शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

चासकमानच्या पाण्याला आहे का कुणी वाली?

By admin | Updated: January 14, 2017 03:16 IST

चासकमान धरणातून डाव्या कालव्यास ५०० क्युसेक्सने ५० दिवसांसाठी पाण्याचे आर्वतन कालपासून सोडण्यात आले आहे

दावडी/चासकमान : चासकमान धरणातून डाव्या कालव्यास ५०० क्युसेक्सने ५० दिवसांसाठी पाण्याचे आर्वतन कालपासून सोडण्यात आले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात धरणात पाणी शिल्लक राहते की नाही ही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. चासकमान धरणाला कोणी वाली आहे का नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पाण्याची गरज नसतानासुद्धा २७ दिवसांतच पाण्याचे दुसरे आवर्तन सोडल्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करीत आहे. हे सोडलेले पाण्याचे आवर्तन कमी दिवसांचे करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे.खेड व शिरूर तालुक्याला चासकमान धरण वरदान ठरले आहे. रब्बी हंगामासाठी चासकमान धरणातून डाव्या कालव्यास पाण्याचे दुसरे आवर्तन कालपासून सोडण्यात आले आहे. मागील रब्बी हंगामासाठी सोडलेले पाण्याचे आवर्तन ४० दिवसांचे होते, ते (डिसेंबर २०१६) मधील १८ तारखेला बंद करण्यात आले होते. तिन्हेवाडी, बुट्टेवाडी, भांबुरवाडी, टाकळकरवाडी, खरपुडी, रेटवडी, दावडी, निमगाव तसेच शिरूर तालुक्यांतील गावांना पाण्याची गरज नसताना पाण्याचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाण्याचे आवर्तन पन्नास दिवसांचे आहे. टेल टू हेड या पद्धतीने या पाण्याचे वाटप होणार आहे. शिरूरसाठी २७ दिवस व खेडसाठी २३ दिवस या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारीपर्यंत हे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होणार आहे.शेतकऱ्यांची पाणी सोडावी अशी कुठलीही मागणी नसताना डाव्या कालव्यातून पन्नास दिवस पाणी सुरू राहिल्यास पाण्याची मोठया प्रमाणात नासाडी होणार आहे. धरणात ७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याची गरज नसताना अशीच नासाडी सुरू राहिल्यास ऐन उन्हाळयात धरणात पाणी शिल्लक राहील का, असा प्रश्न शेतकरी विचारु लागला आहे. पन्नास दिवसांचे सोडलेले पाण्याचे आर्वतन कमी दिवसांचे करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. सध्या या परिसरात विहिरीची पाण्याची पातळी टिकून आहे. खरपुडी, वाटेकरवाडी, निमगाव, शेलपिंपळगाव येथील बंधाऱ्यांत मुबलक प्रमाणात पाणी आहे. सध्या या परिसरात कांदा, व बटाटा, ज्वारी ही पिके काढणीस आली आहे. त्यामुळे या पिकांना पाण्याची गरज नसल्याचे शेतकरी सांगत आहे.