शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

धोकादायक वाहतूक रोखणार कोण?

By admin | Updated: December 20, 2014 00:13 IST

शहरातील वाहतूकव्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यांची अंमलबजावणी मात्र

चिंचवड : शहरातील वाहतूकव्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यांची अंमलबजावणी मात्र सर्वसामान्य वाहनचालकांसाठीच होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असल्याने ही धोकादायक वाहतूक रोखणार कोण, असा सवाल नागरिक विचारत आहेत.शहरातील चौकांत वाहनचालकांची कसून तपासणी करण्यात येते. हेल्मेट, वाहन परवाना, कागदपत्रे, पीयूसी आदी गोष्टींची तपासणी करण्यासाठी वाहतूक पोलिसांसह खाकी वदीर्तील पोलीसही व्यस्त असतात. मात्र क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई का होत नाही, हे समजत नाही.शहरातील विविध रस्त्यांवर ट्रक, टेम्पो, कंटेनर, ट्रेलर व तीनचाकी रिक्षांमधून विविध प्रकारचे बांधकाम साहित्य, भंगार मालासह अवजड मालाची वाहतूक सर्रास सुरू आहे. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करीत आहेत. अशा धोकादायक वाहनांमुळे अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र वाहतूक शाखा अशा वाहनांवर कडक कारवाई करीत असल्याचे दिसत नाही.अशा धोकादायक वाहनांमुळे अनेकदा वाहतूककोंडी होते. मुंबई-पुणे महामार्गावरही अशा वाहनांची खुलेआम वाहतूक सुरू असते. वाहतूक शाखेचे कर्मचारी अशा वाहनांना अडवून काय कारवाई करतात, हेच समजत नाही. आर्थिक हितसंबंधांमुळेच धोकादायक वाहतुकीला पाठबळ मिळत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. निगडीतील भक्ती-शक्ती चौक, मुख्य बसथांबा, आकुर्डी खंडोबा माळ चौक, चिंचवड स्टेशन परिसर, चिंचवड-भोसरी रोड, चिखली-तळवडे रोड, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी रोड, पिंपरी लिंक रोड, काळेवाडी, थेरगाव या भागात धोकादायक वाहतूक सुरू आहे. काही व्यावसायिक वाहने नियमित अशी वाहतूक करीत आहेत. परंतु वाहतूक शाखेशी या व्यावसायिकांचे लागेबांधे असल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा आहे.विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचाही प्रश्न गंभीर आहे. वाहतूक नियमांची पायमल्ली करून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू आहे. शाळा-महाविद्यालय परिसरात अशा वाहनांचे धोकादायक चित्र सहज दिसते. मात्र वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा धोकादायक वाहतुकीस मोठा अपघात होण्यापूर्वीच आवर घालणे महत्त्वाचे आहे.शहरातील वाहतूक नियोजनाबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे शहरातील आमदारांनी जाहीर केले आहे. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी योग्य नियोजन व्हावे, आर्थिक हितसंबंध व कोणाच्याही दबावाला बळी न पडता कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)