शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दीड महिन्यासाठी शाळा सुरू करण्याचा अट्टहास कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:13 IST

डम्मीची बातमी पुणे : सध्या जिल्ह्यात पाचवी ते आठवी इयत्तेचे वर्ग सुरू झाले आहेत. पाचवी ते आठवीच्या शाळांमध्ये केवळ ...

डम्मीची बातमी

पुणे : सध्या जिल्ह्यात पाचवी ते आठवी इयत्तेचे वर्ग सुरू झाले आहेत. पाचवी ते आठवीच्या शाळांमध्ये केवळ ५० टक्के उपस्थिती असतानाच पहिली ते चौैथीच्या वर्गातील मुलांच्या पालकांनी शाळा सुरू करण्याबाबत ‘नो मीन्स नो’ अशी भूमिका घेतली आहे. मुले मात्र घरी बसून कंटाळलेली असल्याने त्यांना शाळेत जाण्याचे वेध लागले आहेत. पाचवी ते आठवीच्या मुलांच्याही शाळा केवळ एका महिन्यासाठी कशाला सुरू करायच्या, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

कोरोनाचा संसर्ग काहीसा आटोक्यात आला असला तरी पूर्णपणे ओसरलेला नाही. पालकांच्या मनातील कोरोनाची भीतीही गेलेली नाही. त्यातच शुक्रवारी कोंढवा परिसरातील एक शिक्षिका कोरोनाग्रस्त आढळून आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिली ते चौैथीच्या मुलांना तर शाळेत पाठवण्याचे नावही काढू नका, असा पवित्रा पालकांनी घेतला आहे. दर वर्षी मार्च- महिन्यात शाळांच्या परीक्षा संपतात आणि एप्रिलपासून सुट्टी लागते. अशा वेळी दीड महिन्यासाठी शाळा सुरु करण्याचा घाट कशासाठी घातला जात आहे, अशी शंका पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

शाळांची वेळ कमी करण्यात आली आहे. काही शाळांनी व्हॅन चालकांना मुलांची ने-आण करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, बहुतांश पालक मुलांना स्वत: सोडणे आणि घेऊन येणे पसंत करतात. व्हॅनचालक राजेंद्र कुमठेकर म्हणाले, ‘सध्या व्हॅनमध्ये ७ जणांना तर रिक्षात ३ विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यास परवानगी आहे. गाडीचे दिवसातून दोनदा निजर्तुंकीकरण केले जाते. शाळेने आमचीही कोरोना तपासणी करुन अहवाल घेतला आहे. सातवी ते दहावीच्या मुलांना पालक व्हॅनमधून पाठवतात. मात्र, पाचवी-सहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आॅनलाईन शाळेलाच प्राधान्य दिले आहे.’

----------------------

जिल्ह्यात पहिली ते चौथीच्या शाळा - २८५७

विद्यार्थी - १,७७,४५७

महापालिकेच्या शाळा (पाचवी ते आठवी) - ९२५

सुरु झालेल्या शाळा - ७८१

विद्यार्थी संख्या - १५८५८३

उपस्थित विद्यार्थी संख्या - ४३२८०

-----------------

मुलांना हवी शाळा

मला एक वर्ष घरात बसून खूप कंटाळा आला आहे. आई-बाबांचे आॅफिसही सुरु झाले आहे. सकाळी दोन तास आॅनलाईन शाळा झाली की दिवसभर काय करायचे, असे वाटते. आजोबा घराबाहेर खेळायलाही सोडत नाहीत. त्यामुळे शाळा लवकर सुरु व्हावी आणि मित्र-मैैत्रिणींना भेटता यावे.

- पार्थ ढवळे, पाल्य, इयत्ता तिसरी

-------------------

शाळा सुरु झाली की मजा-मस्ती करता येते. सगळयांबरोबर मिळून डबा खाता येतो, खेळ खेळता येतात. शाळा बंद असल्यामुळे सगळे रुटीनच बिघडले आहे. शाळेत जावेसे वाटते आणि कोरोनाची भीतीही वाटते.

- गार्गी कुलकर्णी, पाल्य, इयत्ता पहिली

------------------------

वार्षिक परीक्षेला एक-दीड महिनाच राहिला आहे. असे असताना शाळा सुरु करण्याचा अट्टाहास का? नवीन शैैक्षणिक वर्षापासून आॅफलाईन शाळेचा श्रीगणेशा होऊ शकतो. मग शालेय प्रशासन मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांना आताच का? वेठीला धरत आहे? मुलांचीही अजून शाळेत जाण्याची मानसिक तयारी झालेली नाही. त्यामुळे या सगळयाचा विचार करुन शाळा थेट जूनमध्येच सुरु करावी, अशी मागणी आहे.

- रमा फडणीस, पालक

--------------------------

मुलांना अजूनही सोशल डिस्टन्सिंगचे महत्व पूर्णपणे कळलेले नाही. मुले शाळेत गेली की एकमेकांच्या संपर्कात येणार, एकमेकांचे डबे खाणार...या गोष्टी कितीही काळजी घेतली तरी टाळता येण्यासारख्या नाहीत. आॅनलाईन शाळेचे वेळापत्रकही व्यवस्थित बसले आहे. त्यामुळे आता शाळा सुरु झाल्या तरी मुलांना पाठवण्याची आमची तयारी नाही.

- रुपाली कागले, पालक