शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

नवे प्रशासकीय कारभारी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 02:42 IST

पुण्याचे विभागीय आयुक्त सेवानिवृत्त होणार असून, महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांची बदली झाली

पुणे : पुण्याचे विभागीय आयुक्त सेवानिवृत्त होणार असून, महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांची बदली झाली; तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा तीन वर्षांचा कार्यकालही संपुष्टात आला आहे. पुण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाºया या तीनही पदांवर नवीन अधिकारी पाहायला मिळतील अशी शक्यता आहे. त्यामुळे पुण्याचे नवीन प्रशासकीय कारभारी कोण होणार, याबाबत चर्चा रंगल्या आहेत.पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या सधन आणि महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या विभागीय आयुक्तपदी बदली व्हावी, यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी हे काही दिवसात सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे पुणे विभागीय आयुक्तपदी कोण विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.दळवी यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाºया जागेवर एखादा ज्येष्ठ अधिकारी बदलून येणे अपेक्षित आहे. पुण्यात राज्यस्तरावरील अनेक कार्यालये आहेत. त्यामुळे या कार्यालयांमधील एखादा अधिकारी बदलून येणार की पुण्याबाहेरील अधिकारी विभागीय आयुक्त म्हणून बदलून येणार, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.पालिका आयुक्त कुणाल कुमार यांची केंद्रात गृह विभागाच्या सहसचिवपदी वर्णी लागली आहे. त्यांच्या बदलीमुळे पालिका आयुक्त पद रिक्त झाले आहे. पुणे महानगर पालिकेअंतर्गत ‘स्मार्ट सिटी’, मेट्रो, नदी सुधार योजना असे विविध प्रकल्प राबविले जात आहेत. त्यामुळे पालिकेसाठी सक्षम अधिकाºयाची आवश्यक ता आहे. या पदावर पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची बदली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; परंतु राज्य शासनाकडून कोणत्या अधिकाºयाची बदली पालिकेत केली जाईल, याकडे प्रशासकीय अधिकाºयांमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे.सर्वसाधारणपणे आयएएस दर्जाच्या अधिकाºयाची बदली तीन वर्षांनी होत असते; मात्र तुकाराम मुंडे यांची बदली वर्षभरातच झाली. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना पुण्यात गेल्या महिन्यातच चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे राव यांचीही बदली निश्चित मानली जात आहे.केवळ पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या कामामुळे अद्यापराज्य शासनाकडून त्यांच्या बदलीबाबत हालचाली झालेल्या नाहीत. सौरभ राव यांची बदली विभागीय आयुक्तपदी किंवा पालिकेच्या आयुक्तपदी होईल,अशी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आहे; तसेच रावयांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर कोण येणार, याबाबतही उत्सुकता आहे.मार्च महिन्यात सर्व अधिकाºयांच्या बदल्या होतात. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर संबंधित अधिकाºयांच्या बदल्या होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.