शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 03:20 IST

सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडे मागितली कारणे; ७ पैकी केवळ एकाच सदस्याची नियुक्ती

पुणे : राष्ट्रीय हरित प्राधिकरणाचे (एनजीटी) कामकाज चालावे, यासाठी ७ तज्ज्ञ व्यक्तींची शिफारस केली असताना त्यातील केवळ एकाच तज्ज्ञाची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरीत ६ तज्ज्ञांची नियुक्ती का झाली नाही? असा सवाल करीत सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती न करण्यामागील कारणे सरकारकडे मागितले आहेत.तब्बल एक वर्षापासून देशातील एनजीटीचे कामकाज न्यायाधीशांच्या निवडीअभावी ठप्प पडले आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये न्यायाधीश निवडीबाबत केंद्र सरकारकडूनच दिरंगाई होत असल्याची बाब समोर आली आहे. एनजीटीच्या सर्व विभागीय खंडपीठामध्ये न्यायाधीशांची निवड होत नसल्याने पुणे एनजीटी बार असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेच्या निमित्ताने केंद्र सरकारकडूनच न्यायाधीश निवडीबाबत दिरंगाई होत असताना याचिका फेटाळण्याची मागणी केली जात असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ कुलकर्णी यांनी सांगितले.परंतु, त्यातील केवळ एकाचीच निवड करण्यात असून इतर सहा जणांचे अर्ज का अमान्य केले गेले, याबाबत सांगितले नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सहा जणांची निवड का केली नाही, याबाबतचे कारण बंद लिफाफ्यात१ जानेवारीपूर्वी सादर करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ जानेवारीला होणार आहे.एनजीटीचे कामकाच बंद असल्याने पर्यावरणाच्या विषयावर दाखल असलेल्या अनेक याचिका प्रलंबित आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने सर्वांनाच न्याय मिळणे अशक्य आहे. मात्र, सरकारकडून न्यायाधीशांच्या निवडीबाबत दिरंगाई का केली जात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.- अ‍ॅड. सौरभ कुलकर्णी, अध्यक्ष,पुणे एनजीटी बार असोसिएशनविधानसभेतून सात जणांची नावे पाठवली१४ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशांच्या व सदस्यांच्या निवडीबाबत ३ डिसेंबरपर्यंत केंद्र सरकारला सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यावेळी सरकारने अहवाल सादर करण्यासाठी वेळ मागितला. त्यामध्ये बुधवारी (१२ डिसेंबर) सुनावणी झाली.सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र, भरती प्रक्रियेमध्ये दिरंगाई का होत आहे, याचे स्पष्टीकरण दिले नाही. असोसिएशने ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. शेखर नफाडे यांनी प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार राज्य विधान सभेतून सात जणांची नावे सुचविण्यात आली होती.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय