शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पाण्याचा अपव्यय रोखण्याची जबाबदारी कोणाची?

By admin | Updated: April 6, 2016 01:20 IST

पाणीकपातीचे धोरण महापालिका अवलंबित असताना पाण्याचा अपव्यय होण्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. महापालिका, एमआयडीसी

पिंपरी : पाणीकपातीचे धोरण महापालिका अवलंबित असताना पाण्याचा अपव्यय होण्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. महापालिका, एमआयडीसी आणि प्राधिकरण परिसरात शासकीय कार्यालयातच पाण्याचा अपव्यय होत असल्याचे उघड झाले आहे. कारवाई करायची कोणावर, हा खरा प्रश्न आहे.काही महिन्यांपासून महापालिकेने दिवसातून एकदा पाण्याचे नियोजन केले आहे. पाणीकपात माथी मारण्याचा प्रकार महापालिकेकडून सुरू आहे. परंतु, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांऐवजी शासकीय कार्यालयातच पाण्याचा अपव्यय होत असल्याचे उघड झाले आहे. शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या हालचालीदरम्यान, पुण्यापाठोपाठ आता पिंपरी-चिंचवडमध्येही दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्यासाठी महापालिका प्रशासनाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. ११ डिसेंबर २०१५ पासून शहरात १० टक्के पाणीकपात करण्यात आली. यामुळे प्रतिदिन ४० ते ४५ एमएलडी पाण्याची बचत होऊ लागली. त्यानंतर पुन्हा ११ मार्च २०१६ ला आणखी पाच टक्के पाणी कपात केल्याने प्रतीदिन ७० ते ८० एमएलडी पाण्याची बचत होऊ लागली. सध्या प्रतिदिन ३८० एमएलडी पाण्याचा उपसा केला जात आहे. मात्र, सध्या धरणक्षेत्रात केवळ ३२ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने पावसाळ्यापर्यंत पाणी पुरविण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. (प्रतिनिधी) प्राधिकरणाच्या इमारतीची स्वच्छता४पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने आकुर्डीतील रेल्वेस्थानकाजवळ ग्रीन बिल्डिंग तयार केली आहे. ग्रीन बिल्डिंगचे रेटिंग असणाऱ्या या इमारतीची स्वच्छता करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात होता. दुपारी बारा ते तीन या वेळेत प्लॅस्टिक पाइपच्या आधारे कर्मचारी इमारतीची स्वच्छता करीत होते. त्यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाल्याची तक्रार या परिसरातील जागरूक नागरिकांनी केली असून, संबंधितांवर कारवाईची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.रिक्षा धुण्यात चालक दंग४तळवडे-त्रिवेणीनगर रस्त्यावरील चर्चसमोरील जलवाहिनीचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने फवाऱ्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत होती. याबाबत परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारही केली. मात्र, कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही. दरम्यानच्या काळात फवाऱ्यांद्वारे उडणाऱ्या पाण्यात रस्त्याने ये-जा करणाऱ्या रिक्षा, टेम्पो थांबविण्यात येत होते. गाड्या धुण्याचे काम या परिसरातील चालक करीत होते. सुमारे तास-दोन तास हा प्रकार सुरू होता.