शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

प्रसंगी आत्मदहन करू, पण जमीन देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:13 IST

जेजुरी : मोठ्या कष्टाने जिरायती जमिनी आम्ही बागायती केल्या आहेत. गावाच्या शिवारात आता ८० टक्के जमिनी बागायती आहेत. ...

जेजुरी : मोठ्या कष्टाने जिरायती जमिनी आम्ही बागायती केल्या आहेत. गावाच्या शिवारात आता ८० टक्के जमिनी बागायती आहेत. अशा वेळी या परिसरात विमानतळ कसे करता? असा सवाल उपस्थित करीत पांडेश्वर च्या ग्रामस्थांनी प्रसंगी आम्ही आत्मदहन करू परंतु पण पण एक इंच ही विमानतळाला जमीन देणार नाही, असा निर्धार पांडेश्वर येथील ग्रामस्थांनी ही दिला आहे.

पुरंदर तालुक्यातील पारगाव व सात गावांच्या परिसरात छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. मात्र, तेथील ग्रामस्थांचा विरोध पाहता विमान प्राधिकरणाकडून नव्याने याच गावांच्या पूर्वेकडे रिसे, पिसे पांडेश्वर या परिसरातील जागा ही योग्य असल्याने या ठिकाणी ही सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव आहे. तशा बातम्याही वर्तमानपत्रातून आल्याने यापरिसरात मोठी खळबळ माजली आहे. पारगाव व सात गावांप्रमानेच या ही परिसरातून विमानतळाला विरोध होऊ लागला आहे. काल रिसे पिसे या परिसरातील ग्रामस्थांनी विमानतळाला मोठा विरोध दर्शविला आहे. तर आज पांडेश्वर येथे ही विमानतळाला विरोध आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी ग्रामस्थांनी बैठक घेतली होती.

बैठकीला पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडे, माजी सरपंच उत्तम शिंदे, संजय जगताप, शैलेश रोमन, पंढरीनाथ सोनवणे, विलास नाळे,अनिल शेंडगे आदिंनी मार्गदर्शन केले.

येथील शेतकऱ्यांनी योग्य नियोजन आणि मोठया कष्टांने जाणाई शिरसाई व पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून सातशे एकर ऊस उत्पादन घेतले आहे. डाळिंब, सीताफळ, पेरू आदींच्या फळबागा फुलवल्या आहेत. पांडेश्वरच्या शिवारातील ८० टक्के शिवार बागायती आहे. येथील शेतकरी, तरुण आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. अशावेळी शासनाने विमानतळाऐवजी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. शासनाने सुविधा पुरवून इथला विकास साधण्याऐवजी विमानतळाला जमिनी घेऊन आम्हाला भकास करू नये. इथला कोणीही शेतकरी विमानतळाला एक इंचही जमीन देणार नाही. प्रसंगी आत्मदहन करू असा इशारा सर्वच ग्रामस्थांनी देत विमानतळाला प्रखर विरोध दर्शविला आहे. यावेळी विमानतळ हटवा, गाव वाचवा अशा घोषणा ही देण्यात आल्या.

फोटो मेल केला आहे