शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

शुल्कवाढीविरोधात न्याय कुणाकडे मागावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:11 IST

पुणे : कोरोनामुळे सुमारे दोन वर्षांपासून शाळा बंद असतानाही पुण्यातील काही नफेखोरी करणा-या संस्थाचालकांनी यंदा शुल्कवाढ केली आहे. मात्र, ...

पुणे : कोरोनामुळे सुमारे दोन वर्षांपासून शाळा बंद असतानाही पुण्यातील काही नफेखोरी करणा-या संस्थाचालकांनी यंदा शुल्कवाढ केली आहे. मात्र, याविरोधात दाद मागण्यासाठी पुणे विभागीय शुल्क नियंत्रण समितीच अस्तित्वात नसल्यामुळे न्याय कुठे मागावा, असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. तर शुल्कवाढीचा आणि शिक्षण विभागाचा काहीही संबंध नाही, असे म्हणत उच्चपदस्थ शिक्षण अधिकारी हात झटकत आहेत.

ऑनलाइन शिक्षणामुळे शाळांचा विद्यार्थ्यांवर होणारा खर्च कमी झाला आहे. विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही सुविधा शाळांकडून पुरविल्या जात नाहीत. त्यामुळे शाळांनी शुल्क कमी करणे अपेक्षित असताना काही शाळांनी शुल्कवाढ केली आहे. तसेच शुल्क भरले नाही तर विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग बंद करत आहे. शाळा वारंवार शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करत आहेत. शिक्षण विभागाकडून या शाळांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे या मुजोर शाळांना लगाम कोण घालणार? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

खासगी शाळांना शुल्कवाढ करण्याबाबत कायद्याने अधिकार प्राप्त झाला आहे. परंतु, या कायद्यात नमूद करण्यात आलेल्या नियमांचे शाळांनी काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. पालक शिक्षक संघ (पीटीए) स्थापन करून त्यात शुल्कवाढीबाबत प्रस्ताव ठेवून तो मंजूर करणे आवश्यक आहे. मात्र, दोन वर्ष कोरोनामुळे शाळा बंद असून पालक-शिक्षक संघाच्या नियमीत बैठका घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पालक-शिक्षक संघाच्या संमतीशिवाय शाळांनी केलेली शुल्कवाढ ही बेकायदा ठरते. या शुल्कवाढीविरोधात पालकांना दाद मागता येतो. परंतु, न्याय मागण्याचे दारच सध्या बंद आहे.

शाळांनी वाढवलेले शुल्क मान्य नसल्यास न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या विभागीय शुल्क नियमन समितीकडे पालक तक्रार करू शकतात. परंतु, सध्या विभागीय शुल्क नियमन समित्यांची स्थापनाच झालेली नाही. परिणामी तक्रार कोणाकडे करावी? असा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे. शिक्षणाधिका-यांकडे शुल्कवाढीविरोधात तक्रार केल्यानंतर त्याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही, असे राज्याचे वरिष्ठ शिक्षण अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने पालकांना पूर्णपणे वा-यावर सोडून दिले आहे, अशी पालकांची भावना झाली आहे.

-----------------------

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शुल्क वाढीबाबत २२ फेब्रुवारी २०२१ रोजी बैठक घेण्यात आली होती. त्यात शुल्क नियमन समित्या स्थापन करण्याचे आश्वासन पालक संघटनांना देण्यात आले होते. परंतु, चार महिन्यांनंतरही अद्याप या समित्या स्थापन झालेल्या नाहीत. त्यामुळे पालकांना शुल्कवाढीबाबत कुणाकडेही तक्रार करता येत नाही.

- मुकुंद किर्दत, आप पालक युनियन, पुणे

--------------