शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

चासकमानच्या पाण्याला आहे का कुणी वाली?

By admin | Updated: January 14, 2017 03:16 IST

चासकमान धरणातून डाव्या कालव्यास ५०० क्युसेक्सने ५० दिवसांसाठी पाण्याचे आर्वतन कालपासून सोडण्यात आले आहे

दावडी/चासकमान : चासकमान धरणातून डाव्या कालव्यास ५०० क्युसेक्सने ५० दिवसांसाठी पाण्याचे आर्वतन कालपासून सोडण्यात आले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात धरणात पाणी शिल्लक राहते की नाही ही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. चासकमान धरणाला कोणी वाली आहे का नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पाण्याची गरज नसतानासुद्धा २७ दिवसांतच पाण्याचे दुसरे आवर्तन सोडल्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करीत आहे. हे सोडलेले पाण्याचे आवर्तन कमी दिवसांचे करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे.खेड व शिरूर तालुक्याला चासकमान धरण वरदान ठरले आहे. रब्बी हंगामासाठी चासकमान धरणातून डाव्या कालव्यास पाण्याचे दुसरे आवर्तन कालपासून सोडण्यात आले आहे. मागील रब्बी हंगामासाठी सोडलेले पाण्याचे आवर्तन ४० दिवसांचे होते, ते (डिसेंबर २०१६) मधील १८ तारखेला बंद करण्यात आले होते. तिन्हेवाडी, बुट्टेवाडी, भांबुरवाडी, टाकळकरवाडी, खरपुडी, रेटवडी, दावडी, निमगाव तसेच शिरूर तालुक्यांतील गावांना पाण्याची गरज नसताना पाण्याचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाण्याचे आवर्तन पन्नास दिवसांचे आहे. टेल टू हेड या पद्धतीने या पाण्याचे वाटप होणार आहे. शिरूरसाठी २७ दिवस व खेडसाठी २३ दिवस या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारीपर्यंत हे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होणार आहे.शेतकऱ्यांची पाणी सोडावी अशी कुठलीही मागणी नसताना डाव्या कालव्यातून पन्नास दिवस पाणी सुरू राहिल्यास पाण्याची मोठया प्रमाणात नासाडी होणार आहे. धरणात ७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याची गरज नसताना अशीच नासाडी सुरू राहिल्यास ऐन उन्हाळयात धरणात पाणी शिल्लक राहील का, असा प्रश्न शेतकरी विचारु लागला आहे. पन्नास दिवसांचे सोडलेले पाण्याचे आर्वतन कमी दिवसांचे करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. सध्या या परिसरात विहिरीची पाण्याची पातळी टिकून आहे. खरपुडी, वाटेकरवाडी, निमगाव, शेलपिंपळगाव येथील बंधाऱ्यांत मुबलक प्रमाणात पाणी आहे. सध्या या परिसरात कांदा, व बटाटा, ज्वारी ही पिके काढणीस आली आहे. त्यामुळे या पिकांना पाण्याची गरज नसल्याचे शेतकरी सांगत आहे.