शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक वाहतूक रोखणार कोण?

By admin | Updated: December 20, 2014 00:13 IST

शहरातील वाहतूकव्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यांची अंमलबजावणी मात्र

चिंचवड : शहरातील वाहतूकव्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यांची अंमलबजावणी मात्र सर्वसामान्य वाहनचालकांसाठीच होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असल्याने ही धोकादायक वाहतूक रोखणार कोण, असा सवाल नागरिक विचारत आहेत.शहरातील चौकांत वाहनचालकांची कसून तपासणी करण्यात येते. हेल्मेट, वाहन परवाना, कागदपत्रे, पीयूसी आदी गोष्टींची तपासणी करण्यासाठी वाहतूक पोलिसांसह खाकी वदीर्तील पोलीसही व्यस्त असतात. मात्र क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई का होत नाही, हे समजत नाही.शहरातील विविध रस्त्यांवर ट्रक, टेम्पो, कंटेनर, ट्रेलर व तीनचाकी रिक्षांमधून विविध प्रकारचे बांधकाम साहित्य, भंगार मालासह अवजड मालाची वाहतूक सर्रास सुरू आहे. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करीत आहेत. अशा धोकादायक वाहनांमुळे अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र वाहतूक शाखा अशा वाहनांवर कडक कारवाई करीत असल्याचे दिसत नाही.अशा धोकादायक वाहनांमुळे अनेकदा वाहतूककोंडी होते. मुंबई-पुणे महामार्गावरही अशा वाहनांची खुलेआम वाहतूक सुरू असते. वाहतूक शाखेचे कर्मचारी अशा वाहनांना अडवून काय कारवाई करतात, हेच समजत नाही. आर्थिक हितसंबंधांमुळेच धोकादायक वाहतुकीला पाठबळ मिळत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. निगडीतील भक्ती-शक्ती चौक, मुख्य बसथांबा, आकुर्डी खंडोबा माळ चौक, चिंचवड स्टेशन परिसर, चिंचवड-भोसरी रोड, चिखली-तळवडे रोड, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी रोड, पिंपरी लिंक रोड, काळेवाडी, थेरगाव या भागात धोकादायक वाहतूक सुरू आहे. काही व्यावसायिक वाहने नियमित अशी वाहतूक करीत आहेत. परंतु वाहतूक शाखेशी या व्यावसायिकांचे लागेबांधे असल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा आहे.विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचाही प्रश्न गंभीर आहे. वाहतूक नियमांची पायमल्ली करून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू आहे. शाळा-महाविद्यालय परिसरात अशा वाहनांचे धोकादायक चित्र सहज दिसते. मात्र वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा धोकादायक वाहतुकीस मोठा अपघात होण्यापूर्वीच आवर घालणे महत्त्वाचे आहे.शहरातील वाहतूक नियोजनाबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे शहरातील आमदारांनी जाहीर केले आहे. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी योग्य नियोजन व्हावे, आर्थिक हितसंबंध व कोणाच्याही दबावाला बळी न पडता कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)