत सदस्य पंडित कोळेकर, संजय कोळेकर, किसन नवले, सुखराज लिंभोरे पाटील, तानाजी नवले, भीमराव नवले, गोविंद गोपाळे यांच्यासह प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते.या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, चाकण पोलीस ठाण्याचे मनोज यादव, पुणे महानगरपालिकेचे उपअभियंता एस. एन. कुलकर्णी, मुकुंद बर्वे, के. एच. लखानी, राजेश भूतकर, शेखर कुलकर्णी आदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.सगळे लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. ट्रॅक्टर मोर्चामधील एकही नेता आज आमच्याबरोबर नाही. तालुक्याचे आमदार इकडे शेतकऱ्यांबरोबर असल्याचे सांगत असून दुसरीकडे अधिकारी आणि ठेकेदाराला काम सुरू ठेवण्यास सांगत आहेत, असा आरोप करीत लोकप्रतिनिधींनी अशी दुटप्पी भूमिका सोडावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही या वेळी शेतकऱ्यांनी दिला.