शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

By श्रीकिशन काळे | Updated: April 27, 2024 20:33 IST

Mahesh Manjrekar in Pune: जर एखादा क्रीडामंत्री खेळाडूला बनवले किंवा एका चांगल्या शिक्षकाला शिक्षणमंत्री केले तर काय बिघडते ?

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘‘सध्या राजकारणाची स्थिती अत्यंत वाईट झालीय. तुम्हाला देश चालवायचा असतो. पण तुमची तेवढी पात्रता आहे का ? राजकीय लोकं मंत्री होतात. त्यांची पात्रता किमान बारावी पास तरी असायला हवी. जर एखादा क्रीडामंत्री खेळाडूला बनवले किंवा एका चांगल्या शिक्षकाला शिक्षणमंत्री केले तर काय बिघडते ? उलट ते चांगल्याप्रकारे काम करतील,’’ अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्ट्यावर शनिवारी (दि.२७) मांजरेकर बोलत होते. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी आदी उपस्थित होते.

राजकारणात प्रत्येकाने रूची घेणे गरजेचे आहे. तुम्ही प्रश्न विचारत नाही. मला खूप वाटतं की, अनेकांनी यात यायला हवे. जयललिता, एनटी रामाराव पासून अनेकांनी दोन्हीकडे चांगले काम केले. राजकीय लोकांना आता वाटते की, अभिनेत्यांनी राजकारणात यावे.

राजकारणी हे डिग्री घेऊन येत नाहीत. मला असं वाटतं की, जे संवेदनशील आहेत, त्यांनी राजकारणात यावे. एखाद्या कार्यालयात शिपायाची जागा आहे, त्यालाही बारावीची पात्रता लागते. जो देश चालवतो, तिथे निदान बारावी पास तरी हवा. तुम्ही देश चालवणार आहात. शिपायाकडून अपेक्षश करता की त्याने बारावी पास असावा. एवढा मोठा देश आहे .नाही तर तुम्ही नियुक्त्या करता. एखादा डॉक्टरला आरोग्य मंत्री करा ना, एकादा टिचर शिक्षणमंत्री करा ना. आज ज्याने बॅट उचलली नाही तो क्रीडामंत्री असतो. हे एक मॉडेल म्हणून करायला काहीच हरकत नाही.

आज आयडॉलॉजी राहिलेली नाही. मला कोणाला मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न आहे. कोणी कुठेही आहे. सर्व कन्फ्युजन आहे, असे मांजरेकर म्हणाले.

टॅग्स :Mahesh Manjrekarमहेश मांजरेकर Politicsराजकारण