शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

नवे प्रशासकीय कारभारी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 02:42 IST

पुण्याचे विभागीय आयुक्त सेवानिवृत्त होणार असून, महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांची बदली झाली

पुणे : पुण्याचे विभागीय आयुक्त सेवानिवृत्त होणार असून, महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांची बदली झाली; तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा तीन वर्षांचा कार्यकालही संपुष्टात आला आहे. पुण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाºया या तीनही पदांवर नवीन अधिकारी पाहायला मिळतील अशी शक्यता आहे. त्यामुळे पुण्याचे नवीन प्रशासकीय कारभारी कोण होणार, याबाबत चर्चा रंगल्या आहेत.पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या सधन आणि महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या विभागीय आयुक्तपदी बदली व्हावी, यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी हे काही दिवसात सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे पुणे विभागीय आयुक्तपदी कोण विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.दळवी यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाºया जागेवर एखादा ज्येष्ठ अधिकारी बदलून येणे अपेक्षित आहे. पुण्यात राज्यस्तरावरील अनेक कार्यालये आहेत. त्यामुळे या कार्यालयांमधील एखादा अधिकारी बदलून येणार की पुण्याबाहेरील अधिकारी विभागीय आयुक्त म्हणून बदलून येणार, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.पालिका आयुक्त कुणाल कुमार यांची केंद्रात गृह विभागाच्या सहसचिवपदी वर्णी लागली आहे. त्यांच्या बदलीमुळे पालिका आयुक्त पद रिक्त झाले आहे. पुणे महानगर पालिकेअंतर्गत ‘स्मार्ट सिटी’, मेट्रो, नदी सुधार योजना असे विविध प्रकल्प राबविले जात आहेत. त्यामुळे पालिकेसाठी सक्षम अधिकाºयाची आवश्यक ता आहे. या पदावर पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची बदली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे; परंतु राज्य शासनाकडून कोणत्या अधिकाºयाची बदली पालिकेत केली जाईल, याकडे प्रशासकीय अधिकाºयांमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे.सर्वसाधारणपणे आयएएस दर्जाच्या अधिकाºयाची बदली तीन वर्षांनी होत असते; मात्र तुकाराम मुंडे यांची बदली वर्षभरातच झाली. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना पुण्यात गेल्या महिन्यातच चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे राव यांचीही बदली निश्चित मानली जात आहे.केवळ पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या कामामुळे अद्यापराज्य शासनाकडून त्यांच्या बदलीबाबत हालचाली झालेल्या नाहीत. सौरभ राव यांची बदली विभागीय आयुक्तपदी किंवा पालिकेच्या आयुक्तपदी होईल,अशी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आहे; तसेच रावयांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर कोण येणार, याबाबतही उत्सुकता आहे.मार्च महिन्यात सर्व अधिकाºयांच्या बदल्या होतात. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर संबंधित अधिकाºयांच्या बदल्या होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.