शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

दीड महिन्यासाठी शाळा सुरू करण्याचा अट्टहास कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:13 IST

डम्मीची बातमी पुणे : सध्या जिल्ह्यात पाचवी ते आठवी इयत्तेचे वर्ग सुरू झाले आहेत. पाचवी ते आठवीच्या शाळांमध्ये केवळ ...

डम्मीची बातमी

पुणे : सध्या जिल्ह्यात पाचवी ते आठवी इयत्तेचे वर्ग सुरू झाले आहेत. पाचवी ते आठवीच्या शाळांमध्ये केवळ ५० टक्के उपस्थिती असतानाच पहिली ते चौैथीच्या वर्गातील मुलांच्या पालकांनी शाळा सुरू करण्याबाबत ‘नो मीन्स नो’ अशी भूमिका घेतली आहे. मुले मात्र घरी बसून कंटाळलेली असल्याने त्यांना शाळेत जाण्याचे वेध लागले आहेत. पाचवी ते आठवीच्या मुलांच्याही शाळा केवळ एका महिन्यासाठी कशाला सुरू करायच्या, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

कोरोनाचा संसर्ग काहीसा आटोक्यात आला असला तरी पूर्णपणे ओसरलेला नाही. पालकांच्या मनातील कोरोनाची भीतीही गेलेली नाही. त्यातच शुक्रवारी कोंढवा परिसरातील एक शिक्षिका कोरोनाग्रस्त आढळून आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिली ते चौैथीच्या मुलांना तर शाळेत पाठवण्याचे नावही काढू नका, असा पवित्रा पालकांनी घेतला आहे. दर वर्षी मार्च- महिन्यात शाळांच्या परीक्षा संपतात आणि एप्रिलपासून सुट्टी लागते. अशा वेळी दीड महिन्यासाठी शाळा सुरु करण्याचा घाट कशासाठी घातला जात आहे, अशी शंका पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

शाळांची वेळ कमी करण्यात आली आहे. काही शाळांनी व्हॅन चालकांना मुलांची ने-आण करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, बहुतांश पालक मुलांना स्वत: सोडणे आणि घेऊन येणे पसंत करतात. व्हॅनचालक राजेंद्र कुमठेकर म्हणाले, ‘सध्या व्हॅनमध्ये ७ जणांना तर रिक्षात ३ विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यास परवानगी आहे. गाडीचे दिवसातून दोनदा निजर्तुंकीकरण केले जाते. शाळेने आमचीही कोरोना तपासणी करुन अहवाल घेतला आहे. सातवी ते दहावीच्या मुलांना पालक व्हॅनमधून पाठवतात. मात्र, पाचवी-सहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आॅनलाईन शाळेलाच प्राधान्य दिले आहे.’

----------------------

जिल्ह्यात पहिली ते चौथीच्या शाळा - २८५७

विद्यार्थी - १,७७,४५७

महापालिकेच्या शाळा (पाचवी ते आठवी) - ९२५

सुरु झालेल्या शाळा - ७८१

विद्यार्थी संख्या - १५८५८३

उपस्थित विद्यार्थी संख्या - ४३२८०

-----------------

मुलांना हवी शाळा

मला एक वर्ष घरात बसून खूप कंटाळा आला आहे. आई-बाबांचे आॅफिसही सुरु झाले आहे. सकाळी दोन तास आॅनलाईन शाळा झाली की दिवसभर काय करायचे, असे वाटते. आजोबा घराबाहेर खेळायलाही सोडत नाहीत. त्यामुळे शाळा लवकर सुरु व्हावी आणि मित्र-मैैत्रिणींना भेटता यावे.

- पार्थ ढवळे, पाल्य, इयत्ता तिसरी

-------------------

शाळा सुरु झाली की मजा-मस्ती करता येते. सगळयांबरोबर मिळून डबा खाता येतो, खेळ खेळता येतात. शाळा बंद असल्यामुळे सगळे रुटीनच बिघडले आहे. शाळेत जावेसे वाटते आणि कोरोनाची भीतीही वाटते.

- गार्गी कुलकर्णी, पाल्य, इयत्ता पहिली

------------------------

वार्षिक परीक्षेला एक-दीड महिनाच राहिला आहे. असे असताना शाळा सुरु करण्याचा अट्टाहास का? नवीन शैैक्षणिक वर्षापासून आॅफलाईन शाळेचा श्रीगणेशा होऊ शकतो. मग शालेय प्रशासन मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांना आताच का? वेठीला धरत आहे? मुलांचीही अजून शाळेत जाण्याची मानसिक तयारी झालेली नाही. त्यामुळे या सगळयाचा विचार करुन शाळा थेट जूनमध्येच सुरु करावी, अशी मागणी आहे.

- रमा फडणीस, पालक

--------------------------

मुलांना अजूनही सोशल डिस्टन्सिंगचे महत्व पूर्णपणे कळलेले नाही. मुले शाळेत गेली की एकमेकांच्या संपर्कात येणार, एकमेकांचे डबे खाणार...या गोष्टी कितीही काळजी घेतली तरी टाळता येण्यासारख्या नाहीत. आॅनलाईन शाळेचे वेळापत्रकही व्यवस्थित बसले आहे. त्यामुळे आता शाळा सुरु झाल्या तरी मुलांना पाठवण्याची आमची तयारी नाही.

- रुपाली कागले, पालक