शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जुन्या कालव्यावरील पुलाचे काम अर्धवट अवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:11 IST

उरुळी कांचन: उरुळी कांचन ते श्रीक्षेत्र डाळिंब ( ता.दौंड) कडे पांढरस्थळवस्ती मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील जुन्या मुठा कालव्यावरील पुलाचे ...

उरुळी कांचन: उरुळी कांचन ते श्रीक्षेत्र डाळिंब ( ता.दौंड) कडे पांढरस्थळवस्ती मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील जुन्या मुठा कालव्यावरील पुलाचे काम जलसंपदा विभागाच्या नाकर्तेपणाने व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अनेक वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहेत. या रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

डाळिंब देवस्थानकडे जाण्याचा हा मार्ग असल्याने रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. पण सध्या पुलावरील रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत बंद असल्याने तसेच खडीचे व मुरमाचे ढीग ठिकठिकाणी पडून असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहेत, याबाबत यवत उपविभागाचे उपअभियंता शंकरराव बनकर यांचेशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की ११० मीटर लांबीच्या रस्त्याचे काम अपूर्ण व अर्धवट आहे हे मान्य आहे, पुलाचे ठेकेदार रमेश खारतोडे यांना पुलावरील ११० मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे.

याबाबत ठेकेदार रमेश खारतोडे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, येथील काही राजकीय कार्यकर्ते वाजवी पेक्षा जास्त काम करा असा आग्रह धरून काम करण्यासाठी आणलेल्या कामगारांना काम करू देत नाहीत त्यामुळे मला काम पूर्ण करण्यास उशीर होत आहे.याठिकाणी काम करताना अनेक अडचणींना सामोरे जात काम पूर्ण केले अनेक वेळा कामासाठी आणलेले मटेरीअल चोरीला जाण्याचे प्रकार घडले आहेत.

दरम्यान, उरुळी कांचन ते श्रीक्षेत्र डाळिंब या रस्त्यावरील काम वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते. ठेकेदार व अधिकारी त्यांच्या सवडीनुसार हे काम पूर्ण करण्याचे धोरण ते राबवीत आहे. जलसंपदा विभागाला हे काम पूर्ण करायचे आहे की नाही हे कळत नाही. हे काम तातडीने पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कांचन यांनी दिला आहे.

०६ उरुळी कांचन

उरुळी कांचन ते श्रीक्षेत्र डाळिंब रस्त्याचे अर्धवट असलेले काम.