शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘क्लीन सिटी’त महिलांची कुचंबणा

By admin | Updated: May 10, 2016 00:41 IST

क्लीन सिटी म्हणून देशात नववा व राज्यात पहिला पुरस्कार मिळविणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात महिला स्वच्छतागृहांचा अभाव आहे.

सुवर्णा नवले, पिंपरीक्लीन सिटी म्हणून देशात नववा व राज्यात पहिला पुरस्कार मिळविणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात महिला स्वच्छतागृहांचा अभाव आहे. लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे महिलांच्या पदरी कुचंबणा आली आहे. शहरात चकाचक चौपदरी रस्ते व कोट्यवधीचे उड्डाणपूल बांधले गेले. मात्र, मुख्य रस्त्यांवर व चौकांत सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा सर्वांना सोयीस्कर विसर पडला. स्वच्छतागृह उभारण्यासाठी जागा नसल्याचे सांगत प्रशासनाने हात वर केले. त्याच वेळी महिला पदाधिकाऱ्यांचेही महिलांच्या स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे उद्योगनगरीत कामाच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या महिलांची कुचंबणा होऊ लागली आहे. त्यातून आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या २२ लाख असून, नोकरदार महिलांची संख्या ५० हजारांहून अधिक आहे. मात्र, प्रमुख रस्त्यांवर मुतारी व स्वच्छतागृह दृष्टीस पडत नाही. गेल्या चार ते पाच वर्षांत नोकरदार महिलांची कामानिमित्त बाहेरगावी व शहरात ये-जा करण्याच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाली. मात्र, त्या तुलनेत स्वच्छतागृहांची संख्या तुटपुंजी राहिली आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जी स्वच्छतागृहे आहेत. त्यांची परिस्थिती वापरण्यास योग्य नाही. झोपडपट्टीत रांगा...१मजूर महिलेपासून ते उच्चवर्गीय महिलांना नैसर्गिक विधीसाठी पुन्हा घरी यावे लागते. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे असणाऱ्या झोपडपट्टी भागात शौचालयासाठी आजही महिलांना सकाळच्या वेळी रांगा लावून ताटकळत उभे राहावे लागते. अद्यापही महिलांना स्वच्छतागृहांसाठी प्रतीक्षा करावी लागणे, ही दुर्दैवाची बाब आहे. ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’२शहरातील बस स्थानके, रेल्वे स्थानके, शासकीय व सार्वजनिक ठिकाणी तरंगती लोकसंख्या सर्वाधिक असते. त्यामध्ये महिलांचा वावर जास्त वाढला आहे. अशा ठिकाणी दररोजच्या धकाधकीच्या प्रवासात स्वच्छतागृहांअभावी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो. नोकरदार महिलांची कधी-कधी इतकी नाचक्की होते की, महिलांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. कामावरून घरी जात असताना रस्त्यात मुताऱ्याही आढळून येत नाहीत. त्यामुळे घरी पोहोचेपर्यंत आम्हाला त्रास सहन करावा लागतो. या समस्या खुलेपणानेही मांडता येत नाहीत, अशी व्यथा एक मजूर महिलेने ‘लोकमत’कडे मांडली.