शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

शुल्कवाढीविरोधात न्याय कुणाकडे मागावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:11 IST

पुणे : कोरोनामुळे सुमारे दोन वर्षांपासून शाळा बंद असतानाही पुण्यातील काही नफेखोरी करणा-या संस्थाचालकांनी यंदा शुल्कवाढ केली आहे. मात्र, ...

पुणे : कोरोनामुळे सुमारे दोन वर्षांपासून शाळा बंद असतानाही पुण्यातील काही नफेखोरी करणा-या संस्थाचालकांनी यंदा शुल्कवाढ केली आहे. मात्र, याविरोधात दाद मागण्यासाठी पुणे विभागीय शुल्क नियंत्रण समितीच अस्तित्वात नसल्यामुळे न्याय कुठे मागावा, असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. तर शुल्कवाढीचा आणि शिक्षण विभागाचा काहीही संबंध नाही, असे म्हणत उच्चपदस्थ शिक्षण अधिकारी हात झटकत आहेत.

ऑनलाइन शिक्षणामुळे शाळांचा विद्यार्थ्यांवर होणारा खर्च कमी झाला आहे. विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही सुविधा शाळांकडून पुरविल्या जात नाहीत. त्यामुळे शाळांनी शुल्क कमी करणे अपेक्षित असताना काही शाळांनी शुल्कवाढ केली आहे. तसेच शुल्क भरले नाही तर विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग बंद करत आहे. शाळा वारंवार शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करत आहेत. शिक्षण विभागाकडून या शाळांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे या मुजोर शाळांना लगाम कोण घालणार? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

खासगी शाळांना शुल्कवाढ करण्याबाबत कायद्याने अधिकार प्राप्त झाला आहे. परंतु, या कायद्यात नमूद करण्यात आलेल्या नियमांचे शाळांनी काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. पालक शिक्षक संघ (पीटीए) स्थापन करून त्यात शुल्कवाढीबाबत प्रस्ताव ठेवून तो मंजूर करणे आवश्यक आहे. मात्र, दोन वर्ष कोरोनामुळे शाळा बंद असून पालक-शिक्षक संघाच्या नियमीत बैठका घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पालक-शिक्षक संघाच्या संमतीशिवाय शाळांनी केलेली शुल्कवाढ ही बेकायदा ठरते. या शुल्कवाढीविरोधात पालकांना दाद मागता येतो. परंतु, न्याय मागण्याचे दारच सध्या बंद आहे.

शाळांनी वाढवलेले शुल्क मान्य नसल्यास न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या विभागीय शुल्क नियमन समितीकडे पालक तक्रार करू शकतात. परंतु, सध्या विभागीय शुल्क नियमन समित्यांची स्थापनाच झालेली नाही. परिणामी तक्रार कोणाकडे करावी? असा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे. शिक्षणाधिका-यांकडे शुल्कवाढीविरोधात तक्रार केल्यानंतर त्याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही, असे राज्याचे वरिष्ठ शिक्षण अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने पालकांना पूर्णपणे वा-यावर सोडून दिले आहे, अशी पालकांची भावना झाली आहे.

-----------------------

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शुल्क वाढीबाबत २२ फेब्रुवारी २०२१ रोजी बैठक घेण्यात आली होती. त्यात शुल्क नियमन समित्या स्थापन करण्याचे आश्वासन पालक संघटनांना देण्यात आले होते. परंतु, चार महिन्यांनंतरही अद्याप या समित्या स्थापन झालेल्या नाहीत. त्यामुळे पालकांना शुल्कवाढीबाबत कुणाकडेही तक्रार करता येत नाही.

- मुकुंद किर्दत, आप पालक युनियन, पुणे

--------------