शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पाण्याचा अपव्यय रोखण्याची जबाबदारी कोणाची?

By admin | Updated: April 6, 2016 01:20 IST

पाणीकपातीचे धोरण महापालिका अवलंबित असताना पाण्याचा अपव्यय होण्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. महापालिका, एमआयडीसी

पिंपरी : पाणीकपातीचे धोरण महापालिका अवलंबित असताना पाण्याचा अपव्यय होण्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. महापालिका, एमआयडीसी आणि प्राधिकरण परिसरात शासकीय कार्यालयातच पाण्याचा अपव्यय होत असल्याचे उघड झाले आहे. कारवाई करायची कोणावर, हा खरा प्रश्न आहे.काही महिन्यांपासून महापालिकेने दिवसातून एकदा पाण्याचे नियोजन केले आहे. पाणीकपात माथी मारण्याचा प्रकार महापालिकेकडून सुरू आहे. परंतु, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांऐवजी शासकीय कार्यालयातच पाण्याचा अपव्यय होत असल्याचे उघड झाले आहे. शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या हालचालीदरम्यान, पुण्यापाठोपाठ आता पिंपरी-चिंचवडमध्येही दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्यासाठी महापालिका प्रशासनाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. ११ डिसेंबर २०१५ पासून शहरात १० टक्के पाणीकपात करण्यात आली. यामुळे प्रतिदिन ४० ते ४५ एमएलडी पाण्याची बचत होऊ लागली. त्यानंतर पुन्हा ११ मार्च २०१६ ला आणखी पाच टक्के पाणी कपात केल्याने प्रतीदिन ७० ते ८० एमएलडी पाण्याची बचत होऊ लागली. सध्या प्रतिदिन ३८० एमएलडी पाण्याचा उपसा केला जात आहे. मात्र, सध्या धरणक्षेत्रात केवळ ३२ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने पावसाळ्यापर्यंत पाणी पुरविण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. (प्रतिनिधी) प्राधिकरणाच्या इमारतीची स्वच्छता४पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने आकुर्डीतील रेल्वेस्थानकाजवळ ग्रीन बिल्डिंग तयार केली आहे. ग्रीन बिल्डिंगचे रेटिंग असणाऱ्या या इमारतीची स्वच्छता करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात होता. दुपारी बारा ते तीन या वेळेत प्लॅस्टिक पाइपच्या आधारे कर्मचारी इमारतीची स्वच्छता करीत होते. त्यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाल्याची तक्रार या परिसरातील जागरूक नागरिकांनी केली असून, संबंधितांवर कारवाईची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.रिक्षा धुण्यात चालक दंग४तळवडे-त्रिवेणीनगर रस्त्यावरील चर्चसमोरील जलवाहिनीचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने फवाऱ्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत होती. याबाबत परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारही केली. मात्र, कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही. दरम्यानच्या काळात फवाऱ्यांद्वारे उडणाऱ्या पाण्यात रस्त्याने ये-जा करणाऱ्या रिक्षा, टेम्पो थांबविण्यात येत होते. गाड्या धुण्याचे काम या परिसरातील चालक करीत होते. सुमारे तास-दोन तास हा प्रकार सुरू होता.