शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

...अखेर हरणेश्वर अँग्रो निघणार मोडकळीत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:12 IST

-- कळस : इंदापूर तालुक्यातील कळस येथील शर्कराकंदापासून इथेनॉल निर्मिती करणारा हरणेश्‍वर ॲग्रो या प्रकल्पाचा अवसायक काढून लिलाव ...

--

कळस : इंदापूर तालुक्यातील कळस येथील शर्कराकंदापासून इथेनॉल निर्मिती करणारा हरणेश्‍वर ॲग्रो या प्रकल्पाचा अवसायक काढून लिलाव थांबवण्यासाठी कारखाना व्यावस्थापनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी संध्याकाळपर्यंत न्यायालयाने सुनावणीसाठी तारीख दिली नाही, त्यामुळे कारखान्याचा मंगळवारी (दि. २०) लिलाव होऊन कारखाना मोडकळीस निघणार असल्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, स्थगिती आणण्यासाठी कारखाना संचालक प्रयत्नशील असल्याची माहिती माऊली चवरे यांनी दिली.

लिलावामुळे कारखान्याची मोठी मालमत्ता असूनही कारखाना कवडीमोल किमतीत भंगारात विकला जाण्याची शक्यता आहे. कारखाना व्यवस्थापनाने बँक व अवसायक यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये कारखाना व्यावस्थापन कर्ज भरण्यास तयार असून लिलाव रद्ध करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र सोमवार दि. १९ पर्यंत कोणतीही सुनावणीसाठी तारीख मिळाली नाही त्यामुळे लिलाव होण्याची शक्यता बळावली आहे.

शर्कराकंदपासून इथेनाॅल निर्मिती करण्यात यश न आल्याने त्यामधील अडचणी व शासन धोरण ओळखून साखर कारखाना परवाना मिळवण्यासाठी प्रयत्न झाला मात्र अंतराची अट आल्याने परवाना दिला गेला नाही त्यामुळे उसापासून गूळ पावडर,निर्मिती करण्यास सुरुवात झाली व गूळ पावडर,यावर ह्या कारखान्याची आर्थिक गणिते कोलमडली. कारखान्यावर अनेक बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले त्यामुळे कारखाना डबघाईला आला तडजोडीअंतर्गत सुमारे २५ कोटी रुपयांचे अनेक बँकाचे कर्ज आहे कारखान्याची स्थावर व मशनिरी अशी सुमारे ४५ कोटी रूपयांची मालमत्ता आहे मात्र लिलाव झाल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे.

इथेनाॅल निर्मितीला प्रोस्ताहान देणारे केंद्रशासनाचे धोरण असल्याने २०२५ पर्यंत ३० टक्के इथेनाँल मिश्रणाला परवानगी मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा लिलाव नुकसानकारक आहे कारखान्यावर सत्ता असणारी मंडळी पुर्वाश्रमीपासून भाजपात आहेत केंद्रात सरकार असूनही लक्ष दिले जात नाही ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे तसेच इंदापूर, बारामती, दौंड फलटण ,पुरंदर येथील सुमारे बारा हजार सभासदांनी आपले शेअर्स जमा केले होते त्यांचेही नुकसान होणार आहे .

जिल्हातील यशवंत सहकारी व हरणेश्वर अॅग्रो हे कारखाने कर्जाचा बोजा वाढल्याने एकाचवेळी बंद पडले व अवसायक नेमले गेले दोन्ही कारखान्यांकडे २०० एकर पेक्षा जास्त जमिनी आहेत यशवंत बचावासाठी जोरदार राजकिय व प्रशासकिय प्रयत्न चालु आहेत मात्र हरणेश्वरला कोणी कैवारीच राहीला नाही.

--

कोट

प्रकल्पाला स्थगिती मिळावी म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, कोविडमुळे सुनावणी होऊ शकली नाही, त्यामुळे लिलावास स्थगिती मिळालेली नाही अवसायककडुन (मंगळवार, दि. २०) रोजी लिलावाची प्रकिया होणार असल्याने आम्ही उद्याही न्यायालयीन स्थगीतीसाठी प्रयत्नशील आहोत.

-माऊली चवरे,

संचालक