शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

चासकमानच्या पाण्याला आहे का कुणी वाली?

By admin | Updated: January 14, 2017 03:16 IST

चासकमान धरणातून डाव्या कालव्यास ५०० क्युसेक्सने ५० दिवसांसाठी पाण्याचे आर्वतन कालपासून सोडण्यात आले आहे

दावडी/चासकमान : चासकमान धरणातून डाव्या कालव्यास ५०० क्युसेक्सने ५० दिवसांसाठी पाण्याचे आर्वतन कालपासून सोडण्यात आले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात धरणात पाणी शिल्लक राहते की नाही ही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. चासकमान धरणाला कोणी वाली आहे का नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पाण्याची गरज नसतानासुद्धा २७ दिवसांतच पाण्याचे दुसरे आवर्तन सोडल्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करीत आहे. हे सोडलेले पाण्याचे आवर्तन कमी दिवसांचे करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे.खेड व शिरूर तालुक्याला चासकमान धरण वरदान ठरले आहे. रब्बी हंगामासाठी चासकमान धरणातून डाव्या कालव्यास पाण्याचे दुसरे आवर्तन कालपासून सोडण्यात आले आहे. मागील रब्बी हंगामासाठी सोडलेले पाण्याचे आवर्तन ४० दिवसांचे होते, ते (डिसेंबर २०१६) मधील १८ तारखेला बंद करण्यात आले होते. तिन्हेवाडी, बुट्टेवाडी, भांबुरवाडी, टाकळकरवाडी, खरपुडी, रेटवडी, दावडी, निमगाव तसेच शिरूर तालुक्यांतील गावांना पाण्याची गरज नसताना पाण्याचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाण्याचे आवर्तन पन्नास दिवसांचे आहे. टेल टू हेड या पद्धतीने या पाण्याचे वाटप होणार आहे. शिरूरसाठी २७ दिवस व खेडसाठी २३ दिवस या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारीपर्यंत हे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होणार आहे.शेतकऱ्यांची पाणी सोडावी अशी कुठलीही मागणी नसताना डाव्या कालव्यातून पन्नास दिवस पाणी सुरू राहिल्यास पाण्याची मोठया प्रमाणात नासाडी होणार आहे. धरणात ७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याची गरज नसताना अशीच नासाडी सुरू राहिल्यास ऐन उन्हाळयात धरणात पाणी शिल्लक राहील का, असा प्रश्न शेतकरी विचारु लागला आहे. पन्नास दिवसांचे सोडलेले पाण्याचे आर्वतन कमी दिवसांचे करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. सध्या या परिसरात विहिरीची पाण्याची पातळी टिकून आहे. खरपुडी, वाटेकरवाडी, निमगाव, शेलपिंपळगाव येथील बंधाऱ्यांत मुबलक प्रमाणात पाणी आहे. सध्या या परिसरात कांदा, व बटाटा, ज्वारी ही पिके काढणीस आली आहे. त्यामुळे या पिकांना पाण्याची गरज नसल्याचे शेतकरी सांगत आहे.