शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
4
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
5
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
6
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
7
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
8
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
9
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
10
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
11
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
12
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
13
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
14
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
15
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
16
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
17
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
18
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
19
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
20
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

‘विशाखा’बाबत महिलाच अंधारात

By admin | Updated: March 30, 2015 05:30 IST

कामाच्या ठिकाणी लंैगिक छळ रोखण्यासाठी विशाखा समिती स्थापन करणे हे प्रत्येक संस्थेला बंधनकारक आहे, मात्र शहरातील ८६ टक्के महिलांना विशाखा मार्गदर्शक तत्त्वे

हिनाकौसर खान-पिंजार, नम्रता फडणीस,  पुणेकामाच्या ठिकाणी लंैगिक छळ रोखण्यासाठी विशाखा समिती स्थापन करणे हे प्रत्येक संस्थेला बंधनकारक आहे, मात्र शहरातील ८६ टक्के महिलांना विशाखा मार्गदर्शक तत्त्वे काय, अशी कुठली समिती स्थापन करायची असते हेच माहीत नसल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत सर्वेक्षणा’तून समोर आली आहे. तसेच काही महिलांना ही समिती अस्तित्वात असणे आवश्यक वाटत असले तरी मुळातच ती कशी स्थापन करायची याचीदेखील त्यांच्यामध्ये जागरूकता नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आजही कामाच्या ठिकाणी महिलांवर होत असलेले लैंगिक छळ दाबले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.चार वर्षांपूर्वी एका प्राचार्याने, एका प्राध्यापिकेचा मानसिक छळ केला. या लंैगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवला गेला; मात्र या संदर्भात नुकताच जो निकाल घोषित झाला त्यामध्ये केवळ एकाच सदस्याने प्राचार्याला दोषी ठरवले. त्यामुळे आपसूकच तिच्या विरोधात निकाल लागला. इतकी वर्षे देत असलेल्या लढ्याला एका झटक्यात अपयशाला सामोरे जावे लागले. अशी अनेक उदाहरणे समाजात असू शकतील. याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने पुणे शहरातील नोकरदार महिलांना कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक आण् िलैंगिक छळाविरोधी तक्रार नोंदविणाऱ्या विशाखा समितीबद्दलची कितपत माहिती आहे याबाबत सर्वेक्षण केले. त्यामध्ये ६० टक्के महिलांना माहिती नसल्याचे समोर आले. दरम्यान, विशाखा समितीबाबत शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नुकताच विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. दिवसातून अधिक वेळ त्या कामाच्या ठिकाणी घालवत असल्याने तिथे त्या सुरक्षित आहेत की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्नही या सर्वेक्षणाच्या माध्यमातून करण्यात आला. बहुतांश महिलांनी कामाचे ठिकाणचे वातावरण महिलांसाठी पोषक असल्याचे सांगितले तसेच त्यांना सन्मानाची वागणूक मिळत असल्याचे आशादायी चित्रही त्यांच्या बोलण्यातून आढळले. ही काहीशी सकारात्मक बाब असली तरीही कामाच्या ठिकाणी काहीही लंैगिक छळाच्या घटना घडल्या तर दाद कोणाला मागायची तर फार तर फार वरिष्ठांकडे एवढेच त्यांना माहिती असल्याचेही निदर्शनास आले. पण जर एखाद्या महिलेवर वरिष्ठांकडूनच शोषण झाले असेल तर अशा वेळी त्यांनी काय करायचे याचे उत्तर ४० टक्के महिलांना देता आले नाही. पुरुषांबरोबर काम करताना इतकं तर होणारच म्हणून हा विषयच किरकोळीत काढण्यात येतो. मुळातच आपला छळ होत असल्याचे सिद्ध करणे महिलांना अवघड जात असते त्यामुळे त्या पुढे येण्यास धजावत नाहीत. मात्र अशा तक्रार निवारण समित्या किमान त्यांना मोकळेपणाने पुढे येण्यास संधी देऊ शकतात. संस्था, कार्यालयांमध्ये वैयक्तिक पातळीवर काही समित्या नेमल्याचे सांगितले जात असले तरी कायदेशीर स्तरावर त्याच नावाने त्या स्थापन होणे बंधनकारक आहे. मात्र बऱ्याचदा कंपन्या किंवा संस्थांकडून पळवाटा काढल्या जातात. उघडपणे याबद्दल बोलले जाऊ नये, म्हणून वरदाखल अशा समित्या स्थापन करण्यात येत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.